शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फुल उत्पादक शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: November 11, 2015 02:30 IST

दिवाळीनिमित्त मुंबईत झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. चांगला बाजारभाव मिळावा यासाठी राज्यभरातील शेतकरी फुलांची विक्री करण्यासाठी मुंबईकडे येतात

नामदेव मोरे, नवी मुंबईदिवाळीनिमित्त मुंबईत झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. चांगला बाजारभाव मिळावा यासाठी राज्यभरातील शेतकरी फुलांची विक्री करण्यासाठी मुंबईकडे येतात. परंतु अशा शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव दिला जात आहे. स्वत: विक्री करणाऱ्यांना धमकावले जात असून त्यांच्याकडील हजारो रुपयांच्या फुलांची चोरी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या या लूटीकडे राज्यकर्त्यांसह पोलीसही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दिवाळीनिमित्त ५०० टनांपेक्षा जास्त फुले मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात विक्रीला येत असतात. पुणे, सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी झेंडूच्या फुलांची शेती करीत आहेत. तीन महिने दिवसरात्र मेहनत करून फुले पिकविली आहेत. चांगला बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी त्यांच्याकडील फुले मुंबईला विक्रीसाठी घेऊन येत आहेत. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना फोन केल्यानंतर चांगला बाजारभाव मिळवून देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु येथे आल्यानंतर मात्र फुलांना योग्य भाव दिला जात नाही. अनेकांना उत्पादन व वाहतुकीच्या खर्चाएवढेही पैसे मिळत नाहीत. सातारा जिल्ह्यातून फुलांची विक्री करण्यासाठी काही शेतकरी सोमवारी रात्री दादरला आले होते. ज्या व्यापाऱ्यांनी त्यांचा माल खरेदी करण्याचे व चांगला बाजारभाव मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते त्याने माल चांगला नसल्याचे कारण सांगून खरेदी करण्यास नकार दिला. कर्ज काढून तीन महिने फुलांच्या शेतामध्ये राबल्यानंतर आता त्यांची विक्री होत नसल्याचे ऐकून धक्काच बसला. निराश न होता शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला स्वत:च फुलांची विक्री सुरू केली. ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला. परंतु तेथील काही समाजकंटकांनी शेतकऱ्यांना धमकावून तेथून पळवून लावण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या गाडीतील १५ हजार रुपयांचा माल चोरला. पोलिसांनी दखल घेतली नाही. व्यापारी, पोलीस व चोरट्यांचे संगनमत असल्याचा संशय आल्यामुळे शेतकऱ्यांनी शिल्लक राहिलेला माल पनवेल परिसरातील कामोठे विभागात रस्त्यावर त्याची विक्री केली.