शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

प्लॅस्टिकमुक्तीला व्यापा-यांचा हरताळ, पनवेलमध्ये सर्वत्र प्लॅस्टिकचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:57 IST

प्लॅस्टिकमुक्त पनवेल करण्याच्या मनपा प्रशासनाच्या संकल्पास व्यापाºयांनी हरताळ फासला आहे. बंदीचे आदेश धाब्यावर बसवून बिनधास्तपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आपॅरेशनमध्ये निदर्शनास आले आहे.

वैभव गायकर पनवेल : प्लॅस्टिकमुक्त पनवेल करण्याच्या मनपा प्रशासनाच्या संकल्पास व्यापाºयांनी हरताळ फासला आहे. बंदीचे आदेश धाब्यावर बसवून बिनधास्तपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आपॅरेशनमध्ये निदर्शनास आले आहे. हागणदारीमुक्तीप्रमाणे प्लॅस्टिकमुक्त पनवेल ही संकल्पनाही फक्त कागदावरच राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी १० नोव्हेंबर रोजी महापालिका क्षेत्रामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याचे जाहीर केले. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कायद्याने बंदी आहे. परंतु सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारी पनवेल ही एकमेव महापालिका असल्याचा दावा केला होता. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाºयांकडून ३० लाख रुपये दंड आकारण्यात आल्याची माहिती दिली होती. महापालिका प्रशासनाच्या प्लॅस्टिकमुक्तीचे वास्तव तपासण्यासाठी ‘लोकमत’ने शहरातील सर्व विभागामध्ये जावून पाहणी केली असता प्लॅस्टिकचा पूर्वीप्रमाणेच वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. पालिका मुख्यालयातील कर्मचारीही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या पटेल मोहल्ल्यातील मटण व इतर विक्रेते बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर करत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये निदर्शनास आले. उरण नाक्यावरील हॉटेल, मच्छी मार्केटमध्येही विक्रेते प्लॅस्टिकमध्येच साहित्य ग्राहकांना देत होते. खारघर, कळंबोली, नवीन पनवेल परिसरातील भाजी विक्रेते व इतर फेरीवाल्यांनीही महापालिकेचे आदेश धाब्यावर बसविले आहेत. विक्रेत्यांना प्रशासनाची भीतीच राहिलेली नाही. प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नाही. दिखावेगिरी करण्यासाठी काही ठिकाणी कारवाई केली जात असल्याची टीकाही होवू लागली आहे.महापालिका प्रशासनाने प्लॅस्टिक बंदी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात पूर्ण मनपा क्षेत्रामध्ये जनजागृती करण्यात आलेली नाही. नागरिकांना प्लॅस्टिकला पर्यायी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. व्यावसायिकांमध्ये व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली नाही. जनजागृती न करताच आयुक्तांनी सरसकट प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याची आयुक्तांनी घाई केली. राज्यातील पहिली महापालिका ठरविण्याच्या अट्टाहासामुळे हाही प्रयोग फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.फक्त कारवाई करून प्लॅस्टिक पिशव्या बंद होणार नाहीत. त्यासाठी महानगरपालिकेला व्यापक जनजागृती करावी लागणार आहे.भिवंडीसह उल्हासनगरमधून येतात प्लॅस्टिक पिशव्यापनवेल महापालिका क्षेत्रामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. भिवंडी, उल्हासनगरमधून पिशव्या विक्रीसाठी येत आहेत. महापालिका क्षेत्रातही बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचे विक्रेते आहेत. या सर्वांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.प्लॅस्टिकमुक्तीसाठी लोकसहभाग नाहीमहापालिका प्रशासनाने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. विक्री करणाºयांवर कारवाईही सुरू केली आहे. पण प्लॅस्टिकमुक्त पनवेल ही फक्त महापालिकेची जबाबदारी नाही. या अभियानामध्ये नागरिकांनीही सहभाग घेतला पाहिजे. नागरिकांनी स्वत: या अभियानामध्ये सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई