शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेवर वर्चस्वासाठी पक्षांची धडपड

By admin | Updated: January 10, 2015 22:36 IST

पंचायत समितींवर वर्चस्व मिळवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकींमध्ये सर्वच राजकीय पक्ष आपले सर्वस्वी पणाला लावतील असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत आहे.

वसई : नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्हयातील जिल्हापरिषद व पंचायत समितींवर वर्चस्व मिळवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकींमध्ये सर्वच राजकीय पक्ष आपले सर्वस्वी पणाला लावतील असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा पटकवणाऱ्या बहुजन विकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा लढवण्याच्या दृष्टीने तयारी चालवली आहे. प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका घेण्यात येत आहेत. या निवडणुकीमध्ये आघाडी कोणत्याही राजकीय पक्षासमवेत जागा वाटपाबाबत समझोता करणार नसल्याचे वृत्त आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस बरोबर केलेल्या समझोत्यामुळे त्यांना जबर फटका बसला त्या अनुभवातुन शहाणे होत बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भुमीका स्विकारली. या त्यांच्या निर्णयाला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.स्वबळावर निवडणुक लढवण्याचा निर्णय अद्याप जाहीर केला नसला तरी त्या दृष्टीने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यस्तरावर त्यांनी भाजपच्या सरकारला बिनशर्त पाठींबा देऊ केला असला तरी या निवडणुकांमध्ये ते भाजपा बरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. राज्य मंत्रीमंडळात सेना सहभागी झाली असली तरी स्थानिक पातळीवर त्यांची युती होण्याची शक्यता धुसर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने वसई मतदारसंघात अचानक माघार घेऊन सेना पुरस्कृत विवेक पंडीत यांना पाठींबा जाहीर केला. तरीही पंडीत यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच नालासोपारा मतदारसंघात सेना व भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे मतविभागणीचा फायदा बहुजन विकास आघाडीच्या क्षितीज ठाकूर यांना झाला. युती झाली असली तरी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मने अद्याप जुळलेली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकदिलाने एकमताने निवडणुकीला सामोरे जातील अशी शक्यता फार कमी आहे. पालघर तालुक्यात सेनेने विधानसभा जागा जिंकुन गमावलेले वैभव पुन्हा मिळवले आहे. नगरपरिषद, पंचायत समिती व आता विधानसभेची जागा त्यांनी जिंकल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असलेला बेबनाव अद्याप कायम असल्यामुळे या निवडणुका यशस्वीरित्या लढवणे काँग्रेस पक्षाला अशक्य आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षामध्ये आघाडी असतानाही येथील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मात्र एकमेकांवर सतत कुरघोडी करत राहीले. काँग्रेसचे अस्तित्व बऱ्यापैकी होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र वाताहत झाली. वसई तालुक्याप्रमाणे पालघर तालुक्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुका लढवणे शक्य होणार नाही. या दोन्ही तालुक्यात पक्षाची कार्यकारीणी अस्तित्वात नसल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ते नसतील. डहाणू तालुक्यात एकेकाळी राष्ट्रवादीचे प्राबल्य होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दणदणीत विजय मिळविला. परंतु यंदा विधानसभा निवडणुकीत या पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगलीच पिछेहाट झाली. परंतु पक्षाचे अस्तित्व काही प्रमाणात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे करतील. (प्रतिनिधी)