शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

नेरळमध्ये पार्किंगची समस्या गंभीर

By admin | Updated: April 5, 2016 01:32 IST

शहरात तसेच नेरळ रेल्वे परिसरात दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने त्याचा त्रास प्रवासी व पादचाऱ्यांना होत आहे

नेरळ : शहरात तसेच नेरळ रेल्वे परिसरात दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने त्याचा त्रास प्रवासी व पादचाऱ्यांना होत आहे. त्यामुळे नेरळ शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला असून रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसरात वाहनतळ उभारावे, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.नेरळ शहराचा झपाट्याने विस्तार होत असल्याने वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच नेरळ शहरातील अरुंद रस्त्यांमुळे बाजारपेठेत तसेच रेल्वे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी आपल्या दुचाकी रेल्वे परिसरातच पार्क करून ठेवत आहेत. त्यामुळे या परिसरातून ये -जा करताना प्रवाशांना व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना रेल्वे प्रशासन यावर कोणतीही उपाययोजना करत नाहीत. काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्टेशनलगत पार्ककेलेल्या गाड्यांवर कारवाई केली होती. परंतु त्यानंतर स्टेशन परिसरात काही अंतरावर दुचाकी पार्ककेल्या जात आहेत.दीड वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे परिसरात वाहनतळ उभारण्यात आले होते. परंतु काही महिन्यात हे वाहनतळ बंद करण्यात आले. तेव्हापासून येथे दुचाकी अस्ताव्यस्त पार्क केल्या जातात. तसेच येथे पार्ककेलेल्या वाहनांच्या सुरक्षिततेची कोणतीच हमी नसताना येथे वाहने पार्क केली जातात. नेरळ शहरातून काही महिन्यांपासून अनेक दुचाकींची चोरी झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. परंतु सुरक्षेची कोणतीही हमी नसताना वाहनचालक आपली वाहने रेल्वे पार्ककरून ठेवत आहेत. रेल्वे परिसरात उभ्या केलेल्या दुचाकीमधील अनेक वेळा पेट्रोल काढण्याच्या व अनेक पार्ट काढण्याच्याही घटना घडल्या आहेत.नेरळ रेल्वे परिसरात दररोज शेकडो दुचाकी पार्क केल्या जात आहेत. यावर रेल्वे प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने त्याचा त्रास रेल्वेमधून येणाऱ्या प्रवासी व पादचाऱ्यांना होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने वाहनांची संख्या लक्षात घेऊन रेल्वेच्या जागेत वाहनतळ उभारावे, अशी मागणी प्रवासी व स्थानिकांकडून होत आहे. (वार्ताहर)