शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वाशी विभागात पार्किंगचा प्रश्न झालाय गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:43 IST

जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न जैसे थे; बेकायदा बांधकामांमुळे पायाभूत सुविधांवर ताण

नवी मुंबई : सिडकोने नवी मुंबई शहराची उभारणी केली. त्याची सुरुवात वाशी नोडपासून करण्यात आली. त्यामुळे शहरातील वाशी विभागाला विशेष महत्त्व आहे. मात्र, या विभागात पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. वाहनतळाचे नियोजन न झाल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. पार्किंगची प्रमुख समस्या असली तरी या विभागातील अनेक नागरी प्रश्न जैसे थे आहेत. विशेषत: सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील अनेक वर्षे रेंगाळला आहे. त्याशिवाय फेरीवाल्यांचा प्रश्नसुद्धा तितकाच ज्वलंत बनला आहे.महापालिकेच्या वाशी विभागांतर्गत जुहूगाव, वाशी गाव आणि कोपरी गावांचा समावेश करण्यात आला आहे. या विभागात शहरी भागाचे प्रमाण अधिक आहे. येथील वसाहती प्रशस्त असल्या तरी रस्ते अरुंद आहेत. मागील २५ वर्षांत वाशी विभागाचा विस्तार झाला. मोठ्या प्रमाणात वसाहती निर्माण झाल्या, लोकसंख्या वाढली. उद्योगधंदे वाढीस लागले आहेत. त्यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेत पार्किंगची सुविधा नसल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. जागा मिळेल तेथे मनमानी पद्धतीने वाहने उभी केली जात आहेत. प्रमुख रस्त्यांच्या कडेला दुतर्फा अशा प्रकारची बेकायदा पार्किंग दिसून येते. प्रमुख रस्ते, पदपथ तसेच शहरातील सार्वजनिक जागा अपुऱ्या पडू लागल्याने आता वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यांवरही बेकायदेशीरपणे वाहने पार्क केली जातात. त्याचा फटका परिसरातील दळणवळण यंत्रणेला बसत आहे. निवासाच्या ठिकाणी किंवा इमारतीत पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने अंतर्गत रस्त्यावर रहिवासी आपली वाहने उभी करतात; परंतु आता त्यात अवजड वाहनांची भर पडत आहे.वाशी विभागात पार्किंगची प्रमुख समस्या असली तरी येथे अनेक प्रलंबित प्रश्न जैसे थे आहेत. सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न दीर्घकाळ रखडला आहे. त्याशिवाय सुरुवातीच्या काळात खासगी व्यावसायिकांनी बांधलेल्या इमारतींचीही पडझड सुरू झाली आहे. जुहुगाव, वाशीगाव आणि कोपरी गावातील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्यामुळे या गावांचे गावपण हरवले आहे. अनियोजित बांधकामांमुळे गावातील रहदारीचे रस्ते अरुंद झाले आहेत. पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. गाव क्षेत्रातील दैनंदिन साफसफाईची कामे योग्य पद्धतीने केली जात नाहीत. कचºयाची विल्हेवाट लावताना संबंधित यंत्रणेची दमछाक होते. तसेच अनधिकृत घरांमध्ये विविध प्रांतातून आलेल्या भाडेकरूंचे प्रमाण अधिक आहे.महापालिकेची मोहीम ठप्पवाशी विभागात रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने दैनंदिन साफसफाई करणाºया सफाई कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. वाहनांचा अडथळा येत असल्याने रस्त्यांची योग्य पद्धतीने सफाई करता येत नाही. त्याचा ठपका संबंधित कर्मचाºयांवर ठेवला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मध्यंतरी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता; परंतु महापालिकेची ही मोहीमही ठप्प पडली आहे.नो पार्किंगच्या फलकाकडे दुर्लक्ष शहरात ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले आहेत. या फलकाकडे दुर्लक्ष करीत वाहनधारक सर्रासपणे येथे आपली वाहने उभी करतात. या प्रकाराकडे वाहतूक विभागाने सपशेल दुर्लक्ष केल्याने परिसरातील रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

टॅग्स :Parkingपार्किंग