शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

नायजेरियनवर कारवाईचा पोलिसांना ताप

By admin | Updated: March 28, 2016 02:34 IST

परदेशी पाहुणे म्हणून देशात येणाऱ्या नागरिकांपैकी नायजेरियन हे पोलिसांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. लॉटरी स्कॅम, फिशिंग, अमली पदार्थांची तस्करी अशा अनेक गुन्ह्यांत

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईपरदेशी पाहुणे म्हणून देशात येणाऱ्या नागरिकांपैकी नायजेरियन हे पोलिसांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. लॉटरी स्कॅम, फिशिंग, अमली पदार्थांची तस्करी अशा अनेक गुन्ह्यांत सहभाग असलेल्या नायजेरियन नागरिकांवर विचारपूर्वक कारवाई करावी लागत आहे. अशा गुन्ह्यांचा खटला न्यायालयात उभा राहिल्यानंतर तो निकाली लागेपर्यंत या परदेशी गुन्हेगारांचा संपूर्ण भार पोलिसांवर पडत आहे. आॅनलाइन पद्धतीने होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची ओळख नायजेरियन स्कॅम म्हणून देशभर झालेली आहे. नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने भारतात आलेले हे परदेशी पाहुणे देशभर गुन्हेगारीचे जाळे पसरवत असून, त्यापैकी अनेक जण व्हिसा संपल्यानंतरही भारतात अवैध वास्तव्य करत आहेत. परंतु अशा नायजेरियन नागरिकांना शोधून त्यांची मायदेशी रवानगी करणे किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे पोलिसांना तापदायक ठरत आहे. यामुळे अनेक प्रकारांमध्ये पोलिसांकडूनही त्यांच्यावर कारवाईला टाळाटाळ केली जाते. त्यामुळे या परदेशी पाहुण्यांना वेळीच आवर घालण्यासाठी शासन स्तरावरच निर्णय घेण्याची गरज भासू लागली आहे.मुंबईनंतर नवी मुंबईत नायजेरियन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यापैकी बहुतेक जण व्हिसा संपल्यानंतरही अवैध वास्तव्य करत असल्याचे पोलिसांनी यापूर्वी केलेल्या अनेक कारवायांमधून सिध्द झाले आहे. पर्यटनाच्या बहाण्याने ठिकठिकाणी फिरत असतानाच त्यांच्याकडून अमली पदार्थांची तस्करी देखील केली जाते. अशा काही नायजेरियनवर नवी मुंबई पोलिसांनी कारवाया देखील केलेल्या आहेत. परंतु एका नायजेरियनवर कारवाई केल्यानंतर दुसऱ्यावर कारवाईपूर्वी त्यांना विचार करणे भाग पडत आहे.गुन्हेगारी मानसिकतेच्या या परदेशी पाहुण्यांना आवरण्यासाठीच पोलिसांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लावावे लागते. कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून होणाऱ्या शक्तिशाली प्रतिकारात वाशी पोलिसांच्या एका चौकीची तोडफोड झाली होती, तर कोपरखैरणेत कारवाईदरम्यान काहींनी दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारून पळण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारात एखादा दगावल्यास आपलाच बळी जायचा अशीही भीती पोलिसांना सतावू लागली आहे. नवी मुंबईत कोपरखैरणे व जुहूगाव येथे मोठ्या संख्येने नायजेरियन्सचे वास्तव्य आहे. मागील काही महिन्यात त्यांच्या सातत्याने झालेल्या झडतीमुळे काहींनी मुक्कामाचे ठिकाण बदलले आहे.परंतु काही प्रकरणांमध्ये नायजेरियन आपसातील किरकोळ गुन्ह्यात स्वत:ला गुंतवून घेत असल्याचेही दिसून येते. अशा गुन्ह्यांचा निकाल लागेपर्यंत त्यांना अपेक्षित असलेले भारतातले वास्तव्य वाढते. सद्य:स्थितीला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ३१ गुन्ह्यांमध्ये ५४ नायजेरियन्सवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी कोपरखैरणे व वाशी पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे. पारपत्र कायदा, आॅनलाइन फसवणूक, अमली पदार्थ तस्करी, मारहाण अशा अनेक गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. परंतु कारवाई केल्यानंतर गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत या नायजेरियन्सची करावी लागणारी उठाठेव पोलिसांना त्रासदायक ठरत आहे.पोलीस ठाण्यातही गोंधळ - नायजेरियन नागरिक पासपोर्टची मुदत संपली तरी देशातच राहण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी एखादा गुन्हा करून स्वत:हून अटकही करून घेतली जाते. फसवणूक व इतर गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या अनेकांना अमली पदार्थांचे व्यसन असते. - कोठडीतही ते हंगामा करून पोलीस स्टेशन डोक्यावर घेतात. अनेक जण स्वत:ला जखमा करून घेत आहेत. - हे संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत असले तरी त्यांच्यावर संबंधित पोलीस स्टेशनला लक्ष द्यावे लागते. जामिनावर सुटलेले देशाबाहेर पळून जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते. शासनाकडून पैसे मिळण्यास विलंब- संशयित म्हणून अटक केलेल्या नायजेरियन नागरिकांचा आर्थिक भुर्दंडही पोलिसांना सहन करावा लागत आहे. - अटक गुन्ह्यामधील आरोपींची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना मूळ देशी पाठविण्याची जबाबदारीही पोलिसांचीच असते. यासाठीचा खर्च शासन देते. परंतु तो वेळेत मिळत नसल्याने त्याचा भुर्दंड पोलिसांना बसू लागला आहे.