शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
5
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
6
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
7
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
8
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
9
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
10
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
11
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
12
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
13
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
14
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
15
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
16
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
17
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
18
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
19
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
20
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले

१४ वर्षांनी मिळाले पालकांचे छत्र

By admin | Updated: February 1, 2016 01:45 IST

वयाच्या अवघ्या दोन ते तीन वर्षांपासून बाल आश्रमात वाढलेल्या तीन मुलांना तब्बल १४ वर्षांनी पालकांचे छत्र मिळाले आहे. अनाथ म्हणून वाढत असलेल्या या

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईवयाच्या अवघ्या दोन ते तीन वर्षांपासून बाल आश्रमात वाढलेल्या तीन मुलांना तब्बल १४ वर्षांनी पालकांचे छत्र मिळाले आहे. अनाथ म्हणून वाढत असलेल्या या मुलांच्या पालकांचा शोध घेण्यात गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांच्या या प्रयत्नामुळे या मुलांचा वनवास संपला आहे.नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागामुळे सहा मुलांना पालकांचे छत्र मिळाले आहे. त्यापैकी तीन मुलांनी प्रथमच वयाच्या चौदा ते पंधराव्या वर्षी स्वत:च्या आई-वडिलांना पाहिले आहे. ही सर्व मुले दोन ते तीन वर्षांची असतानाच वेगवेगळ्या कारणाने बाल आश्रमात आलेली होती.राज्यात सध्या सुरू असलेल्या मुस्कान आॅपरेशनअंतर्गत गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस त्या ठिकाणी अनाथ मुलांच्या चौकशीसाठी गेले होते. यावेळी तेथील ११ मुले जन्मानंतर बाल आश्रमात कशाप्रकारे पोचली, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे, उपनिरीक्षक रुपाली पोळ व त्यांच्या पथकाने पुढील तपासाला सुरुवात केली. अनाथ म्हणून वाढत असलेल्या या मुलांच्या पालकांचा शोध घेण्याकरिता त्यांनी रायगडमधील त्या वादग्रस्त आश्रमाच्या देखील काही फायली हाताळल्या. त्यामध्ये मुंबईतील काही व्यक्तींची माहिती मिळाली. त्यांनीच या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून आणून त्या आश्रमात ठेवले होते. यानुसार तब्बल १२ ते १३ वर्षांनी प्रथम त्यांच्या घरी पोलीस धडकले. चौकशीत त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे एक एक धागा जोडत पोलिसांनी तीन मुलांच्या जन्मापासूनचा इतिहास उलगडला. कुटुंबातल्या अनेक घडामोडींमुळे ही मुले वयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षीच पालकांपासून दुरावलेली होती. त्यापैकी काही मुलांच्या पालकांनी त्यांच्या मुलांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केलेला. परंतु रायगडच्या ज्या बाल आश्रमात ही मुले वाढत होती तो आश्रम विनापरवाना चालवला जात होता. यामुळे त्या मुलांची नोंदच पोलिसांकडे झालेली नव्हती. परंतु हे सर्व अडथळे दूर करीत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्या मुलांना पालकांची भेट घालून दिली. इतक्या वर्षांनी आपल्याला आई-वडील भेटत आहेत, यावर प्रथम त्या मुलांचा विश्वास नव्हता. मात्र प्रत्यक्ष भेटीत त्या मुलांनी पालकांच्या चेहऱ्याशी स्वत:चा चेहरा जुळवत आनंदाश्रू ढाळले. बालकल्याण समितीच्या सूचनेनुसार या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सध्या त्या बाल आश्रमाकडे असल्याने त्यांना पालकांच्या ताब्यात दिलेले नाही. मात्र महिन्यातून एकदा त्यांना भेटण्याची मुभा पोलिसांनी समितीकडून मिळवून दिली आहे, याचाच आनंद त्यांना गगनात मावेनासा झाला आहे.