शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाशी विभागात पार्किंगचा प्रश्न झालाय गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:43 IST

जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न जैसे थे; बेकायदा बांधकामांमुळे पायाभूत सुविधांवर ताण

नवी मुंबई : सिडकोने नवी मुंबई शहराची उभारणी केली. त्याची सुरुवात वाशी नोडपासून करण्यात आली. त्यामुळे शहरातील वाशी विभागाला विशेष महत्त्व आहे. मात्र, या विभागात पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. वाहनतळाचे नियोजन न झाल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. पार्किंगची प्रमुख समस्या असली तरी या विभागातील अनेक नागरी प्रश्न जैसे थे आहेत. विशेषत: सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील अनेक वर्षे रेंगाळला आहे. त्याशिवाय फेरीवाल्यांचा प्रश्नसुद्धा तितकाच ज्वलंत बनला आहे.महापालिकेच्या वाशी विभागांतर्गत जुहूगाव, वाशी गाव आणि कोपरी गावांचा समावेश करण्यात आला आहे. या विभागात शहरी भागाचे प्रमाण अधिक आहे. येथील वसाहती प्रशस्त असल्या तरी रस्ते अरुंद आहेत. मागील २५ वर्षांत वाशी विभागाचा विस्तार झाला. मोठ्या प्रमाणात वसाहती निर्माण झाल्या, लोकसंख्या वाढली. उद्योगधंदे वाढीस लागले आहेत. त्यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेत पार्किंगची सुविधा नसल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. जागा मिळेल तेथे मनमानी पद्धतीने वाहने उभी केली जात आहेत. प्रमुख रस्त्यांच्या कडेला दुतर्फा अशा प्रकारची बेकायदा पार्किंग दिसून येते. प्रमुख रस्ते, पदपथ तसेच शहरातील सार्वजनिक जागा अपुऱ्या पडू लागल्याने आता वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यांवरही बेकायदेशीरपणे वाहने पार्क केली जातात. त्याचा फटका परिसरातील दळणवळण यंत्रणेला बसत आहे. निवासाच्या ठिकाणी किंवा इमारतीत पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने अंतर्गत रस्त्यावर रहिवासी आपली वाहने उभी करतात; परंतु आता त्यात अवजड वाहनांची भर पडत आहे.वाशी विभागात पार्किंगची प्रमुख समस्या असली तरी येथे अनेक प्रलंबित प्रश्न जैसे थे आहेत. सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न दीर्घकाळ रखडला आहे. त्याशिवाय सुरुवातीच्या काळात खासगी व्यावसायिकांनी बांधलेल्या इमारतींचीही पडझड सुरू झाली आहे. जुहुगाव, वाशीगाव आणि कोपरी गावातील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्यामुळे या गावांचे गावपण हरवले आहे. अनियोजित बांधकामांमुळे गावातील रहदारीचे रस्ते अरुंद झाले आहेत. पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. गाव क्षेत्रातील दैनंदिन साफसफाईची कामे योग्य पद्धतीने केली जात नाहीत. कचºयाची विल्हेवाट लावताना संबंधित यंत्रणेची दमछाक होते. तसेच अनधिकृत घरांमध्ये विविध प्रांतातून आलेल्या भाडेकरूंचे प्रमाण अधिक आहे.महापालिकेची मोहीम ठप्पवाशी विभागात रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने दैनंदिन साफसफाई करणाºया सफाई कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. वाहनांचा अडथळा येत असल्याने रस्त्यांची योग्य पद्धतीने सफाई करता येत नाही. त्याचा ठपका संबंधित कर्मचाºयांवर ठेवला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मध्यंतरी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता; परंतु महापालिकेची ही मोहीमही ठप्प पडली आहे.नो पार्किंगच्या फलकाकडे दुर्लक्ष शहरात ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले आहेत. या फलकाकडे दुर्लक्ष करीत वाहनधारक सर्रासपणे येथे आपली वाहने उभी करतात. या प्रकाराकडे वाहतूक विभागाने सपशेल दुर्लक्ष केल्याने परिसरातील रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

टॅग्स :Parkingपार्किंग