शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

प्रवाशाने काढली प्रशासनाची लक्तरे; घाणीतच ठिय्या मांडून आंदोलन

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 3, 2023 16:10 IST

रस्त्यावरील अस्वचतेची तक्रार करूनही दुर्लक्ष, प्रशासनाने तिथले घाणीचे ढिगारे न हटवल्यास शुक्रवारी स्वखर्चाने आपण ते हटवू असा इशारा देऊन प्रशासनाची लक्तरे काढली 

नवी मुंबई : बस थांब्याच्या समोरच रस्त्यावर साचलेल्या घाणीमुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाची तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने प्रवास्याने चक्क घाणीतच बसून आंदोलन पुकारले. सायन पनवेल मार्गावरील वाशी येथील बस थांब्यावर गुरुवारी दुपारी संतप्त प्रवास्याने हा प्रकार केला. त्याठिकाणी साचलेल्या घाणीमुळे प्रवास्यांना होत असलेल्या त्रासातून सुटकेसाठी त्यांनी हे आंदोलन केले. 

नवी मुंबईत स्वच्छता अभियान राबवले जात असले तरीही अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. त्यात सायन पनवेल मार्गाचाही समावेश आहे. अशाच प्रकारातून सायन पनवेल मार्गावर वाशी येथील एसटीच्या थांब्यासमोरच मोठ्या प्रमाणात घाण साचली होती. यामुळे वाशी येथून बसने प्रवास करणाऱ्या प्रवास्यांना या घाणीला सामोरे जावे लागत आहे. त्यात डासांची पैदास होऊन आरोग्याला देखील धोका निर्माण होत आहे.

तीन दिवसांपूर्वी घणसोली येथील रहिवाशी जयवंत निकम हे सातारा येथे जाण्यासाठी बस थांब्यावर आले असता त्यांना तिथल्या घाणीचा त्रास झाला. यामुळे त्यांनी महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयात तक्रार केली असता त्यांनी तिथला गाळ एकत्र करून रस्त्यावरच त्याचा ढिगारे लावले. तर घाणीचे हे ढिगारे उचलण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे गुरुवारी निकम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता त्यांना रस्त्यावरील घाण काढण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही प्रशासनाकडून स्वच्छतेच्या कामात होत असलेल्या टोलवाटोलवीला कंटाळून निकम यांनी अखेर घाणीच्या ढिगाऱ्यावरच बसून दोन्ही प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच संपूर्ण दिवसभर ढिगाऱ्यावर बसून त्यांनी आंदोलन केले. यानंतर देखील प्रशासनाने तिथले घाणीचे ढिगारे न हटवल्यास शुक्रवारी स्वखर्चाने आपण ते हटवू असा इशारा देऊन प्रशासनाची लक्तरे काढली.