शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

महापालिकेतील ‘टक्केवारी’ रडारवर

By admin | Updated: January 22, 2016 02:25 IST

ठाणे महापालिका व प्रशासनाच्या छळाला कंटाळून बिल्डरने आत्महत्या केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. यानंतर आता नवी मुंबई मनपाचे अधिकारीही टक्केवारी घेत

नामदेव मोरे ल्ल नवी मुंबईठाणे महापालिका व प्रशासनाच्या छळाला कंटाळून बिल्डरने आत्महत्या केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. यानंतर आता नवी मुंबई मनपाचे अधिकारीही टक्केवारी घेत असल्याचा आरोप होवू लागला आहे. शिवसेना नगरसेवकांनी १५ ठिकाणी तर उपमहापौरांनी १७ टेबलवरील कर्मचाऱ्यांना खूश करावे लागत असल्याचे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेमध्ये ठेकेदारांकडून टक्केवारी घेतल्याशिवाय बिले दिली जात नाहीत असे आरोप नेहमीच विरोधकांकडून होत असतात. लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीमध्येही याविषयी मोठ्या प्रमाणात आरोप झाले. आतापर्यंत यामधील एकही आरोप सिद्ध झाला नसला तरी नागरिकांना मात्र खरेच टक्केवारीशिवाय कामे होत नसल्याची खात्री पटू लागली आहे. स्टँडिंगमध्ये नेत्रा शिर्के सभापती ााल्यापासून टक्केवारी बंद झाली असल्याचे प्रमाणपत्र भाजपा नगरसेवक रामचंद्र घरत यांनी दिले आहे. याचा अर्थ यापूर्वी टक्केवारी सुरू होती असाच होतो. आतापर्यंत टक्केवारीचे आरोप लोकप्रतिनिधींवर होवू लागले होते. परंतु आता हेच आरोप प्रशासनावर होवू लागले आहेत. यापूर्वी खाजगीमध्ये बोलताना ठेकेदार कोणाला किती पैसे द्यावे लागतात याविषयी माहिती द्यायचे. आता जाहीरपणे याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. उपमहापौर अविनाश लाड यांनी १५ नाही १७ टेबलवर पैसे द्यावे लागत असल्याचे स्पष्ट केले. कोणाला काय द्यावे लागते याची यादीच माझ्याकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने सभागृहातील आरोपांना उत्तर न दिल्यामुळे हे आरोप खरे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाण्यामध्ये बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. यानंतर अंबरनाथमधील बांधकाम व्यावसायिक अमर भाटिया यांनीही बदलापूर नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केली. ही दोन्हीही प्रकरणे राज्यभर गाजू लागली आहेत. बिल्डर व ठेकेदारांची शासकीय कार्यालयामध्ये होत असलेल्या अडवणुकीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईमध्येही ठेकेदारांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: लेखा विभागात बिले मंजूर करून घेण्यासाठी प्रत्येकाला खूश करावे लागत आहे. नामदेव भगत व अविनाश लाड यांनी केलेल्या आरोपामुळे व या विषयावर प्रशासनाने मौन बाळगल्यामुळे त्यामध्ये तथ्य असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अनेक ठेकेदार आम्हाला मोबाइल द्यावा लागला तर काहींनी इतर वस्तूही द्याव्या लागल्याचे सांगण्यास सुरवात केली आहे. वास्तविक कोणीही याविषयी अधिकृत तक्रार केली नसली तरी चर्चेतून ही गोष्ट शहरभर पसरून महापालिकेची बदनामी होत आहे. यामध्ये एका अधिकाऱ्याच्या नावापुढे ६७,८०० रुपये, त्याच विभागातील एका महिला कर्मचाऱ्याच्या नावापुढे ५१,९०० रुपये, दुसऱ्या एका कर्मचाऱ्याच्या नावापुढे ६९,७०० रुपये, दोघांना २२ हजार तर दुसऱ्या दोघांच्या नावापुढे प्रत्येकी २८ हजार रुपयांचा आकडा लिहिला होता. शिवाय त्या विभागातील प्रमुखाचे पद लिहून त्यापुढे चार आकडे लिहून पुढे त्याची बेरीज २,३९,४०० नमूद केली होती. या चिठ्ठीमुळे खळबळ उडाली होती. ठेकेदाराने कागदावर या कर्मचारी व अधिकाऱ्यांची नावे लिहून त्यावर पुढील आकडे का लिहिले होते, सदर रक्कम त्यांना बिले काढण्यासाठी दिली होती का याविषयीही चर्चा झाली होती. परंतु याविषयी कोणीही तक्रार केली नाही. वास्तविक प्रशासनाने ही चिठ्ठी कोणाची आहे व त्यांनी त्यावर का लिहिले होते याची चौकशी करणे आवश्यक आहे.