शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

महापौरांना विश्वासात न घेताच प्लास्टिकमुक्ती

By admin | Updated: January 9, 2017 07:19 IST

महापालिकेने राबविलेल्या प्लास्टिकमुक्त नवी मुंबई मोहिमेच्या नियोजनापासून महापौरांना दूर ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

नवी मुंबई : महापालिकेने राबविलेल्या प्लास्टिकमुक्त नवी मुंबई मोहिमेच्या नियोजनापासून महापौरांना दूर ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. शहराच्या प्रथम नागरिकाला टपालाने कार्यक्रमाचे आमंत्रण पाठविण्यात आले. पालिकेत सद्यस्थितीमध्ये प्रशासकीय राजवटीचे वातावरण असून, लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र असंतोष आहे. दलित समाजाचे पहिले महापौर असलेल्या सुधाकर सोनावणे यांचा वर्षभरापासून सातत्याने अवमान होऊ लागला आहे. झोपडपट्टीमधील कार्यकर्ता ते महापौरपदापर्यंत प्रवास करताना, गरीब मुलांच्या शिक्षणापासून ते झोपडपट्टी धोरण निर्माण करण्यापर्यंत सोनावणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे आंबेडकर भवननिर्मितीसाठीही पाठपुरावा केला आहे. महापौरपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून मात्र त्यांचा वारंवार अवमान होऊ लागला आहे. प्लास्टिकमुक्त अभियानानिमित्त पुन्हा एकदा महापौरांना डावलण्यात आले. शहरामध्ये कोणतेही महत्त्वाचे अभियान किंवा प्रकल्प राबविताना प्रशासनाने महापौरांशी चर्चा करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकसाथ येऊन काम केले, तरच शहराची प्रगती होऊ शकते; पण या अभियानाचे नियोजन करताना साधी चर्चाही करण्यात आलेली नाही. अभियानाच्या एक दिवसअगोदर सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात अभियान राबविण्याचे पत्र पाठविण्यात आले. त्याच पद्धतीने महापौरांनाही पत्र पाठविण्यात आले. शहराच्या प्रथम नागरिकाला असे टपालाद्वारे पत्र पाठविण्याची ही देशातील एकमेव घटना असल्याचे बोलले जात आहे. अभियान चांगले असल्यामुळे महापौरांनी कुठेही विरोध केला नाही व उघड नाराजीही व्यक्त केली नाही. शहर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी आमचे सहकार्य राहीलच, असे स्पष्ट केले असले तरी अभियानामध्ये कुठेही ते दिसले नाहीत. आचारसंहिता असल्याने अभियानामध्ये सहभागी झाले नसल्याचे सांगितले असले तरी झालेल्या अवमानामुळेच ते कार्यक्रमाकडे फिरकले नसल्याची चर्चा आहे. महापौरांच्या अवमानाची ही पहिली वेळ नाही. सहा महिन्यांत त्यांना व इतर नगरसेवकांना प्रशासन विश्वासात घेत नाही. महापौरांनी शहरातील विकासकामांविषयी चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलावल्यानंतरही अधिकारी वेळेत येत नाहीत. आयुक्तांच्या भीतीने महापौरांची सांगितलेल्या सूचना टाळण्याकडेच लक्ष दिले जात आहे. आंबेडकर भवनविषयी महापौरांनी केलेल्या सूचनांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. पालिकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये महापौरांनी उघडपणे खंत व्यक्त केली होती. काहीही काम करता आले नसल्याचे स्पष्ट करतानाच आयुक्तांना खडे बोल सुनावले होते. प्लास्टिकमुक्त अभियानानिमित्त महापौरांना पूर्णपणे डावलल्यामुळे यापुढे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)