शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

हातगाड्यांनी अडविली पादचाऱ्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:45 IST

शहरातील रस्त्यांवर जागा मिळेल तेथे हातगाडी लावून खाद्यपदार्थांची विक्री केली जात असून या गाड्यांमुळे रस्ता अडविला जात आहे.

नवी मुंबई : शहरातील रस्त्यांवर जागा मिळेल तेथे हातगाडी लावून खाद्यपदार्थांची विक्री केली जात असून या गाड्यांमुळे रस्ता अडविला जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासणीच होत नसल्याने खाद्यपदार्थ विके्रते बिनधास्तपणे व्यवसाय करत आहेत. शहरातील रेल्वे स्थानक, उद्याने, बस डेपो, मॉल्स, शासकीय कार्यालयाजवळील पार्किंगची जागा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावरील पदार्थांची विक्री केली जाते.रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्र ी केली जात असून मध्यरात्रीपर्यंत अशाप्रकारे रस्त्यावरील मुख्य परिसरातील वाट अडवून खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. हातगाड्यांवर विकल्या जाणाºया चायनीज पदार्थांमध्ये अजीनोमोटोसारख्या घातक पदार्थाचा वापर यामध्ये केला जातो. रात्रीच्या वेळी शहरातील उड्डाणपुलांच्या खालीदेखील खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या केल्याचे चित्र पहायला मिळते. या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जात नसल्याने निर्धास्तपणे खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. शहरातील सर्वच रस्त्यावर हातगाडी आणि स्टॉल लावून खाद्यपदार्थांची विक्र ी होते. सोसाट्याच्या वाºयासह वाहणारी धूळ, वाहनांमुळे उडणारी धूळ थेट खाद्यपदार्थांवर बसते. हेच पदार्थ ग्राहकांना विक्र ी होत असल्याने अनेक विकारांना आमंत्रण मिळत आहे. सीबीडी सेक्टर आठ परिसरातील विनापरवाना दूध, व दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्याविरोधात तक्रारही नोंदविण्यात आली आहे.अशाप्रकारे परवाना नसतानाही खाद्यपदार्थांची विक्री केली असल्याचे प्रकारही उघडकीस आलेले आहेत. तरीदेखील कार्यवाहीअभावी निर्धास्तपण पदपथावरील जागा गिळंकृत केली जात असल्याचे चित्र पहायला मिळते.>रेल्वे प्रवासी हैराणवाशी, नेरुळ, सानपाडा येथील रेल्वे स्थानकांबाहेर संध्याकाळनंतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून संपूर्ण परिसरातील जागा अडविली जात असून रात्री उशिरापर्यंत याठिकाणी व्यवसाय सुरु असल्याचे चित्र दिसून येते. दिवसेंदिवस विक्रेत्यांची संख्या वाढत असून रेल्वे स्थानकाबाहेरील संपूर्ण पदपथावर अतिक्रमण केले आहे. काही विक्रेते याठिकाणीच अन्न शिजवत असून उरलेला ओला कचरा देखील परिसरातच टाकत असल्याने दुर्गंधी पसरते. नेरुळ रेल्वे स्थानक तसेच सानपाडा येथील रेल्वे स्थानकांवरही अशीच काहीशी परिस्थिती पहायला मिळते. प्रशासकीय कारवाईअभावी हे विक्रेते निर्धास्तपणे व्यवसाय करत असून पादचारी, प्रवाशांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.बेलापूर कोकण भवन परिसरातील पदपथ, पार्किंगची जागा देखील बळकावली गेली असून याठिकाणी मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पहायला मिळते. शहरातील हे चित्र पाहून या विक्रेत्यांना हटविण्यात महापालिकेला पुरेसे यश न मिळाल्याचे दिसून येते. रेल्वे स्थानकाबाहेरील विक्रेत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून कारवाईअभावी उघड्यावरील अन्नपदार्थांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे.चायनीज पदार्थांबरोबरच शीतपेयांची विक्री केली जाते. याकरिता वापरले जाणारे पाणी, बर्फ पिण्यास योग्य नसल्याने नागरिकांना विविध आजारांचे बळी पडावे लागते. पदार्थांची विक्री करताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक परिसरात कचराकुंडी शेजारी अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरी आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित चायनिज धाब्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.>स्टेशनच्या बाहेर पडताच याठिकाणी असलेल्या विके्रत्यांमुळे मार्ग काढणे मुश्कील होते. पदपथाचा वापर करता येत नसून मुख्य रस्त्यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागते. संध्याकाळच्या वेळी याठिकाणी ग्राहक, खाद्यप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रेल्वे स्थानकाबाहेर पडणे अवघड होते. ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत अशा ठिकाणी देखील बॅटरीचा वापर करून अनधिकृत स्टॉल्स चालविले जातात.- अपूर्वा कामठेकर, महिला प्रवासी