शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळ येथील पादचारी पूल धोकादायक; दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:42 IST

सिडको, महापालिकेच्या पाठपुराव्याला केराची टोपली, खर्चासाठी तयार असतानाही रेल्वेचे मौन

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : नेरुळ येथील रेल्वेरुळावरील पादचारी पूल जीर्ण झाल्याने तो वापरासाठी बंद करण्यात आला आहे. त्याठिकाणी नव्या पुलाची आवश्यकता असल्याने त्यासाठी पालिका खर्च करण्यास तयार असतानाही रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे जीर्ण झालेला पूल रेल्वेवर कोसळून त्याठिकाणी मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.नेरुळ येथील सेक्टर ८ व २९ या पूर्व व पश्चिमेकडील भागाला जोडण्यासाठी सुमारे २० वर्षांपूर्वी सिडकोने रेल्वेरुळावर पादचारी पूल उभारलेला आहे. हा पूल सद्यस्थितीला जीर्ण झाल्याने कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहे. दोन दिवसांपासून पालिकेने या पुलाचा वापर करण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे एका विभागातून दुसऱ्या विभागात जाण्यासाठी पादचाऱ्यांना लांबचे अंतर कापावे लागत आहे. सदर पूल अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत असल्याने त्याठिकाणी नवा पूल उभारण्याची नागरिकांची मागणी आहे. त्या अनुषंगाने नगरसेविका सुनीता रतन मांडवे यांनी पालिकेकडे पाठपुरावा करून नव्या पुलासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. मात्र सद्यस्थितीतला पूल सिडकोने बांधलेला असल्याने त्याची डागडुजी अथवा नवा पूल देखील त्यांनी करावा, अशी मागणी पालिकेने सिडकोकडे केली आहे. त्याला अनुसरून सिडकोने ही जागा रेल्वेच्या क्षेत्रात असल्याने सदर निर्णय रेल्वे प्रशासनावर सोपवला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून सिडको अथवा पालिकेला कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. पर्यायी खासदार राजन विचारे यांच्यासह पालिका आयुक्तांनी स्वत: पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासन जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.रेल्वे प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे त्याठिकाणी गंभीर दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. नेरुळ येथील रेल्वेरुळावरील या पादचारी पुलाला जागोजागी तडे गेले आहेत. तर पुलाच्या खालच्या भागाचे प्लास्टर ढासळून सळ्या उघड्यावर आल्या आहेत. यानंतरही अनेक वर्षे हा पूल वापरात ठेवल्यानंतर दोन दिवसांपूर्वी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने त्याचा वापर बंद केला आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या दोन टोकांव्यतिरिक्त मध्यभागी कोणत्याही प्रकारचा आधार देण्यात आलेला नाही. यामुळे पादचाºयांसाठी पुलाचा वापर बंद केलेला असला तरीही जीर्ण झालेल्या पुलाच्या भागात पावसाचे पाणी मुरल्यास अथवा पुलाखालून जाणाºया रेल्वेच्या हादºयानेही तो कोसळण्याची भीती आहे. अशावेळी पुलाचा एखादा भाग रेल्वेवर कोसळल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.तीन महिन्यांपूर्वी वाशीतील मिनी सीशोर येथील जीर्ण अवस्थेतील पादचारी पुलाचा भाग कोसळून दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली होती.पादचाºयांसाठी तूर्तास पुलास वापर बंदरेल्वेरुळावरील अंधेरी येथील गोखले पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर रेल्वेरुळावरील जुन्या सर्वच पुलांबाबत रेल्वे प्रशासनाकडून गांभीर्याने घेतले जाणे आवश्यक आहे. त्यानंतरही नेरुळ येथील पादचारी पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीमध्ये असतानाही त्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावरून रेल्वे प्रशासनाला त्याठिकाणी गंभीर दुर्घटनेचीच प्रतीक्षा असल्याची साशंकता व्यक्त होत आहे.नेरुळ पूर्व व पश्चिम भागाला जोडण्यासाठी सेक्टर ८ येथील पादचारी पूल सोयीस्कर आहे. त्यावरून दररोज शेकडो पादचारी एका विभागातून दुसºया विभागात प्रवास करायचे. त्यामध्ये लहान थोरांसह विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र धोकादायक झाल्याने पुलाचा वापर बंद केल्याने त्या सर्वांची गैरसोय झाली आहे.नेरुळ सेक्टर ८ व २९ या दोन भागांना जोडण्यासाठी रेल्वेरुळावरील सुमारे २० वर्षांपूर्वीचा पादचारी पूल एकमेव सोयीचा पर्याय आहे. सदर पूल धोकादायक झाल्याने पुलावरून प्रवास करणाºया पादचाºयांसह पुलाखालील रेल्वेतून प्रवास करणाºया रेल्वे प्रवाशांच्या जीवावर मृत्यूची टांगती तलवार निर्माण झाली आहे. मात्र पालिकेसह सिडकोने पाठपुरावा करून देखील रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. - सुनीता मांडवे, नगरसेविका