शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

शहरात पोलिसांना ना ड्युटीची वेळ, ना पगाराचा मेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 03:02 IST

पदरी निराशाच; संसाराचा गाडा हाकण्याची चिंता, घर मिळालेलेही अडचणींमुळे त्रस्त

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शासकीय नोकरी असूनही पदरी निराशा अशी अवस्था पोलिसांच्या कुटुंबीयांची झाली आहे. कामाची कसलीही वेळ निश्चित नसल्याने कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नसल्याची मोठी खंत आहे, तर अनेकांपुढे संसाराचा गाडा हाकायचा तरी कसा, याचीही चिंता आहे.शासकीय नोकरीच्या हव्यासापोटी पोलीस दलात भरती झालेल्या अनेकांची काही वर्षांतच नोकरी नको अशी अवस्था झाली आहे. त्याला कामाची अनिश्चित वेळ व राहायची सोय नसणे ही मुख्य कारणे ठरत आहेत.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ४ हजार ८०४ अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यापैकी ४६५ जणांना शासकीय घरात राहण्याची संधी मिळाली आहे. उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिकांपुढे हक्काच्या घराचा प्रश्न कायम आहे. पूर्वीपासून नवी मुंबईत स्थायिक असलेल्या बहुतेक जणांचे स्वतःचे घर आहे. मात्र, भरती झाल्यानंतर नवी मुंबईत स्थायिक झालेल्यांना भाड्याच्या घराचा आसरा घ्यावा लागत आहे, तर स्वतःचे हक्काचे घर नसल्याने ते होईपर्यंत नव्याने भरती झालेल्यांपैकी अनेकांनी अद्याप हात पिवळे केलेले नाहीत. ज्यांना पोलीस कॉलनीत घर मिळाले आहे, ते तिथल्या समस्यांनी त्रस्त आहेत. जे कर्तव्य बजावत संसाराचा गाडा हाकत आहेत, त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ड्युटीवर हजर झाल्यानंतर परत घरी जाण्याची वेळ निश्चित नसल्याने कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. यामुळे मुलांच्या संगोपनाकडे काहीसे दुर्लक्ष होते, तर काम संपवून घरी गेल्यानंतर दिवसभरातल्या कामाचा ताण व तपासाचा वैचारिक भाग घरी सोबतच घेऊन जावा लागतो. या वाढत्या ताणामुळे अनेक जण नशेच्या आहारी जात आहेत. यातूनच काही अंशी पोलिसांची प्रतिमा मलीन होण्याचे प्रकार घडत आहेत.ड्युटी किती तासांची?आठ तासांची ड्युटी कागदावरच असल्याने, ठाण्यातले कामकाज व तपास, यामुळे सर्वाधिक वेळ कर्तव्यावरच जात आहे.कुटुंबासाठी पुरेसा वेळ नाहीकामाचीच वेळ निश्चित नसल्याने अधिकारी किंवा कर्मचारी यांना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नाही.मुलांचे शिक्षण कसे करणार?ठरावीक अधिकारी वगळता बहुतांश कर्मचाऱ्यांची मुले ही मध्यम दर्जाच्या खासगी शाळांमध्ये शिकत आहेत.ज्या नोकरीमुळे कुटुंबीयांनी सोयरीक जुळविली, तीच नोकरी कौटुंबिक सुखाच्या आड येऊ लागली आहे. पतीची कामाची वेळ निश्चित नाही. त्यामुळे घरच्या बाबींकडे, शिवाय मुलांच्या गरजांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, तर कामाच्या वाढत्या ताणाचा परिणाम पतीच्या प्रकृतीवर होतो आहे.- रेखा जाधव, पोलीस पत्नी (बदललेले नाव)