शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

पीरवाडी पर्यटनस्थळांचे अस्तित्व धोक्यात; बांधबंदिस्ती उद्ध्वस्त झाल्याने किनाऱ्याची धूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:46 IST

उरणच्या तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर

मधुकर ठाकूरउरण : उरण-पीरवाडी किनाºयाची काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. भरतीच्या लाटांनी नारळी, पोफळी, सुरुची झाडे आणि किनाºयावरील संरक्षक बांधबंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी समुद्र रेषेपासून दहा ते पंधरा मीटर अंतरापर्यंत शिरले आहे. वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही तर समुद्राचे पाणी गावात शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच पीरवाडी पर्यटन स्थळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

पीरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला आहे. निसर्गरम्य वातावरण, अथांग समुद्र, किनाºयावरील लांबचलांब नजरेत पडणारी नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे या नयनरम्य वातावरणामुळे पीरवाडी बीच पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आला आहे. मुंबईपासून अगदी जवळच पीरवाडी बीच असल्याने दरवर्षी येथे येणाºया पर्यटकांची संख्या वाढत आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल आणि इतर भागातून येणाºयांची संख्या अधिक आहे. मात्र उरण-पीरवाडी किनाºयाची अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात धूप होत चालली आहे.

भरतीच्या महाकाय लाटांनी संरक्षक बांधबंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी दहा ते पंधरा मीटर अंतरापर्यंत शिरत आहे. धूप प्रतिबंधक बंधारा नसल्याने या किनाºयाची प्रचंड धूप होऊन नासधूस झाली आहे. त्यामुळे नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. किनाºयावर असलेली स्मशानभूमीदेखील लाटांच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाली आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने उरणमधील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा पीरवाडी बीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही तर समुद्राचे पाणी येथील नागावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पीरवाडी किनाºयावरील जागा खासगी मालकीच्या असल्याने नागरिकांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. मात्र किनाºयाची होणारी धूप, झाडे पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने रायगड जिल्हाधिकाºयांनी याची दखल घेतली असून याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशही उरण तहसीलदारांना दिले आहेत.नागाव किनारा व येथील नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी धूप प्रतिबंधक बंधाºयाची गरज असल्याचा अहवाल उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी जिल्हाधिकाºयांना पाठवला आहे. मात्र त्यानंतरही अद्यापही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी पीरवाडी समुद्र किनाºयाची होणारी धूप सुरूच असून पर्यटन स्थळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.