शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ प्लॅन बी कार्यान्वित

By admin | Updated: August 11, 2016 04:10 IST

स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याचाच प्रकार असल्याचा प्रत्यय सर्वत्र दिसून येत आहे. या मिशनला जनतेकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही

आविष्कार देसाई, अलिबागस्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याचाच प्रकार असल्याचा प्रत्यय सर्वत्र दिसून येत आहे. या मिशनला जनतेकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मिशन पुढे रेटण्यासाठी सरकारने आता ‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ या नावाने प्लॅन बी कार्यान्वित केला आहे. मिशन यशस्वी करण्यासाठी आधीच सरकारने वेगवेगळ्या प्रकारे नियोजन करु न ठेवले आहे. त्यामुळे एखादा प्लॅन फेल गेला तरी, दुसऱ्या प्लॅनवर त्यांना तातडीने काम करता येणार आहे. सरकारची ही स्ट्रॅटजी प्रशंसनीय असली, तरी त्याचा फायदा कितपत होतो यावरच सर्व काही अवलंबून राहणार आहे.या प्लॅननुसार राज्यातील १८ लाख, तर रायगड जिल्ह्यातील ३५ हजार कुटुंबांच्या गृहभेटीवर लक्ष केंद्रित करु न उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. २०१६-१७ मधील वार्षिक कृती आराखड्यामधील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर २०१६ हा कालावधीत निश्चित करण्यात आली आहे. यासाठी सरकारने प्लॅन बीसाठी अ‍ॅक्शन प्लॅनही तयार केला आहे. यासाठी मार्गदर्शक सूचनांचे फर्मान ६ आॅगस्ट २०१६ रोजी काढले आहे. रायगड जिल्ह्यातील वार्षिक कृती आराखड्यातील शौचालय नसलेल्या ३८१ ग्रामपंचायती आहेत. या अभियानात ग्रामसेवक, तलाठी, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे. ग्रामस्तरावरील पाच हजार ७१५, क्षेत्रीयस्तरावरील १५०, जिल्हास्तरावरील २२५ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कामाची अपेक्षा केली जात आहे. इतरवेळी ग्रामसभांमधून त्यांना फक्त आवाहनच करता येत होते, गृहभेटीमुळे शौचालय नसलेल्यांच्या घरी गेल्याने त्यांच्याशी शेट संवाद साधणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय अभियानासाठी लोकसहभाग आणि लोकसमर्थन मिळविण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे असे कार्यक्र म व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी सांगितले.