शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या समस्यांवर लोकप्रतिनिधींचे मौन

By admin | Updated: June 30, 2017 03:07 IST

शासनाने, ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ तत्त्वावर १२२० कोटी रुपये खर्च करून, उभारलेल्या सायन-पनवेल महामार्गाला समस्यांचा विळखा पडला आहे.

नामदेव मोरे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शासनाने, ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ तत्त्वावर १२२० कोटी रुपये खर्च करून, उभारलेल्या सायन-पनवेल महामार्गाला समस्यांचा विळखा पडला आहे. ठेकेदाराने काम अर्धवट ठेवले आहे. पादचारी पूल, भुयारी मार्गाचे काम रखडले आहे. पथदिवे बंद असून, पूर्ण रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रोज १० लाख प्रवाशांना अडथळ्यांचा प्रवास पार करावा लागत असून, या प्रश्नावर आजी-माजी पालकमंत्री दोन, खासदार, पनवेल, नवी मुंबईमधील विधानपरिषद व विधानसभेचे एकूण पाच आमदार व नगरसेवकांनी मौन बाळगले आहे. एकाही राजकीय पक्षांनी या प्रश्नावर आंदोलन करण्याचा साधा इशाराही दिला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सायन-पनवेल महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर बहुतांश सर्वच राजकीय पक्षांनी छोट्या-मोठ्या कारणांवरून आंदोलने करून, शासन व ठेकेदारांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. खारघर टोलनाक्याच्या मुद्द्यावरूनही सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. नवी मुंबईमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जनहित याचिका दाखल करून आम्हालाच प्रवाशांची काळजी असल्याचा भास निर्माण केला होता; परंतु टोल सुरू झाल्यानंतर ठेकेदाराने शिल्लक राहिलेली कामे पूर्ण केली नाहीत. पहिल्याच पावसात पूर्ण महामार्ग खड्ड्यात गेल्यानंतरही कोणीच आंदोलने केली नव्हती. यावर्षी पहिल्याच पावसात महामार्गाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. उरणफाट्यावरील उड्डाणपुलावर एका महिन्यात ५०पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. वाहतूकदार व प्रवासी त्रस्त आहेत; पण या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी एकदाही सायन-पनवेल महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला नाही. रोडवरील अर्धवट अवस्थेमध्ये असलेल्या कामांची पाहणीही केलेली नाही. ठाण्याचे खासदार राजन विचारे नवी मुंबईत आले की, रेल्वेस्टेशन व पालिका मुख्यालय यापेक्षा दुसरीकडे जातच नाहीत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे दर्शनच दुर्मीळ झाले आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक व बेलापूरच्या मंदा म्हात्रे या नागरी समस्यांसाठी नेहमीच पाठपुरावा करतात; परंतु सायन-पनवेल महामार्गाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी टोल बंद करण्यासाठी राजीनामा दिला; पण कामे मार्गी लावण्यासाठी अवाक्षरही काढलेले नाही. विधानपरिषद सदस्य नरेंद्र पाटील व बाळाराम पाटील यांच्यासह नवी मुंबई व पनवेलमधील नगरसेवक व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनीही महामार्गाचे काम पूर्ण व्हावे व देखभाल दुरुस्तीची कामे वेळेवर करावी, या मागणीसाठी आंदोलन केले नाही व सरकारी अधिकारी व मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केलेला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.