शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ प्लॅन बी कार्यान्वित

By admin | Updated: August 11, 2016 04:10 IST

स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याचाच प्रकार असल्याचा प्रत्यय सर्वत्र दिसून येत आहे. या मिशनला जनतेकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही

आविष्कार देसाई, अलिबागस्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याचाच प्रकार असल्याचा प्रत्यय सर्वत्र दिसून येत आहे. या मिशनला जनतेकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मिशन पुढे रेटण्यासाठी सरकारने आता ‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ या नावाने प्लॅन बी कार्यान्वित केला आहे. मिशन यशस्वी करण्यासाठी आधीच सरकारने वेगवेगळ्या प्रकारे नियोजन करु न ठेवले आहे. त्यामुळे एखादा प्लॅन फेल गेला तरी, दुसऱ्या प्लॅनवर त्यांना तातडीने काम करता येणार आहे. सरकारची ही स्ट्रॅटजी प्रशंसनीय असली, तरी त्याचा फायदा कितपत होतो यावरच सर्व काही अवलंबून राहणार आहे.या प्लॅननुसार राज्यातील १८ लाख, तर रायगड जिल्ह्यातील ३५ हजार कुटुंबांच्या गृहभेटीवर लक्ष केंद्रित करु न उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. २०१६-१७ मधील वार्षिक कृती आराखड्यामधील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर २०१६ हा कालावधीत निश्चित करण्यात आली आहे. यासाठी सरकारने प्लॅन बीसाठी अ‍ॅक्शन प्लॅनही तयार केला आहे. यासाठी मार्गदर्शक सूचनांचे फर्मान ६ आॅगस्ट २०१६ रोजी काढले आहे. रायगड जिल्ह्यातील वार्षिक कृती आराखड्यातील शौचालय नसलेल्या ३८१ ग्रामपंचायती आहेत. या अभियानात ग्रामसेवक, तलाठी, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे. ग्रामस्तरावरील पाच हजार ७१५, क्षेत्रीयस्तरावरील १५०, जिल्हास्तरावरील २२५ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कामाची अपेक्षा केली जात आहे. इतरवेळी ग्रामसभांमधून त्यांना फक्त आवाहनच करता येत होते, गृहभेटीमुळे शौचालय नसलेल्यांच्या घरी गेल्याने त्यांच्याशी शेट संवाद साधणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय अभियानासाठी लोकसहभाग आणि लोकसमर्थन मिळविण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे असे कार्यक्र म व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी सांगितले.