शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

इंदिरानगरमध्ये पथ‘दिव्यांखाली’ अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 04:19 IST

तुर्भे इंदिरानगर परिसरातील पथदिवे बंद असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. यासंबंधी पालिकेच्या विद्युत विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे

नवी मुंबई : तुर्भे इंदिरानगर परिसरातील पथदिवे बंद असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. यासंबंधी पालिकेच्या विद्युत विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. पथदिवे बंद असल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी गुन्हेगारी घटना घडत आहेत.पालिकेच्या विद्युत विभागाच्या नाकर्तेपणामुळे तुर्भेत ‘दिव्याखाली अंधार’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण-महापे मार्गावर, तसेच इंदिरानगर ते बगाडे कंपनी दरम्यान पादचाºयांना ही समस्या भेडसावत आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून या मार्गावरील पथदिवे बंद आहेत. अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठा खंडित झालेला असून, काही ठिकाणचे दिवेच नादुरुस्त स्थितीत आहेत. औद्योगिक क्षेत्रातले हे महत्त्वाचे मार्ग असल्यामुळे दिवस-रात्र त्यावर रहदारी सुरू असते. शिवाय, अनेक चाकरमानी पायी या मार्गाचा वापर करत असतात; परंतु पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांची गैरसोय होत आहे. अंधाराचा आधार घेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती पादचाºयांना लुटत आहेत. तर भरधाव वाहनांकडून पादचाºयांना धडक लागून अपघाताचीही शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सदर मार्गावरील पथदिवे सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी केली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी पालिकेच्या विद्युत विभागाला दिले असून, दिव्याखालचा अंधार दूर करण्याची मागणी केली आहे. मात्र, पालिकेच्या नाकर्तेपणामुळे त्या ठिकाणच्या परिस्थितीमध्ये सुधार घडत नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. परिणामी भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे कोठीवाले यांचे म्हणणे आहे.