शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

पनवेलमधील वीजपुरवठा सुरळीत; वादळामुळे झाले होते नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:32 IST

महावितरणकडून ग्रामीण भागातील १00 टक्के कामे पूर्ण

- मयूर तांबडे नवीन पनवेल : चक्रीवादळाने पनवेलमध्ये मोठे नुकसान केले होते. विजेच्या तारांवर झाडे पडल्याने शेकडो खांब खाली कोसळले आणि त्यामुळे अनेकांना अंधारात राहावे लागले होते. अखेर खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शहरी आणि ग्रामीण भागातील खंडित झालेला १00 टक्के वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.चक्रीवादळामुळे पनवेल शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळ येण्यापूर्वीच महावितरणने अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरातील वीजपुरवठा बंद केला होता. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाºयामुळे अनेक ठिकाणांचे विद्युत खांब कोलमडून पडले होते, तर काही भागांतील विजेच्या तारा तुटल्या होत्या. विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी विजेचे खांब खांद्यावरून वाहून न्यावे लागले. महापालिका हद्दीतील पनवेल, नवीन पनवेल, खारघर, कामोठे येथील शहरी भागांतील वीजपुरवठा २४ तासांच्या आत सुरू करण्यात आला होता. मात्र, ग्रामीण भागात वीज सुरू करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेक ठिकाणी दुर्गम, तसेच जंगली भाग असल्याने विजेच्या खांबांची वाहतूक करण्यासाठीही कसरत करावी लागली.तालुक्यांमध्ये रस्त्याला लागून असणारे आणि गावाच्या ठिकाणी असणारे विजेचे खांब कोसळून खाली पडले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी खांब पडले, तेथे ते उभारण्याकडे महावितरणच्या अधिकाºयांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. चक्रीवादळानंतर विजेचे किती खांब पडले, याचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये खांबांची संख्या शेकडोंच्या घरात होती. खांब उभे करण्यासाठी पडलेल्या झाडांचा मोठा अडथळा होता. ही झाडे हटविण्यासाठी स्थानिक गावकºयांनी कर्मचाºयांना मदत केली. या सर्वांच्या प्रयत्नामुळे वीजपुरवठा १00 टक्के पूर्ववत झाल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी सांगितले. टावरवाडी, मालडुंगे, शिवणसई, दुंदरे पाडा, धोदानी, तसेच आदिवासी वाड्यांवर काही ठिकाणी खांद्यावरून पोल, विजेच्या तारा वगैरे साहित्य वाहून न्यावे लागले. महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, अधीक्षक अभियंता आर. बी. माने, कार्यकारी अभियंता माणिक राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील, मिलिंद सूर्यतळ, जयदीप नानोटे, विवेक स्वामी यांच्यासह अनेक कनिष्ठ अभियंत्यांनी ही मोहीम यशस्वी केली.कोसळलेले अडीचशे खांब पुन्हा उभारले‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणांचे डीपी बॉक्स कोलमडून पडले होते. उच्च दाबाच्या वाहिन्या, लघू दाबाच्या वाहिन्या, विजेचे खांब पडल्याने महावितरणचे करोडो रुपयांचे नुकसान झाले.खंडित झालेला हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या शंभरपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाºयांनी अहोरात्र परिश्रम घेतले. पनवेल परिसरात जवळपास अडीचशेहून अधिक विजेचे खांब पूर्ववत उभे करण्यात आले.खारघर, कामोठे, पनवेल, नवीन पनवेल येथील वीज चोवीस तासांच्या आत आली, तर गव्हाण, पारगाव, तळोजे, नेरे येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणला ४८ तास लागले.शहरी भागांतील वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर, खारघर, कलंबोली आणि शहर येथील अभियंत्यांनी ग्रामीण भागांत (गाव, वाडी, पाडे) जाऊन काम केले.

टॅग्स :electricityवीज