शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

मुंबई बाजार समितीचे राजकीय महत्त्व वाढले, सर्वपक्षीय उमेदवारांनी दिल्या भेटी

By नामदेव मोरे | Updated: May 15, 2024 17:46 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनीही बाजार समितीमध्ये रॅली, बैठकांचा धडाका लावून कामगारांसह व्यापाऱ्यांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सातारा, बारामती, शिरूर मतदारसंघांसाठीही येथील मतदारांना साकडे घातले होते. आता ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनीही बाजार समितीमध्ये रॅली, बैठकांचा धडाका लावून कामगारांसह व्यापाऱ्यांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.

बाजार समितीमध्ये व्यापारी, माथाडी कामगार, मापाडी कामगार, व्यापाऱ्यांकडील मेहता व इतर कर्मचारी, वाहतुकदार, खरेदीदार मिळून रोज १ लाख नागरिकांची येजा असते. मुंबईमधील घाटकोपर, चुनाभट्टी परिसरात येथील धान्य, मसाला व फळ व्यापाऱ्यांचे वास्तव्य आहे. मानखुर्द ते बोरीवलीपर्यंतचे किरकोळ दुकानदार खरेदीसाठी मार्केटमध्ये येत असतात. नवी मुंबईमध्ये वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, तुर्भे ते नेरूळ जुईनगर, सानपाडा परिसरात व्यापारी, कामगारांची वस्ती मोठी आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी, वाई, कोरेगाव, पाटण, पुणे जिल्ह्यातील भोर, जुन्नर, मंचर परिसरातील कामगार व व्यापारी मार्केटमध्ये कार्यरत आहेत. यामुळे यावर्षी परभणी, सातारा, बारामती व शिरूर मतदारसंघातील उमेदवारांनी बाजार समितीमधील मतदारांसाठी मोर्चेबांधणी केली होती.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील निवडणूक झाल्यानंतर आता ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी रॅली काढली. माथाडी नेते नरेंद्र पाटील महायुतीचा प्रचार करत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी बाजार समितीमध्ये रॅली काढून येथील विविध घटकांशी चर्चा केली. आ. शशिकांत शिंदे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार करत असून, बाजार समितीमधील व्यापारी, कामगार यांचे राजकीय महत्त्व वाढल्याचे दिसत आहे.

साताराचा प्रचार बाजार समिती भोवतीयावर्षी सातारा लोकसभा मतदारसंघाची पूर्ण निवडणूक बाजार समितीच्या मुद्यांवरच लढली गेली. शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर शौचालय व एफएसआय घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा, व्यापारी प्रतिनिधी व बाजार समिती कर्मचाऱ्यांना झालेली अटक या मुद्यांवरच सातारा मतदारसंघामध्ये प्रचार केला जात होता. यामुळे निवडणूक लोकसभेची आहे की, बाजार समितीची, अशी चर्चा सातारामध्ये रंगली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई