शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शहरात पार्किंग, मार्केटचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:08 IST

सिडकोची उदासीनता : आरक्षित भूखंडांचे हस्तांतर रखडल्याने नवी मुंबई महापालिका हतबल

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : शहरात सध्या अनधिकृत फेरीवाल्यांनी संख्या वाढली आहे. परिणामी पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. पार्र्किंगसाठी पुरेशा जागा नसल्याने महापालिका हतबल झाली आहे. विशेष म्हणजे, पार्किंग व मार्केटसह विविध सामाजिक प्रयोजनासाठी आरक्षित भूखंडांचे हस्तांतरण व्हावे, यासाठी महापालिकेने सिडकोकडे तगादा लावला आहे; परंतु सिडकोच्या उदासीनतेमुळे भूखंड हस्तांतरणाचा मुद्दा बारगळल्याने पार्किंग व मार्केटचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे.

मुंबईतील वाढत्या लोकसंख्येस नियंत्रित करण्यासाठी स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी शहराची निर्मिती करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या मालकीचा उपक्र म असलेल्या सिडकोने नवी मुंबई शहराची निर्मिती करताना शहरातील नागरिकांना सामाजिक सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध प्रयोजनांसाठी भूखंड आरक्षित ठेवले आहेत. १९९२ साली नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यावर अनेक भूखंड महापालिकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत; परंतु शहरात विविध प्रयोजनासाठी आरक्षित असलेले सुमारे ५९६ सामाजिक सुविधांचे भूखंड सिडकोकडे आहेत. शहरातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने सिडकोने महापालिकडे हस्तांतरित केलेल्या सामाजिक सुविधांचे भूखंड विविध कामांसाठी अपुरे पडू लागले आहेत. यासाठी सिडकोकडे असलेल्या भूखंडांची मागणी सातत्याने महापालिकडे करण्यात येत आहे; परंतु सिडको याकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांना विविध समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागल्या आहेत. शहरात मार्केट आणि वाहने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.

पार्किंगसाठी सिडकोकडून ५८ भूखंड महापालिकडे हस्तांतरित झाले असून, आणखी १५ भूखंडांची मागणी महापालिका सिडकोकडे करीत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरात वाहने पार्किंगची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सिडकोने अनेक गृहसंस्था निर्माण करताना वाहने पार्किंगसाठी जागा ठेवलेली नाही. शहरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांनाही साडेबारा टक्के भूखंडातील सामाजिक सुविधांसाठी राखून ठेवलेल्या सुमारे पावणेचार टक्के भूखंडांचेही वाटप झाले नाही, त्यामुळे शहरातील कॉलनी बरोबर गाव-गावठाण आणि झोपडपट्टी भागात पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली असून रस्त्याच्या कडेला, मैदानांमध्ये वाहने उभी करावी लागत आहेत, त्यामुळे अपघात आणि वाहतूककोंडीच्या निर्माण होत आहे.च्भूखंडावर कचरासिडकोने विविध प्रयोजनासाठी आरक्षित ठेवलेल्या आणि महापालिकडे हस्तांतरित न केलेल्या भूखंडांवर डेब्रिज आणि कचरा मोठ्या प्रमाणावर पडला असून अनेक भूखंडांवर अतिक्र मण झाले आहे, तर काही भूखंडांवर अतिक्र मण होण्याची शक्यता आहे. शहरात मार्केटसाठी राखीव भूखंडांपैकी ८४ भूखंड सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरित झाले असून, अद्याप ४० भूखंडांची मागणी महापालिका सिडकोकडे करीत आहे. मार्केटच्या समस्येमुळे शहर स्वच्छतेलाही बाधा पोहोचत आहे. बेकायदेशीर फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बाजार मांडला जात आहे, त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालताना विविध समस्यांना सामना करावा लागत असून, वाहतूककोंडीच्या समस्याही निर्माण होत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका