शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या ‘पाणी’बाणीचे महासभेत उमटले पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:04 IST

शहरात सुरू असलेल्या पाणीसमस्येचे तीव्र पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येही उमटले. सद्य:स्थितीत प्रतिदिन ७० एमएलडी पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे. पाणीसमस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

पनवेल : शहरात सुरू असलेल्या पाणीसमस्येचे तीव्र पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येही उमटले. सद्य:स्थितीत प्रतिदिन ७० एमएलडी पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे. पाणीसमस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.शहरातील पाण्याच्या भीषण समस्येवर शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. याच विषयावर पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांनी लक्षवेधी मांडली. पीठासीन अधिकारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दोन्ही विषय मान्य करत सभागृहात या विषयावर चर्चा करण्यास परवानगी दिली. पाण्याच्या भीषण समस्येवर सत्ताधारी विरोधकांनी या वेळी एकत्र येण्याचे आवाहन नगरसेवक हरेश केणी यांनी केले.पाणीपुरवठ्यासंदर्भात धोरण तयार करण्यासाठी सिडकोला सोबत घ्या, अशी विनंती भाजपा नगरसेविका लीना गरड यांनी केली. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी, पनवेल महानगरपालिकेला दररोज २५० एमएलडी पाण्याची गरज भासते मात्र, सध्याच्या घडीला हा पाणीपुरवठा १८० एमएलडीच मिळत असल्याने एमजेपी, एमआयडीसी, तसेच सिडको प्रशासनाकडे जास्तीत जास्त पाण्याची मागणी करीत असल्याचे सांगितले. पनवेल महानगरपालिकेला नव्याने धरण बांधायचे असल्यास सुमारे १४०० ते १५०० कोटी खर्च येईल. याकरिता लागणार कालावधीही दहा वर्षांचा असेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेच्या मालकीचे आप्पासाहेब वेदक (देहरंग) व ओवे धरणातील गाळ काढण्यासाठी रॉयल्टी माफ करण्यात आल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. २४ तारखेपासून या कामाला सुरु वात करण्यात येणार असल्याने हे काम नेमके कसे सुरू होणार आहे, असा प्रतिप्रश्न अरविंद म्हात्रे यांनी उपस्थित केला. धरणातील गाळ नवी मुंबई विमानतळाच्या भरावाला वापरता येईल. याकरिता सिडकोशी चर्चा करण्याची सूचना त्यांनी केली. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पाण्याच्या गंभीर विषय विषयपत्रिकेवर का घेतला नाही, असा आक्षेप घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेने ५० टँकर देऊ करूनही आपल्याला त्याचा उपयोग करता आलेला नाही, तर १०० टँकर घेऊन काय फायदा होणार आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी, पाण्यासंदर्भात डीपीआर तयार करून तो राज्य शासनाकडे पाठविला जाईल, तसेच याकरिता खासगी एजन्सी नियुक्त करावी लागेल, असे सांगितले.नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या ५० टँकरचा पुरेपूर उपयोग घेता येईल, यासंदर्भात उपाययोजना राबविण्यात येतील. पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावण्याकरिता अमृत योजेनेचा डीपीआर लवकरात लवकर शासनाकडे पाठविण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील.- गणेश देशमुख, आयुक्त,पनवेल महानगरपालिका

टॅग्स :panvelपनवेल