शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण
3
जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 
4
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
5
Stock Market Today: सेन्सेक्स २०७ अंकांच्या तेजीसह उघडला, Nifty २५ हजार पार; 'या'मुळे बाजारात जोरदार तेजी
6
२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये
7
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
8
अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की
9
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
10
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
11
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
12
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
13
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
14
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
15
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
17
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
18
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
19
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
20
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील

पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: October 26, 2015 01:04 IST

गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीत सातत्याने पाणीटंचाईची भेडसावत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

कळंबोली : गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीत सातत्याने पाणीटंचाईची भेडसावत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. कळंबोली वसाहतीची लोकसंख्या ही दोन लाखांच्या आसपास पोहचली असून वसाहतीला ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. सिडकोकडे नवीन पनवेल व कळंबोली नोडला पाणीपुरवठा करण्याकरिता कोणतीच सोय नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी विकत घेवून ते रहिवाशांना पुरवले जाते. एमजेपी पाताळगंगा नदीतून पाणी उचलून ते भोकरपाडा येथे शुध्द करते आणि त्या ठिकाणाहून जलवाहिन्यांव्दारे सिडको, पनवेल नगरपालिका आणि जेएनपीटीला पाणी दिले जाते. मात्र या वाहिन्या अतिशय जुनाट झाल्या असल्याने त्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे जवळपास २५ टक्के पाण्याची गळती होत आहे.वाहिन्या दुरूस्त करण्याकरिता वारंवार शटडाऊन घेतला जातो. त्यामुळे सिडको वसाहतींना पाणी टंचाईला वारंवार सामोरे जावे लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून २० ते २२ एमएलडी पेक्षा जास्त पाणी कळंबोलीला मिळत नाही. त्यामुळे या वसाहतीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रहिवासी सिडको कार्यालयावर मोर्चे घेऊन येतात. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका प्रमुख वासुदेव घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी धडक दिली. यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पाण्याचा अपव्यय कमी करून बाहेर जाणारे टँकर बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)