शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

महामार्गाच्या समस्यांवर लोकप्रतिनिधींचे मौन

By admin | Updated: June 30, 2017 03:07 IST

शासनाने, ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ तत्त्वावर १२२० कोटी रुपये खर्च करून, उभारलेल्या सायन-पनवेल महामार्गाला समस्यांचा विळखा पडला आहे.

नामदेव मोरे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शासनाने, ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ तत्त्वावर १२२० कोटी रुपये खर्च करून, उभारलेल्या सायन-पनवेल महामार्गाला समस्यांचा विळखा पडला आहे. ठेकेदाराने काम अर्धवट ठेवले आहे. पादचारी पूल, भुयारी मार्गाचे काम रखडले आहे. पथदिवे बंद असून, पूर्ण रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रोज १० लाख प्रवाशांना अडथळ्यांचा प्रवास पार करावा लागत असून, या प्रश्नावर आजी-माजी पालकमंत्री दोन, खासदार, पनवेल, नवी मुंबईमधील विधानपरिषद व विधानसभेचे एकूण पाच आमदार व नगरसेवकांनी मौन बाळगले आहे. एकाही राजकीय पक्षांनी या प्रश्नावर आंदोलन करण्याचा साधा इशाराही दिला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सायन-पनवेल महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर बहुतांश सर्वच राजकीय पक्षांनी छोट्या-मोठ्या कारणांवरून आंदोलने करून, शासन व ठेकेदारांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. खारघर टोलनाक्याच्या मुद्द्यावरूनही सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. नवी मुंबईमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जनहित याचिका दाखल करून आम्हालाच प्रवाशांची काळजी असल्याचा भास निर्माण केला होता; परंतु टोल सुरू झाल्यानंतर ठेकेदाराने शिल्लक राहिलेली कामे पूर्ण केली नाहीत. पहिल्याच पावसात पूर्ण महामार्ग खड्ड्यात गेल्यानंतरही कोणीच आंदोलने केली नव्हती. यावर्षी पहिल्याच पावसात महामार्गाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. उरणफाट्यावरील उड्डाणपुलावर एका महिन्यात ५०पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. वाहतूकदार व प्रवासी त्रस्त आहेत; पण या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी एकदाही सायन-पनवेल महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला नाही. रोडवरील अर्धवट अवस्थेमध्ये असलेल्या कामांची पाहणीही केलेली नाही. ठाण्याचे खासदार राजन विचारे नवी मुंबईत आले की, रेल्वेस्टेशन व पालिका मुख्यालय यापेक्षा दुसरीकडे जातच नाहीत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे दर्शनच दुर्मीळ झाले आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक व बेलापूरच्या मंदा म्हात्रे या नागरी समस्यांसाठी नेहमीच पाठपुरावा करतात; परंतु सायन-पनवेल महामार्गाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी टोल बंद करण्यासाठी राजीनामा दिला; पण कामे मार्गी लावण्यासाठी अवाक्षरही काढलेले नाही. विधानपरिषद सदस्य नरेंद्र पाटील व बाळाराम पाटील यांच्यासह नवी मुंबई व पनवेलमधील नगरसेवक व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनीही महामार्गाचे काम पूर्ण व्हावे व देखभाल दुरुस्तीची कामे वेळेवर करावी, या मागणीसाठी आंदोलन केले नाही व सरकारी अधिकारी व मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केलेला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.