शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अधिकाऱ्याच्या नियुक्तीविरोधात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 01:20 IST

भरती प्रक्रियेवेळी पात्र ठरलेल्या तीन उमेदवारांना डावलून चौथ्या क्रमांकाच्या व्यक्तीला सेवेत दाखल करून घेतल्याचा त्यांचा आरोप आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या अग्निशमन विभागात भरती झालेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात अग्निशमन कर्मचाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भरती प्रक्रियेवेळी पात्र ठरलेल्या तीन उमेदवारांना डावलून चौथ्या क्रमांकाच्या व्यक्तीला सेवेत दाखल करून घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल न घेतली गेल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.महापालिकेच्या अग्निशमन विभागात विभागीय अग्निशमन अधिकारी पदासाठी गतवर्षी भरती झाली होती. खुल्या आरक्षण गटातून ही भरती झाली होती. यावेळी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांपैकी चौथ्या क्रमांकाच्या पुरुषोत्तम जाधव यांना नियुक्त करण्यात आले. त्यापूर्वी जाधव हे एमआयडीसीच्या अग्निशमन दलात कार्यरत होते. त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या बढतीच्या आधारे पालिकेत त्याच बरोबरीच्या पदावर घेण्यात आले. मात्र, त्यांना खालच्या पदावरील कामाचा अनुभव नसल्याने कर्मचाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे अग्निशमन कर्मचारी युनियनचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनाच आपत्कालीन प्रसंगातील कामाचा अनुभव नसल्यास एखाद्या दुर्घटनेच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतू शकते, अशीही भीती कर्मचाऱ्यांना आहे, शिवाय जाधव यांनी पदभार स्वीकारताच कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर जोर दिल्याचाही कामगारांचा आरोप आहे. यामुळे त्यांच्या भरतीच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी वर्षभर सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु त्यांच्या तक्रारीची दखल न घेतली गेल्याने कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी जाधव यांच्या भरतीच्या विरोधात याचिका केली असून, न्यायालयाने जनहितार्थ ती दाखल करून घेतली आहे. यामुळे प्रशासनाकडून वशिल्याने भरती केल्या जात असल्याची शंका उपस्थित होत आहे. मात्र, याबाबत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चर्चा करण्यास नकार दिला.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका