शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: September 15, 2016 02:39 IST

गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशोत्सव मंडळे व भाविकांनी जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे.

नवी मुंबई : गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशोत्सव मंडळे व भाविकांनी जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे. विसर्जन शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. नवी मुंबई, पनवेल व उरणमधील ४१० सार्वजनिक व १६,३५७ घरगुती गणरायांना अनंत चतुर्दशीदिनी निरोप देण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुणे, सातारा व इतर अनेक ठिकाणांवरून ढोल-ताशांची पथके मागविण्यात आली आहेत. अनेक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वेशासह, विविध देखाव्यांसह विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रामध्ये २४ प्रमुख विसर्जन तलावांवर जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक तलावावर स्वतंत्र स्टेज तयार केले आहे. स्वयंसेवक, पाणबुडी, अग्निशमन दलाचे जवान व इतर सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध केली आहे. शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणताही गोंधळ होवू नये यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने वाशीतील शिवाजी चौकामध्ये विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यासाठी खास चौथरा तयार केला आहे. विसर्जनादरम्यान शिवाजी चौकात इतर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आवश्यक त्या सर्व ठिकाणी वाहतुकीमध्ये आवश्यक तो बदल केला आहे. पनवेल, उरण तालुक्यांमध्येही तेथील शासकीय यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे. विसर्जन शांततेमध्ये पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)