शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

पीरवाडी पर्यटनस्थळांचे अस्तित्व धोक्यात; बांधबंदिस्ती उद्ध्वस्त झाल्याने किनाऱ्याची धूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:46 IST

उरणच्या तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर

मधुकर ठाकूरउरण : उरण-पीरवाडी किनाºयाची काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. भरतीच्या लाटांनी नारळी, पोफळी, सुरुची झाडे आणि किनाºयावरील संरक्षक बांधबंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी समुद्र रेषेपासून दहा ते पंधरा मीटर अंतरापर्यंत शिरले आहे. वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही तर समुद्राचे पाणी गावात शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच पीरवाडी पर्यटन स्थळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

पीरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला आहे. निसर्गरम्य वातावरण, अथांग समुद्र, किनाºयावरील लांबचलांब नजरेत पडणारी नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे या नयनरम्य वातावरणामुळे पीरवाडी बीच पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आला आहे. मुंबईपासून अगदी जवळच पीरवाडी बीच असल्याने दरवर्षी येथे येणाºया पर्यटकांची संख्या वाढत आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल आणि इतर भागातून येणाºयांची संख्या अधिक आहे. मात्र उरण-पीरवाडी किनाºयाची अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात धूप होत चालली आहे.

भरतीच्या महाकाय लाटांनी संरक्षक बांधबंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी दहा ते पंधरा मीटर अंतरापर्यंत शिरत आहे. धूप प्रतिबंधक बंधारा नसल्याने या किनाºयाची प्रचंड धूप होऊन नासधूस झाली आहे. त्यामुळे नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. किनाºयावर असलेली स्मशानभूमीदेखील लाटांच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाली आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने उरणमधील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा पीरवाडी बीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही तर समुद्राचे पाणी येथील नागावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पीरवाडी किनाºयावरील जागा खासगी मालकीच्या असल्याने नागरिकांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. मात्र किनाºयाची होणारी धूप, झाडे पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने रायगड जिल्हाधिकाºयांनी याची दखल घेतली असून याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशही उरण तहसीलदारांना दिले आहेत.नागाव किनारा व येथील नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी धूप प्रतिबंधक बंधाºयाची गरज असल्याचा अहवाल उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी जिल्हाधिकाºयांना पाठवला आहे. मात्र त्यानंतरही अद्यापही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी पीरवाडी समुद्र किनाºयाची होणारी धूप सुरूच असून पर्यटन स्थळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.