शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
3
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
4
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
5
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

पनवेलमधील वीजपुरवठा सुरळीत; वादळामुळे झाले होते नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:32 IST

महावितरणकडून ग्रामीण भागातील १00 टक्के कामे पूर्ण

- मयूर तांबडे नवीन पनवेल : चक्रीवादळाने पनवेलमध्ये मोठे नुकसान केले होते. विजेच्या तारांवर झाडे पडल्याने शेकडो खांब खाली कोसळले आणि त्यामुळे अनेकांना अंधारात राहावे लागले होते. अखेर खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शहरी आणि ग्रामीण भागातील खंडित झालेला १00 टक्के वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.चक्रीवादळामुळे पनवेल शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळ येण्यापूर्वीच महावितरणने अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरातील वीजपुरवठा बंद केला होता. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाºयामुळे अनेक ठिकाणांचे विद्युत खांब कोलमडून पडले होते, तर काही भागांतील विजेच्या तारा तुटल्या होत्या. विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी विजेचे खांब खांद्यावरून वाहून न्यावे लागले. महापालिका हद्दीतील पनवेल, नवीन पनवेल, खारघर, कामोठे येथील शहरी भागांतील वीजपुरवठा २४ तासांच्या आत सुरू करण्यात आला होता. मात्र, ग्रामीण भागात वीज सुरू करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेक ठिकाणी दुर्गम, तसेच जंगली भाग असल्याने विजेच्या खांबांची वाहतूक करण्यासाठीही कसरत करावी लागली.तालुक्यांमध्ये रस्त्याला लागून असणारे आणि गावाच्या ठिकाणी असणारे विजेचे खांब कोसळून खाली पडले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी खांब पडले, तेथे ते उभारण्याकडे महावितरणच्या अधिकाºयांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. चक्रीवादळानंतर विजेचे किती खांब पडले, याचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये खांबांची संख्या शेकडोंच्या घरात होती. खांब उभे करण्यासाठी पडलेल्या झाडांचा मोठा अडथळा होता. ही झाडे हटविण्यासाठी स्थानिक गावकºयांनी कर्मचाºयांना मदत केली. या सर्वांच्या प्रयत्नामुळे वीजपुरवठा १00 टक्के पूर्ववत झाल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी सांगितले. टावरवाडी, मालडुंगे, शिवणसई, दुंदरे पाडा, धोदानी, तसेच आदिवासी वाड्यांवर काही ठिकाणी खांद्यावरून पोल, विजेच्या तारा वगैरे साहित्य वाहून न्यावे लागले. महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, अधीक्षक अभियंता आर. बी. माने, कार्यकारी अभियंता माणिक राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील, मिलिंद सूर्यतळ, जयदीप नानोटे, विवेक स्वामी यांच्यासह अनेक कनिष्ठ अभियंत्यांनी ही मोहीम यशस्वी केली.कोसळलेले अडीचशे खांब पुन्हा उभारले‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणांचे डीपी बॉक्स कोलमडून पडले होते. उच्च दाबाच्या वाहिन्या, लघू दाबाच्या वाहिन्या, विजेचे खांब पडल्याने महावितरणचे करोडो रुपयांचे नुकसान झाले.खंडित झालेला हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या शंभरपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाºयांनी अहोरात्र परिश्रम घेतले. पनवेल परिसरात जवळपास अडीचशेहून अधिक विजेचे खांब पूर्ववत उभे करण्यात आले.खारघर, कामोठे, पनवेल, नवीन पनवेल येथील वीज चोवीस तासांच्या आत आली, तर गव्हाण, पारगाव, तळोजे, नेरे येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणला ४८ तास लागले.शहरी भागांतील वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर, खारघर, कलंबोली आणि शहर येथील अभियंत्यांनी ग्रामीण भागांत (गाव, वाडी, पाडे) जाऊन काम केले.

टॅग्स :electricityवीज