शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पनवेलमधील बससेवेला पोलीस सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 02:19 IST

पनवेल परिसरातील रिक्षावाले मनमानी भाडे आकारतात. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी शहरात बससेवा सुरू करण्यात आली आहे

पनवेल : पनवेल परिसरातील रिक्षावाले मनमानी भाडे आकारतात. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी शहरात बससेवा सुरू करण्यात आली आहे. एनएमएमटीकडून सुरू करण्यात आलेल्या बससेवेला रिक्षावाल्यांकडून सातत्याने विरोध होत आहे. करंजाडे येथून नव्याने सुरू केलेली बस सेवा बंद पाडण्यासाठी रिक्षाचालकांचा प्रयत्न सुरू आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे रिक्षाचालकांच्या विरोधाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत प्रवासांच्या बाजूने उभे राहणार असल्याची भूमिका घेतली आहे. पनवेल शहराबरोबरच नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली, खारघर, रोडपाली, उलवे, तळोजा हे नोड सिडकोने विकसीत केले आहेत. या ठिकाणची लोकवस्ती दिवसन्दिवस वाढत आहे. मुंबई आणि उपनगरात नोकरी करणारे चाकरमानी या भागात जास्त राहतात. ते दररोज उपनगरीय रेल्वे गाडयांनी ये जा करता. मात्र रेल्वेस्थानकापर्यंत पोहचण्याकरीता अंतर्गत वाहतुक व्यवस्थेवर अवलंबून रहावे लागते. याशिवाय अंतर्गत प्रवासाकरीता पूर्वी रिक्षाशिवाय पर्याय नव्हता. तीनआसनी रिक्षाचालकांनी मक्तेदारीमुळे आजपर्यंत मीटर डाऊन केलेला नाही. त्याचबरोबर प्रत्येक वसाहतीत स्थानिक रिक्षावाल्यांची मक्तेदारी असल्याचा भार प्रवाशांना सहन करावा लागतो. एनएमएमटीने सुरुवातीला मानसरोवर, खांदेश्वर ही कामोठे वसाहतीत अंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर रोडपाली - मानसरोवर ही बस सुरू करण्यात आली. यावेळी स्थानिक रिक्षावाल्यांनी प्रचंड विरोध केला, बस अडवण्याचेही प्रकार झाले. मात्र तरीही बससेवा सुरूच राहिली. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या खांदेश्वर ते विचुंबे बससेवेलाही विरोध झाला. चार दिवसापूर्वी करंजाडे-पनवेल रेल्वेस्थानक या दरम्यान बस सुरू करण्यात आली. या सेवेमुळे स्थानिक रिक्षावाल्यांच्या मक्तेदारीला आळा बसला आहे. रिक्षावाल्यांनी या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली. याप्रकरणी रिक्षाचालकांची समजूत काढण्याऐवजी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर ही बससेवा शहरातील ठरावीक मार्गावरून सुरू ठेवावी, अशा सूचनाही केल्या. ठाकूर यांच्या भूमिकेमुळे बस प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी गुरूवारी बैठक बोलावली होती. त्यावेळी साळवे यांनी कोणत्याही परिस्थितीत बससेवा बंद होणार नसल्याची भूमिका घेतली.