शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

जिल्हा परिषदेवर वर्चस्वासाठी पक्षांची धडपड

By admin | Updated: January 10, 2015 22:36 IST

पंचायत समितींवर वर्चस्व मिळवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकींमध्ये सर्वच राजकीय पक्ष आपले सर्वस्वी पणाला लावतील असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत आहे.

वसई : नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्हयातील जिल्हापरिषद व पंचायत समितींवर वर्चस्व मिळवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकींमध्ये सर्वच राजकीय पक्ष आपले सर्वस्वी पणाला लावतील असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा पटकवणाऱ्या बहुजन विकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा लढवण्याच्या दृष्टीने तयारी चालवली आहे. प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका घेण्यात येत आहेत. या निवडणुकीमध्ये आघाडी कोणत्याही राजकीय पक्षासमवेत जागा वाटपाबाबत समझोता करणार नसल्याचे वृत्त आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस बरोबर केलेल्या समझोत्यामुळे त्यांना जबर फटका बसला त्या अनुभवातुन शहाणे होत बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भुमीका स्विकारली. या त्यांच्या निर्णयाला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.स्वबळावर निवडणुक लढवण्याचा निर्णय अद्याप जाहीर केला नसला तरी त्या दृष्टीने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यस्तरावर त्यांनी भाजपच्या सरकारला बिनशर्त पाठींबा देऊ केला असला तरी या निवडणुकांमध्ये ते भाजपा बरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. राज्य मंत्रीमंडळात सेना सहभागी झाली असली तरी स्थानिक पातळीवर त्यांची युती होण्याची शक्यता धुसर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने वसई मतदारसंघात अचानक माघार घेऊन सेना पुरस्कृत विवेक पंडीत यांना पाठींबा जाहीर केला. तरीही पंडीत यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच नालासोपारा मतदारसंघात सेना व भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे मतविभागणीचा फायदा बहुजन विकास आघाडीच्या क्षितीज ठाकूर यांना झाला. युती झाली असली तरी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मने अद्याप जुळलेली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकदिलाने एकमताने निवडणुकीला सामोरे जातील अशी शक्यता फार कमी आहे. पालघर तालुक्यात सेनेने विधानसभा जागा जिंकुन गमावलेले वैभव पुन्हा मिळवले आहे. नगरपरिषद, पंचायत समिती व आता विधानसभेची जागा त्यांनी जिंकल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असलेला बेबनाव अद्याप कायम असल्यामुळे या निवडणुका यशस्वीरित्या लढवणे काँग्रेस पक्षाला अशक्य आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षामध्ये आघाडी असतानाही येथील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मात्र एकमेकांवर सतत कुरघोडी करत राहीले. काँग्रेसचे अस्तित्व बऱ्यापैकी होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र वाताहत झाली. वसई तालुक्याप्रमाणे पालघर तालुक्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुका लढवणे शक्य होणार नाही. या दोन्ही तालुक्यात पक्षाची कार्यकारीणी अस्तित्वात नसल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ते नसतील. डहाणू तालुक्यात एकेकाळी राष्ट्रवादीचे प्राबल्य होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दणदणीत विजय मिळविला. परंतु यंदा विधानसभा निवडणुकीत या पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगलीच पिछेहाट झाली. परंतु पक्षाचे अस्तित्व काही प्रमाणात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे करतील. (प्रतिनिधी)