शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग समित्यांचा प्रस्ताव प्रलंबित

By admin | Updated: August 18, 2016 04:59 IST

पालिकेच्या निवडणुका होऊन दीड वर्ष झाल्यानंतरही अद्याप प्रभाग समित्या गठीत झालेल्या नाहीत. राष्ट्रवादीने गोंधळामध्ये मंजूर केलेला प्रस्ताव शासनाने स्थगित केला होता.

नवी मुंबई : पालिकेच्या निवडणुका होऊन दीड वर्ष झाल्यानंतरही अद्याप प्रभाग समित्या गठीत झालेल्या नाहीत. राष्ट्रवादीने गोंधळामध्ये मंजूर केलेला प्रस्ताव शासनाने स्थगित केला होता. याविषयी ३० दिवसांमध्ये पालिकेने मत सादर करणे आवश्यक होते. जानेवारीपासून सचिवांनी दोन वेळा पत्र देऊन महापौरांनी विषयपत्रिकेमध्ये हा प्रस्ताव घेतला नसल्याची माहिती प्रशासनाने सर्वसाधारण सभेत दिली आहे. महापौरपदाचा निवडणुकीनंतर प्रभाग समित्या गठीत करणे आवश्यक असते, परंतु एप्रिल २०१५मध्ये निवडणुका झाल्यानंतर प्रभाग समित्यांची रचनाच केली नव्हती. दिघा व ऐरोली प्रभाग समिती विरोधकांच्या ताब्यात जाण्याची शक्यता असल्यामुळे सत्ताधारी हा विषय घेत नसल्याचा आरोप केला जात होता. प्रभाग समित्या नसल्याने नगरसेवक व प्रभाग समिती निधीतून काहीही कामे करता येत नाही. प्रभागांमध्ये गटारावर झाकणे बसविणे, पदपथ दुरुस्ती व इतर अत्यावश्यक कामे करणेही अवघड झाले आहे. नगरसेवकांमधील नाराजी वाढू लागल्यामुळे अखेर आॅगस्ट २०१५ची तहकूब सभा २० तारखेला घेण्यात आली. तातडीचे कामकाज म्हणून प्रभाग समित्यांचा विषय चर्चेला ठेवण्यात आला, परंतु शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. प्रभाग समित्यांची रचना चुकीची असून, आयत्या वेळचा ठराव तहकूब सभेत घेता येत नसल्याचे मत व्यक्त केले होते, परंतु राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केला होता. यामुळे भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या नगरसेवकांनी शासनाकडे धाव घेतली व मुख्यमंत्र्यांकडून हा प्रस्थाव स्थगित केला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी सर्वसाधारण सभेत याविषयी प्रश्न विचारला होता. प्रभाग समित्या वेळेत याविषयी प्रशासनाने लेखी उत्तर दिले असून, प्रभाग समित्यांविषयीचा सर्व प्रवास मांडला आहे. २० आॅगस्ट २०१५ मध्ये झालेल्या तहकूब सभेमध्ये मंजूर केलेला प्रस्ताव शासनाने जानेवारी २०१६ मध्ये निलंबित केला आहे. शासनाने याविषयी महापालिकेस काही मत सादर करायचे असेल, तर एक महिन्यात कळविण्यास सांगितले होते. या अनुषंगाने संचीव चित्रा बावीस्कर यांनी १७ जानेवारी व ६ फेब्रुवारीला महापौरांना पत्र देऊन हा विषय पटलावर घेण्याची विनंती केली होती, परंतु महापौरांनी हा विषय पटलावर घेतला नाही. याविषयी महापौरांशी समक्ष चर्चाही करण्यात आली, परंतु त्यानंतरही हा विषय सभागृहात न मांडल्यामुळे, अखेर आयुक्तांनी जुलै २०१६ मध्ये शासनास पुढील निर्णय घेण्याविषयीचे पत्र दिले आहे. पत्रव्यवहार सादरप्रभाग समित्या अद्याप का गठीत झाल्या नाहीत, या प्रश्नावर उत्तर देताना प्रशासनाने यासाठी शासन व महापौरांबरोबर झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती जोडल्या आहेत. यामुळे महापौरांनीच विषय सभागृहासमोर ठेवला नसल्याचे दिसू लागले आहे. यामुळे गुरुवारी तहकूब सभेत यावर काही चर्चा होणार का, याकडे लक्ष लागले आहे.