शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

हातगाड्यांनी अडविली पादचाऱ्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:45 IST

शहरातील रस्त्यांवर जागा मिळेल तेथे हातगाडी लावून खाद्यपदार्थांची विक्री केली जात असून या गाड्यांमुळे रस्ता अडविला जात आहे.

नवी मुंबई : शहरातील रस्त्यांवर जागा मिळेल तेथे हातगाडी लावून खाद्यपदार्थांची विक्री केली जात असून या गाड्यांमुळे रस्ता अडविला जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासणीच होत नसल्याने खाद्यपदार्थ विके्रते बिनधास्तपणे व्यवसाय करत आहेत. शहरातील रेल्वे स्थानक, उद्याने, बस डेपो, मॉल्स, शासकीय कार्यालयाजवळील पार्किंगची जागा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावरील पदार्थांची विक्री केली जाते.रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्र ी केली जात असून मध्यरात्रीपर्यंत अशाप्रकारे रस्त्यावरील मुख्य परिसरातील वाट अडवून खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. हातगाड्यांवर विकल्या जाणाºया चायनीज पदार्थांमध्ये अजीनोमोटोसारख्या घातक पदार्थाचा वापर यामध्ये केला जातो. रात्रीच्या वेळी शहरातील उड्डाणपुलांच्या खालीदेखील खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या केल्याचे चित्र पहायला मिळते. या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जात नसल्याने निर्धास्तपणे खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. शहरातील सर्वच रस्त्यावर हातगाडी आणि स्टॉल लावून खाद्यपदार्थांची विक्र ी होते. सोसाट्याच्या वाºयासह वाहणारी धूळ, वाहनांमुळे उडणारी धूळ थेट खाद्यपदार्थांवर बसते. हेच पदार्थ ग्राहकांना विक्र ी होत असल्याने अनेक विकारांना आमंत्रण मिळत आहे. सीबीडी सेक्टर आठ परिसरातील विनापरवाना दूध, व दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्याविरोधात तक्रारही नोंदविण्यात आली आहे.अशाप्रकारे परवाना नसतानाही खाद्यपदार्थांची विक्री केली असल्याचे प्रकारही उघडकीस आलेले आहेत. तरीदेखील कार्यवाहीअभावी निर्धास्तपण पदपथावरील जागा गिळंकृत केली जात असल्याचे चित्र पहायला मिळते.>रेल्वे प्रवासी हैराणवाशी, नेरुळ, सानपाडा येथील रेल्वे स्थानकांबाहेर संध्याकाळनंतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून संपूर्ण परिसरातील जागा अडविली जात असून रात्री उशिरापर्यंत याठिकाणी व्यवसाय सुरु असल्याचे चित्र दिसून येते. दिवसेंदिवस विक्रेत्यांची संख्या वाढत असून रेल्वे स्थानकाबाहेरील संपूर्ण पदपथावर अतिक्रमण केले आहे. काही विक्रेते याठिकाणीच अन्न शिजवत असून उरलेला ओला कचरा देखील परिसरातच टाकत असल्याने दुर्गंधी पसरते. नेरुळ रेल्वे स्थानक तसेच सानपाडा येथील रेल्वे स्थानकांवरही अशीच काहीशी परिस्थिती पहायला मिळते. प्रशासकीय कारवाईअभावी हे विक्रेते निर्धास्तपणे व्यवसाय करत असून पादचारी, प्रवाशांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.बेलापूर कोकण भवन परिसरातील पदपथ, पार्किंगची जागा देखील बळकावली गेली असून याठिकाणी मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पहायला मिळते. शहरातील हे चित्र पाहून या विक्रेत्यांना हटविण्यात महापालिकेला पुरेसे यश न मिळाल्याचे दिसून येते. रेल्वे स्थानकाबाहेरील विक्रेत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून कारवाईअभावी उघड्यावरील अन्नपदार्थांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे.चायनीज पदार्थांबरोबरच शीतपेयांची विक्री केली जाते. याकरिता वापरले जाणारे पाणी, बर्फ पिण्यास योग्य नसल्याने नागरिकांना विविध आजारांचे बळी पडावे लागते. पदार्थांची विक्री करताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक परिसरात कचराकुंडी शेजारी अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरी आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित चायनिज धाब्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.>स्टेशनच्या बाहेर पडताच याठिकाणी असलेल्या विके्रत्यांमुळे मार्ग काढणे मुश्कील होते. पदपथाचा वापर करता येत नसून मुख्य रस्त्यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागते. संध्याकाळच्या वेळी याठिकाणी ग्राहक, खाद्यप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रेल्वे स्थानकाबाहेर पडणे अवघड होते. ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत अशा ठिकाणी देखील बॅटरीचा वापर करून अनधिकृत स्टॉल्स चालविले जातात.- अपूर्वा कामठेकर, महिला प्रवासी