शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

पीरवाडी पर्यटनस्थळांचे अस्तित्व धोक्यात; बांधबंदिस्ती उद्ध्वस्त झाल्याने किनाऱ्याची धूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:46 IST

उरणच्या तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर

मधुकर ठाकूरउरण : उरण-पीरवाडी किनाºयाची काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. भरतीच्या लाटांनी नारळी, पोफळी, सुरुची झाडे आणि किनाºयावरील संरक्षक बांधबंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी समुद्र रेषेपासून दहा ते पंधरा मीटर अंतरापर्यंत शिरले आहे. वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही तर समुद्राचे पाणी गावात शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच पीरवाडी पर्यटन स्थळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

पीरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला आहे. निसर्गरम्य वातावरण, अथांग समुद्र, किनाºयावरील लांबचलांब नजरेत पडणारी नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे या नयनरम्य वातावरणामुळे पीरवाडी बीच पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आला आहे. मुंबईपासून अगदी जवळच पीरवाडी बीच असल्याने दरवर्षी येथे येणाºया पर्यटकांची संख्या वाढत आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल आणि इतर भागातून येणाºयांची संख्या अधिक आहे. मात्र उरण-पीरवाडी किनाºयाची अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात धूप होत चालली आहे.

भरतीच्या महाकाय लाटांनी संरक्षक बांधबंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी दहा ते पंधरा मीटर अंतरापर्यंत शिरत आहे. धूप प्रतिबंधक बंधारा नसल्याने या किनाºयाची प्रचंड धूप होऊन नासधूस झाली आहे. त्यामुळे नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. किनाºयावर असलेली स्मशानभूमीदेखील लाटांच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाली आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने उरणमधील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा पीरवाडी बीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही तर समुद्राचे पाणी येथील नागावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पीरवाडी किनाºयावरील जागा खासगी मालकीच्या असल्याने नागरिकांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. मात्र किनाºयाची होणारी धूप, झाडे पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने रायगड जिल्हाधिकाºयांनी याची दखल घेतली असून याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशही उरण तहसीलदारांना दिले आहेत.नागाव किनारा व येथील नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी धूप प्रतिबंधक बंधाºयाची गरज असल्याचा अहवाल उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी जिल्हाधिकाºयांना पाठवला आहे. मात्र त्यानंतरही अद्यापही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी पीरवाडी समुद्र किनाºयाची होणारी धूप सुरूच असून पर्यटन स्थळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.