शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

घणसोली, गोठीवलीतील विहिरींची साफस‌फाईच्या अभावी दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 23:23 IST

नवी मुंबईत बेलापूर ते दिघा या एकूण आठ विभागांच्या कार्यक्षेत्रात एकूण ९४ विहिरी आहेत.

नवी मुंबई : पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षपणामुळे घणसोली आणि गोठीवली गावातील विहिरीची अवस्था गंभीर झाली आहे. दुर्गंधीयुक्त आणि घाण पाण्याच्या वासामुळे या गावच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नवी मुंबईत बेलापूर ते दिघा या एकूण आठ विभागांच्या कार्यक्षेत्रात एकूण ९४ विहिरी आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींच्या साफसफाई, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने, संपूर्ण विहिरींना शेवाळ आणि पानफुटी, तसेच लहान मोठ्या फांद्यांनी विळखा घातलेला आहे. गोठीवली गावच्या विहिरीच्या समस्यांसंदर्भात समाजसेवक दीपक म्हात्रे यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. 

सोमवारी ता.२८ डिसेंबर रोजी पालिकेच्या रबाले नागरी आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी विहिरींची पाहणी केली. त्याचप्रमाणे, घणसोली बौद्धवाडी येथील तीन बावडी, गुणाले तलावाच्या मध्यभागी असलेली विहीर आणि घणसोली (चिंचआळी ) येथे असलेल्या विहिरींची पार दुर्दशा झालेली आहे. दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच मोठ्या प्रमाणात असूनही, पाणीपुरवठा विभाग विहिरीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान, परिमंडळ २चे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आठवडाभर सुट्टीवर असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई