शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावाकडे जाण्याला प्राधान्य  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 01:37 IST

लॉकडाऊनमुळे कामगारांची गावाकडे धाव : रेल्वे, बस स्थानकात गर्दी 

 

लोकमत न्यूज नेटवर्क कळंबाेली : लॉकडाऊनमुळे पनवेल परिसरातील उद्योगधंदे, बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. परिणामी हाताला काम नसल्यामुळे कामगारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. दुकाने त्याचबरोबर इतर काम बंद झाले आहे. काम-धंदा नसल्याने शहरात राहणे सोयीचे होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी उपाशी जगण्यापेक्षा मूळ गावाकडे परतण्यास कामगारांकडून पसंती देण्यात येत असल्याने रेल्वे, बसस्थानकांतील गर्दी वाढली आहे. गत वर्षी मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. तेव्हा सर्व राज्यासह परराज्यातील वाहतूक सुविधा बंद करण्यात आली  होती. त्यामुळे कामगार वर्ग आपल्या मूळ गावी परतू शकले नाहीत. काहींनी मिळेल ते वाहन पकडून गाव गाठले.  तर काहींनी पायीच गावची वाट धरल्याचे पहायला मिळाले. शहरात राहिलेल्या  कामगारांवर उपासमारीची वेळ ओढावली होती. जवळ असलेली सर्व जमापुंजी संपल्याने पनवेल परिसरात राहून दिवस काढणे मुश्कील झाले होते. उद्योग- धंद्यावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सद्य:परिस्थितीत बिकट बनला आहे. गत वर्षाप्रमाणे यंदाही तीच  परिस्थिती  उद्भवेल या भीतीने कामगार, गरीब मजुरांनी गावी जाण्यासाठी पनवेल शहरातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून पनवेल रेल्वेस्थानक, बसस्थानकात गावी जाणाऱ्या प्रवाशांनी गर्दी कली आहे. शुक्रवारी तर मोठ्या प्रमाणात रेल्वेस्थानकावर गर्दी उसळली होती. दररोज गावी जाणाऱ्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बिहार, उत्तर प्रदेश, घाटमाथ्यावर जाणाऱ्यांची संख्या मोठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल, उरण, पेण, अलिबाग, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा एमआयडीसी वसाहत, शिळ फाटा परिसरात काम करणारे बिहार व उत्तर प्रदेशकडील बहुतांश मजूर गावाकडे जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात येत आहेत. यात गोरखपूरला जाणा-या मजुरांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर बसस्थानक आणि रेल्वेस्थानकात  घाटमाथ्यावरील लातूर, पुणे, नगर, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ, बुलडाणा येथे जाणारे प्रवासी गर्दी करत आहेत. परप्रांतीय बांधव आपल्या कुटुंबासोबत परत गावी जात आहेत. यात  पनवेलहून तर काही ठाणे, मुंबई येथून गावी जाण्यासाठी रेल्वेस्थानकात गर्दी करत आहेत. 

उरण येथे फळ गाड्यावर काम करतो. आता लॉकडाऊनमुळे सर्व बंद करण्यात आले आहे. पुढे आणखी लॉकडाऊन वाढेल याची भीती वाटते आहे. त्यामुळे आता गोरखपूरला  जात आहे.  कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पनवेलला परत येईन.-सुनील यादव, प्रवासी गत वर्षी लॉकडाऊन लागले तेव्हा तळोजा येथे राहण्यास होतो. पण खाण्या-पिण्याचे खूप हाल झाले. उपाशीपोटी काही दिवस झोपलो, तेव्हा जमा झालेला पैसा देखील  संपला होता. परिस्थिती खूप वाईट आली  होती. ती आता येऊ नये या करिता आगोदरच सावध झालेले बरं म्हणून गावी निघालो आहे.  - अनिल राठोड, प्रवासी गत वर्षीच्या लॉकडाऊनमुळे खूप हाल झाले. जाण्यासाठी गाड्या नव्हत्या आणि इतर वाहनाने जाण्यास अव्वाच्या सव्वा पैसे घेतले होते.  तेही महाराष्ट्र सीमेपर्यंत यंदा गाड्या सुरू आहेत. म्हणून लॉकडाऊन पुन्हा वाढण्याअगोदर गाव गाठतो आहे. - संजय जयस्वाल, प्रवासी