शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘पोलीस’ गाड्यांचा दबदबा

By admin | Updated: October 31, 2015 00:20 IST

शासकीय वाहन वगळून कर्मचाऱ्यांनी खाजगी वाहनांवर पोलीस लिहू नये असा नियम आहे. परंतु नवी मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन सुरू केले आहे

नामदेव मोरे, नवी मुंबईशासकीय वाहन वगळून कर्मचाऱ्यांनी खाजगी वाहनांवर पोलीस लिहू नये असा नियम आहे. परंतु नवी मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन सुरू केले आहे. खाजगी वाहनांवर बिनधास्तपणे पोलीस नावाची पाटी लावत आहेत. पोलीस दलाशी काहीही संबंध नसलेले नागरिकही वाहतूक विभागाची कारवाई टाळण्यासाठी व टोल वाचविण्यासाठी या पाट्यांचा वापर करू लागले आहेत. नवी मुंबईमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस नियमित कारवाई करत असतात. गतवर्षी तब्बल दीड लाख वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास तीन कोटी रूपये दंड वसूल केला होता. यामध्ये नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर सर्वाधिक ७३५८१ जणांवर कारवाई केली होती. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असणारे पोलीस स्वत:च मात्र बिनधास्त कायद्याचे उल्लंघन करत आहेत. सरकारी वाहन सोडून खाजगी वाहनांवर पोलीस लिहू नये असा नियम आहे. या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु यानंतरही नवी मुंबईमधील बहुतांश ९५ टक्के पोलीस कर्मचारी खाजगी वाहनांवर पोलीस लिहू लागले आहेत. कारमध्ये पोलीस नावाची पाटी लावलेली असते.पोलीस मुख्यालयाच्या गेटपासून ते पार्क हॉटेलपर्यंत उभ्या केलेल्या २० ते २५ कारवर पोलीस नावाची पाटी लावलेली असते. साध्या गणवेशामध्ये असल्यानंतर सर्वांना कळावे या गाडीवर पोलीस आहेत, यासाठी स्टीकर लावले जाते. टोलमध्ये सूट मिळविण्याचाही काही जण प्रयत्न करतात. नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच नसते. रोडवर वाहने उभी केली की कारवाई केली जाते. यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी खाजगी वाहनांवर पोलीस लिहीत आहेत. ज्या वाहनांवर ही पाटी असेल त्यांच्यावर कधीच कारवाई होत नाही. याचाच गैरफायदा पोलीस दलाशी काहीही संबंध नसलेले नागरिकही घेवू लागले आहेत. ज्यांचा या विभागाशी काहीही संबंध नाही त्यांच्या वाहनांवरही पोलीस लिहिले जात आहे. भविष्यात अशीच स्थिती राहिली तर गुन्हेगारही त्यांच्या गाडीवर पोलीस लिहतील असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत.पोलीस मुख्यालयाच्या गेटपासून ते पार्क हॉटेलपर्यंत उभ्या २० ते २५ कारवर पोलीस नावाची पाटी दिसते. ५० पेक्षा जास्त मोटारसायकलवर पोलीस लिहिलेले असते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात ४ ते ५ कार व २० ते ३० मोटारसायकलवर पोलीस लिहिलेले असते.पोलीस व प्रेस लिहिलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस शक्यतो कधीच कारवाई करत नाहीत. यामुळे शहरात १ हजारपेक्षा जास्त वाहनांवर प्रेसच्या पाट्या झळकत आहेत. त्याच्यापेक्षा काही पट वाहनांवर पोलीस लिहिलेले असते. या वाहनांवर कारवाई होत नसल्यामुळे भविष्यात गुन्हेगार अशा पाट्या लावून वाहनांचा गुन्ह्यांसाठी वापर करण्याची भीतीही नागरिक व्यक्त करू लागले आहेत.