शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

इंदिरानगरमध्ये पथ‘दिव्यांखाली’ अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 04:19 IST

तुर्भे इंदिरानगर परिसरातील पथदिवे बंद असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. यासंबंधी पालिकेच्या विद्युत विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे

नवी मुंबई : तुर्भे इंदिरानगर परिसरातील पथदिवे बंद असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. यासंबंधी पालिकेच्या विद्युत विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. पथदिवे बंद असल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी गुन्हेगारी घटना घडत आहेत.पालिकेच्या विद्युत विभागाच्या नाकर्तेपणामुळे तुर्भेत ‘दिव्याखाली अंधार’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण-महापे मार्गावर, तसेच इंदिरानगर ते बगाडे कंपनी दरम्यान पादचाºयांना ही समस्या भेडसावत आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून या मार्गावरील पथदिवे बंद आहेत. अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठा खंडित झालेला असून, काही ठिकाणचे दिवेच नादुरुस्त स्थितीत आहेत. औद्योगिक क्षेत्रातले हे महत्त्वाचे मार्ग असल्यामुळे दिवस-रात्र त्यावर रहदारी सुरू असते. शिवाय, अनेक चाकरमानी पायी या मार्गाचा वापर करत असतात; परंतु पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांची गैरसोय होत आहे. अंधाराचा आधार घेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती पादचाºयांना लुटत आहेत. तर भरधाव वाहनांकडून पादचाºयांना धडक लागून अपघाताचीही शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सदर मार्गावरील पथदिवे सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी केली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी पालिकेच्या विद्युत विभागाला दिले असून, दिव्याखालचा अंधार दूर करण्याची मागणी केली आहे. मात्र, पालिकेच्या नाकर्तेपणामुळे त्या ठिकाणच्या परिस्थितीमध्ये सुधार घडत नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. परिणामी भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे कोठीवाले यांचे म्हणणे आहे.