शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

‘पोलीस’ गाड्यांचा दबदबा

By admin | Updated: October 31, 2015 00:20 IST

शासकीय वाहन वगळून कर्मचाऱ्यांनी खाजगी वाहनांवर पोलीस लिहू नये असा नियम आहे. परंतु नवी मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन सुरू केले आहे

नामदेव मोरे, नवी मुंबईशासकीय वाहन वगळून कर्मचाऱ्यांनी खाजगी वाहनांवर पोलीस लिहू नये असा नियम आहे. परंतु नवी मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन सुरू केले आहे. खाजगी वाहनांवर बिनधास्तपणे पोलीस नावाची पाटी लावत आहेत. पोलीस दलाशी काहीही संबंध नसलेले नागरिकही वाहतूक विभागाची कारवाई टाळण्यासाठी व टोल वाचविण्यासाठी या पाट्यांचा वापर करू लागले आहेत. नवी मुंबईमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस नियमित कारवाई करत असतात. गतवर्षी तब्बल दीड लाख वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास तीन कोटी रूपये दंड वसूल केला होता. यामध्ये नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर सर्वाधिक ७३५८१ जणांवर कारवाई केली होती. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असणारे पोलीस स्वत:च मात्र बिनधास्त कायद्याचे उल्लंघन करत आहेत. सरकारी वाहन सोडून खाजगी वाहनांवर पोलीस लिहू नये असा नियम आहे. या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु यानंतरही नवी मुंबईमधील बहुतांश ९५ टक्के पोलीस कर्मचारी खाजगी वाहनांवर पोलीस लिहू लागले आहेत. कारमध्ये पोलीस नावाची पाटी लावलेली असते.पोलीस मुख्यालयाच्या गेटपासून ते पार्क हॉटेलपर्यंत उभ्या केलेल्या २० ते २५ कारवर पोलीस नावाची पाटी लावलेली असते. साध्या गणवेशामध्ये असल्यानंतर सर्वांना कळावे या गाडीवर पोलीस आहेत, यासाठी स्टीकर लावले जाते. टोलमध्ये सूट मिळविण्याचाही काही जण प्रयत्न करतात. नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच नसते. रोडवर वाहने उभी केली की कारवाई केली जाते. यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी खाजगी वाहनांवर पोलीस लिहीत आहेत. ज्या वाहनांवर ही पाटी असेल त्यांच्यावर कधीच कारवाई होत नाही. याचाच गैरफायदा पोलीस दलाशी काहीही संबंध नसलेले नागरिकही घेवू लागले आहेत. ज्यांचा या विभागाशी काहीही संबंध नाही त्यांच्या वाहनांवरही पोलीस लिहिले जात आहे. भविष्यात अशीच स्थिती राहिली तर गुन्हेगारही त्यांच्या गाडीवर पोलीस लिहतील असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत.पोलीस मुख्यालयाच्या गेटपासून ते पार्क हॉटेलपर्यंत उभ्या २० ते २५ कारवर पोलीस नावाची पाटी दिसते. ५० पेक्षा जास्त मोटारसायकलवर पोलीस लिहिलेले असते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात ४ ते ५ कार व २० ते ३० मोटारसायकलवर पोलीस लिहिलेले असते.पोलीस व प्रेस लिहिलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस शक्यतो कधीच कारवाई करत नाहीत. यामुळे शहरात १ हजारपेक्षा जास्त वाहनांवर प्रेसच्या पाट्या झळकत आहेत. त्याच्यापेक्षा काही पट वाहनांवर पोलीस लिहिलेले असते. या वाहनांवर कारवाई होत नसल्यामुळे भविष्यात गुन्हेगार अशा पाट्या लावून वाहनांचा गुन्ह्यांसाठी वापर करण्याची भीतीही नागरिक व्यक्त करू लागले आहेत.