शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By admin | Updated: June 28, 2017 03:34 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. पहिल्याच पावसामध्ये रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. पहिल्याच पावसामध्ये रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, रोज वाहतूककोंडी होऊ लागली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, वाहतूककोंडीमुळे प्रवाशांसह वाहतूकदारांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. सायन-पनवेलप्रमाणेच मुंबई-गोवा महामार्गाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ राज्यांशी हा महामार्ग जोडला जातो. महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रामध्ये ४८२ किलोमीटरचा समावेश आहे. हे काम करण्यासाठी शासनाने ११ हजार ७४७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा पूर्ण मार्ग हरित महामार्ग म्हणून विकसित करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे. सद्यस्थितीमध्ये पनवेलपासून पुढे महामार्गाचे काम सुरू आहे; परंतु ठेकेदाराकडून अपेक्षित वेगाने कामे केली जात नाहीत. वाहतूक सुरळीत होईल, याचीही काळजी घेतली जात नाही. पहिल्याच पावसामध्ये आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण गावापासून तारा येथील युसुफ मेहरअली सेंटरपर्यंतच्या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. मोठ्या खड्ड्यांमुळे मोटारसायकलचे वारंवार अपघात होऊ लागले आहेत. अपघातामुळे नियमितपणे वाहतूककोंडी होत असून, मुंबईकडे येणाऱ्या व येथून जाणाऱ्या प्रवाशांना एकाच ठिकाणी अडकून राहावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणच्या विकासाचा महामार्ग होणार असल्याचे बोलले जात आहे. २०१९पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचा संकल्प शासनाने जाहीर केला आहे; परंतु पहिल्याच टप्प्याचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यावर्षी पावसामध्ये पूर्ण महामार्ग खड्डेमय झाला असून, पुढील तीन महिने येथून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शासनाने ठेकेदाराला सूचना देऊन खड्डे तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत, याशिवाय महामार्गावर वाहतूककोंडी होणार नाही. अपघात होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्याची मागणीही होऊ लागली आहे. पावसाळ्यात महामार्गाचे काम धिम्या गतीने झाले तरी चालेल; पण खड्ड्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.