शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

नागोठणेत चौरंगी लढतीची शक्यता

By admin | Updated: February 13, 2017 05:08 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप या आघाड्यांनी आपले उमेदवार उभे

नागोठणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप या आघाड्यांनी आपले उमेदवार उभे के ले आहेत. या मतदारसंघात ११ ग्रामपंचायती येत असून, मतदारांची संख्या २५ हजार ४५७ इतकी आहे. नागोठणे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडून नरेंद्र जैन, सेनेकडून किशोर जैन, भाजपाकडून अंकुश सुटे, शेकापकडून राजेश सानप, संभाजी ब्रिगेडकडून सुहास येरु णकर यांनी, तर सदानंद गायकर (राष्ट्रवादी काँ.), कार्तिक जैन (शिवसेना) यांनी डमी म्हणून अर्ज दाखल केले आहेत. यात गायकर आणि कार्तिक जैन आपले अर्ज मागे घेणार असून, राजेश सानपसुद्धा आपला अर्ज मागे घेतील, असे शेकापचे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे अंतिम लढत चौरंगी होईल, असे बोलले जात असले, तरी भाजपाचा येथे प्रभाव असतानाही खरी लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जैन उमेदवारांमध्येच होईल असे जाणकारांचे मत आहे. सोमवारी निवडणुकीसाठी कोणते उमेदवार रिंगणात आमने-सामने राहणार याचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.नागोठणे पंचायत समिती गणातून आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे राष्ट्रवादी-शेकाप आघाडीमधून राष्ट्रवादीचे शिवराम शिंदे लढत आहेत. सेना-काँग्रेस आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली असल्याने सेनेचे डॉ. मिलिंद धात्रक आणि काँग्रेसचे संतोष लाड आपले अर्ज मागे घेतील असे स्पष्ट होत आहे. भाजपाने शहरातील एक कडवे कार्यकर्ते मनोज धात्रक यांना उभे केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कोळी यांनीसुद्धा आपला अर्ज दाखल केला आहे. कोळी राष्ट्रवादीचे डमी उमेदवार असल्याने ते आपला अर्ज मागे घेतील, असे राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे पळसचे माजी सरपंच किसन बोरकर हेसुद्धा अपक्ष या नात्याने मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपला अर्ज दाखल केला असल्याचे ते सांगत असल्याने या लढतीत ते राहणार की माघार घेणार? हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. विकास चौलकर हे उमेदवारसुद्धा अपक्ष म्हणून या रिंगणात आहेत. या मतदारसंघात नागोठणेसह पळस, कोंडगाव आणि पिगोंडे या चार ग्रामपंचायती येतात. मतदारांची संख्या १२ हजार ५५० इतकी आहे. (वार्ताहर) ऐनघर पंचायत समिती गणात ऐनघरसह पाटणसई, वांगणी, वरवठणे, भिसे, वणी आणि कडसुरे या सात ग्रामपंचायती येतात. या गणातील मतदारांची संख्या १२ हजार ८७७ इतकी आहे. या गणात सहा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजपाचे रोहे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर हे मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आहेत. काँग्रेस-शिवसेना आघाडीतून सेनेचे संजय भोसले आणि शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतून शेकापचे भालचंद्र शिर्के निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेकापकडून अर्ज दाखल केलेले राजेश सानप आपला अर्ज मागे घेतील, असे सांगण्यात येत आहे. सेनेचे सुनील सुटे आणि सोनम भोसले हे दोन डमी उमेदवार असल्याने हे दोन्ही उमेदवार आपला अर्ज मागे घेतील, असे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या गणात तिरंगी लढत होणार असून भाजपा, शिवसेना आणि शेकापचे हे तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने ही लढत अटीतटीचीच होईल, असे बोलले जात आहे. (वार्ताहर)