शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

कोपरखैरणेतील उद्यानाची दुरवस्था; घणसोलीत जलकुंभाच्या आवारात कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 23:37 IST

सुरक्षारक्षक नेमा : घणसोलीत जलकुंभाच्या आवारात कचरा

नवी मुंबई : मुलांना खेळण्यासाठी, तसेच आबाल-वृद्धांना बसण्यासाठी एखादे उद्यान हवे, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कोपरखैरणे सेक्टर १९ येथे बांधलेल्या रणादेवी माता या उद्यानाची दुरवस्था झालेली आहे. या उद्यानात असलेल्या चारही खांबांवरील आठ हायमस्ट दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे काळोख्या रात्रीचा गैरफायदा रात्रीच्या वेळी दारू, चरस आणि गर्दुल्ल्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांना येथून जाताना शरमेने मान खाली घालून जावे लागत असल्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या उद्यानात सुरक्षारक्षक नसल्यामुळे त्या ठिकाणी गर्दुले आणि तळीरामांचा सुळसुळाट सुरू आहे.

घणसोली डीमार्टच्या समोरील महापालिकेच्या जिजामातानगर येथील उच्चस्तरीय आणि भूमिगत जलकुंभ आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्यामुळे जलकुंभाच्या आवारात मोठ्या प्रमाणात केर कचऱ्याचे ढिगारे साचले असून, ठिकठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. सायंकाळी याच ठिकाणी कचरा जाळून टाकण्यात येत असल्यामुळे त्याचा धूर रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

महापालिकेने उद्यान आणि प्रत्येक जलकुंभाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची आवश्यकता असल्याची मागणी घणसोली येथील समाजसेवक गणेश सकपाळ यांनी केली आहे. प्रत्येक उद्यानांना सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम ठेकेदाराचे असूनही ५० टक्के उद्यानात सुरक्षारक्षकच नसल्याने उद्यानाची पार दुर्दशा होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका