शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पनवेल परिसरात प्रदूषण; उग्र वासाने नागरिक त्रस्त; शासनाच्या नियंत्रणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 23:21 IST

कळंबोली, खारघर,कामोठे, तळोजात धुरकट वातावरण; आरोग्य धोक्यात

-वैभव गायकर

पनवेल : नजीकच्या काळात पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात दूषित उग्र वासाचे प्रदूषण वाढत चालले आहे. ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात बंद असलेले कारखाने मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा या परिसरासह हा उग्र दर्प खांदा कॉलनी, नवीन पनवेलपर्यंत पोहोचला असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

तळोजा एमआयडीसीमधील दूषित प्रक्रिया न झालेले पाणी कासाडी नदीमार्गे कोपरा खाडीत सोडले जाते. या दूषित पाण्यावर योग्यरीत्या प्रक्रिया न झाल्याने, या पाण्याचा दर्प या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेला हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांना श्वसनाचे आजार जडण्यास सुरुवात झाली आहे. मध्यंतरी हा त्रास वाढल्याने २० पेक्षा संघटना एकत्र आल्या होत्या. खारघर फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली होती. प्रदूषणाचा वाढत चाललेला त्रास लक्षात घेता, कायदेशीर लढा देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला होता.

या आंदोलनाचा भाग म्हणूनच सुमारे ५२ फुटी प्रदूषणरूपी राक्षस दहनाचा कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला होता. तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाचा विषय अतिशय गंभीर बनत चालला आहे. नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी प्रदूषणाच्या विषयावरून राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने वारंवार प्रदूषणकारी कारखान्यांवर दंडात्मक कारवाईचेही आदेश दिले आहेत. काही कारखान्यांना क्लोजर नोटीसही बजावण्यात आलेल्या असताना प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढत चालला असल्याने पनवेल परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल