शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शहरात पोलिसांना ना ड्युटीची वेळ, ना पगाराचा मेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 03:02 IST

पदरी निराशाच; संसाराचा गाडा हाकण्याची चिंता, घर मिळालेलेही अडचणींमुळे त्रस्त

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शासकीय नोकरी असूनही पदरी निराशा अशी अवस्था पोलिसांच्या कुटुंबीयांची झाली आहे. कामाची कसलीही वेळ निश्चित नसल्याने कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नसल्याची मोठी खंत आहे, तर अनेकांपुढे संसाराचा गाडा हाकायचा तरी कसा, याचीही चिंता आहे.शासकीय नोकरीच्या हव्यासापोटी पोलीस दलात भरती झालेल्या अनेकांची काही वर्षांतच नोकरी नको अशी अवस्था झाली आहे. त्याला कामाची अनिश्चित वेळ व राहायची सोय नसणे ही मुख्य कारणे ठरत आहेत.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ४ हजार ८०४ अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यापैकी ४६५ जणांना शासकीय घरात राहण्याची संधी मिळाली आहे. उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिकांपुढे हक्काच्या घराचा प्रश्न कायम आहे. पूर्वीपासून नवी मुंबईत स्थायिक असलेल्या बहुतेक जणांचे स्वतःचे घर आहे. मात्र, भरती झाल्यानंतर नवी मुंबईत स्थायिक झालेल्यांना भाड्याच्या घराचा आसरा घ्यावा लागत आहे, तर स्वतःचे हक्काचे घर नसल्याने ते होईपर्यंत नव्याने भरती झालेल्यांपैकी अनेकांनी अद्याप हात पिवळे केलेले नाहीत. ज्यांना पोलीस कॉलनीत घर मिळाले आहे, ते तिथल्या समस्यांनी त्रस्त आहेत. जे कर्तव्य बजावत संसाराचा गाडा हाकत आहेत, त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ड्युटीवर हजर झाल्यानंतर परत घरी जाण्याची वेळ निश्चित नसल्याने कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. यामुळे मुलांच्या संगोपनाकडे काहीसे दुर्लक्ष होते, तर काम संपवून घरी गेल्यानंतर दिवसभरातल्या कामाचा ताण व तपासाचा वैचारिक भाग घरी सोबतच घेऊन जावा लागतो. या वाढत्या ताणामुळे अनेक जण नशेच्या आहारी जात आहेत. यातूनच काही अंशी पोलिसांची प्रतिमा मलीन होण्याचे प्रकार घडत आहेत.ड्युटी किती तासांची?आठ तासांची ड्युटी कागदावरच असल्याने, ठाण्यातले कामकाज व तपास, यामुळे सर्वाधिक वेळ कर्तव्यावरच जात आहे.कुटुंबासाठी पुरेसा वेळ नाहीकामाचीच वेळ निश्चित नसल्याने अधिकारी किंवा कर्मचारी यांना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नाही.मुलांचे शिक्षण कसे करणार?ठरावीक अधिकारी वगळता बहुतांश कर्मचाऱ्यांची मुले ही मध्यम दर्जाच्या खासगी शाळांमध्ये शिकत आहेत.ज्या नोकरीमुळे कुटुंबीयांनी सोयरीक जुळविली, तीच नोकरी कौटुंबिक सुखाच्या आड येऊ लागली आहे. पतीची कामाची वेळ निश्चित नाही. त्यामुळे घरच्या बाबींकडे, शिवाय मुलांच्या गरजांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, तर कामाच्या वाढत्या ताणाचा परिणाम पतीच्या प्रकृतीवर होतो आहे.- रेखा जाधव, पोलीस पत्नी (बदललेले नाव)