शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

नवी मुंबईतील केंद्रांवर मतदान शांततेत तर पनवेलमध्ये उत्साहात मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:32 IST

मतांचा टक्का वाढविण्यात अपयश : सुट्ट्यांसह उकाड्यामुळे झाला परिणाम

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये शांततेमध्ये मतदान पार पडले. मशिन बंद पडण्याच्या व बोगस मतदानाच्या किरकोळ तक्रारी वगळता कोणताही गैरप्रकार झाला नाही. तीव्र उकाडा व गावी गेलेले मतदार परत न आल्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यात प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना अपयश आले.

ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नवी मुंबईमधील दोन विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. प्रमुख उमेदवार ठाणे शहरामधील असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच या परिसरामध्ये उत्साह दिसला नाही. गावाकडील निवडणूक, लग्नाच्या तिथी व उन्हाळी सुट्ट्यांमुळे हजारो चाकरमानी गावी गेल्यामुळे मतदानामध्ये उत्साह दिसलाच नाही. पहिल्या दोन तासांमध्ये फक्त ६ टक्के मतदान होऊ शकले होते. दुपारी एक वाजेपर्यंत हे प्रमाण २६ टक्के एवढेच होते. मतदान केंद्रावर कुठेच मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत नव्हते. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी धावपळ सुरू होती. सोशल मीडियावरून व प्रत्यक्ष फोन करूनही नागरिकांना मतदानासाठी येण्याचे आवाहन केले जात होते; परंतु अनेक जण शहरामध्येच नसल्यामुळे मतदानाचे प्रमाण फारसे वाढू शकले नाही.

नवी मुंबईमध्ये दिवसभर शांततेमध्ये मतदान पार पडले. कुठेही मारामारी किंवा इतर गैरप्रकार झाले नाहीत. तुर्भे नाक्यावरील हनुमाननगर व इतर ठिकाणी मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या होत्या; परंतु तत्काळ ही समस्या सोडविण्यात आली. मतदान केंद्रावर व इतर ठिकाणी गोंधळ होऊ नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सिडको विकसित नोडपेक्षा झोपडपट्टी परिसरामध्ये मतदानासाठी उत्साह चांगला होता.

एकीकडे सूर्य आग ओकत असताना सोमवारी ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उत्साहात मतदान पार पडले. पनवेल विधानसभा क्षेत्रात ५५.३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. काही ठिकाणी मशिनमधील किरकोळ बिघाड पाहता इतरत्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ पनवेल मतदार आहे. या मतदार संघात ५ लाख ३९ हजार १८७ मतदार संख्या आहे. या व्यतिरिक्त १७० सर्व्हिस व्होटर्स (मतदार) आहेत. याठिकाणी मूळ मतदान केंद्र ५६३ आणि सहायक मतदान केंद्र २१ असे मिळून एकूण ५८४ मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रावर प्रत्येकी पाच याप्रमाणे २९२० कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली होती. काही मतदार केंद्रावर सेल्फी पॉइंटदेखील निवडणूक आयोगामार्फत उभारण्यात आले होते. खारघर शहरातील सेक्टर ८ मधील रेडक्लिफ शाळेत सजावट करण्यात आली होती. मतदारांसाठी सेल्फी पॉइंट, तसेच स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली होती. केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान