शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

साडेबारा टक्के लॉटरी लांबणीवर?

By admin | Updated: January 15, 2017 05:45 IST

नवीन वर्षात सिडकोने साडेबारा टक्के भूखंडाची मेगा लॉटरी काढण्याचे जाहीर केले होते; परंतु विविध कारणांमुळे ही लॉटरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. नोटाबंदीचा रियल इस्टेट

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबईनवीन वर्षात सिडकोने साडेबारा टक्के भूखंडाची मेगा लॉटरी काढण्याचे जाहीर केले होते; परंतु विविध कारणांमुळे ही लॉटरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. नोटाबंदीचा रियल इस्टेट क्षेत्राला बसलेला फटका हे यापैकी प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे.सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी साडेबारा टक्के योजनेची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी या योजनेला गती दिली आहे. साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण, पनवेलसह नवी मुंबई क्षेत्रांतील तब्बल ३६0 संचिका भूखंडवाटपासाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. यात रायगड जिल्ह्यातील जवळपास ३00 संचिकांचा समावेश आहे, तर उर्वरित संचिका ठाणे जिल्ह्यातील आहेत. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या भूखंडांची मेगा सोडत काढण्याची योजना सिडकोच्या संबंधित विभागाने आखली होती; परंतु ही सोडत आता लांबणीवर पडल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीचा सर्वाधिक फटका रियल इस्टेट क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे हजारो कोटींचे भूखंड व्यवहार ठप्प पडले आहेत. स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीला खीळ बसली आहे. अशा परिस्थितीत साडेबारा टक्के योजनेचे भूखंड घेऊन करायचे काय? असा प्रश्न गुंतवणूकदार व विकासकांना पडला आहे. त्यामुळे तूर्तास ही सोडत घेऊ नये, असा दबाव विकासक व गुंतवणूकदारांकडून टाकला जात असल्याचे समजते. याचाच परिणाम म्हणून ही सोडत काही महिने पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सिडकोच्या योजना विभागाची ढिलाईसाडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंडवाटप करण्यासाठी सध्या सिडकोकडे भूखंड शिल्लक नाहीत. अशा परिस्थितीतही उपलब्ध भूखंडांच्या बळावर सिडकोने ही मेगा लॉटरी काढण्याची तयारी चालविली आहे. या सोडतीसाठी प्लॅनिंग अर्थात योजना विभागाकडून भूखंड निश्चित करणे गरजेचे असते. नियामानुसार जर २00 मीटर पात्रतेच्या दोन संचिका असतील, तर याच आकाराचे दोनपेक्षा अधिक भूखंड निश्चित करणे गरजेचे असते; परंतु सिडकोच्या योजना विभागाकडून या मेगा लॉटरीसाठी अशाप्रकारे एकही भूखंड निश्चित केला गेला नसल्याचे समजते. लॉटरी प्रक्रिया लांबणीवर पडण्यास योजना विभागाचा हा सुस्त कारभारही तितकाच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.