शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांना विश्वासात न घेताच प्लास्टिकमुक्ती

By admin | Updated: January 9, 2017 07:19 IST

महापालिकेने राबविलेल्या प्लास्टिकमुक्त नवी मुंबई मोहिमेच्या नियोजनापासून महापौरांना दूर ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

नवी मुंबई : महापालिकेने राबविलेल्या प्लास्टिकमुक्त नवी मुंबई मोहिमेच्या नियोजनापासून महापौरांना दूर ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. शहराच्या प्रथम नागरिकाला टपालाने कार्यक्रमाचे आमंत्रण पाठविण्यात आले. पालिकेत सद्यस्थितीमध्ये प्रशासकीय राजवटीचे वातावरण असून, लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र असंतोष आहे. दलित समाजाचे पहिले महापौर असलेल्या सुधाकर सोनावणे यांचा वर्षभरापासून सातत्याने अवमान होऊ लागला आहे. झोपडपट्टीमधील कार्यकर्ता ते महापौरपदापर्यंत प्रवास करताना, गरीब मुलांच्या शिक्षणापासून ते झोपडपट्टी धोरण निर्माण करण्यापर्यंत सोनावणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे आंबेडकर भवननिर्मितीसाठीही पाठपुरावा केला आहे. महापौरपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून मात्र त्यांचा वारंवार अवमान होऊ लागला आहे. प्लास्टिकमुक्त अभियानानिमित्त पुन्हा एकदा महापौरांना डावलण्यात आले. शहरामध्ये कोणतेही महत्त्वाचे अभियान किंवा प्रकल्प राबविताना प्रशासनाने महापौरांशी चर्चा करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकसाथ येऊन काम केले, तरच शहराची प्रगती होऊ शकते; पण या अभियानाचे नियोजन करताना साधी चर्चाही करण्यात आलेली नाही. अभियानाच्या एक दिवसअगोदर सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात अभियान राबविण्याचे पत्र पाठविण्यात आले. त्याच पद्धतीने महापौरांनाही पत्र पाठविण्यात आले. शहराच्या प्रथम नागरिकाला असे टपालाद्वारे पत्र पाठविण्याची ही देशातील एकमेव घटना असल्याचे बोलले जात आहे. अभियान चांगले असल्यामुळे महापौरांनी कुठेही विरोध केला नाही व उघड नाराजीही व्यक्त केली नाही. शहर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी आमचे सहकार्य राहीलच, असे स्पष्ट केले असले तरी अभियानामध्ये कुठेही ते दिसले नाहीत. आचारसंहिता असल्याने अभियानामध्ये सहभागी झाले नसल्याचे सांगितले असले तरी झालेल्या अवमानामुळेच ते कार्यक्रमाकडे फिरकले नसल्याची चर्चा आहे. महापौरांच्या अवमानाची ही पहिली वेळ नाही. सहा महिन्यांत त्यांना व इतर नगरसेवकांना प्रशासन विश्वासात घेत नाही. महापौरांनी शहरातील विकासकामांविषयी चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलावल्यानंतरही अधिकारी वेळेत येत नाहीत. आयुक्तांच्या भीतीने महापौरांची सांगितलेल्या सूचना टाळण्याकडेच लक्ष दिले जात आहे. आंबेडकर भवनविषयी महापौरांनी केलेल्या सूचनांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. पालिकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये महापौरांनी उघडपणे खंत व्यक्त केली होती. काहीही काम करता आले नसल्याचे स्पष्ट करतानाच आयुक्तांना खडे बोल सुनावले होते. प्लास्टिकमुक्त अभियानानिमित्त महापौरांना पूर्णपणे डावलल्यामुळे यापुढे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)