शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

पनवेलकरांची आरोग्यविषयक हेळसांड थांबणार; उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:06 IST

बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार

वैभव गायकर

पनवेल : पनवेलमधील बहु-प्रतिक्षित उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार उद्घाटनासाठी ११ सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

पनवेलमधील ग्रामीण रुग्णालय शहराच्या एका टोकाला आहे. या रुग्णालयात मनुष्यबळ व साधनसामग्रीची कमतरता असल्याने पनवेलकरांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. नव्याने तयार करण्यात आलेल्या रुग्णालयात खाटांची संख्या १२० इतकी आहे. तर २० खाटांचे ट्रॉमा सेंटर आहे. या व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदनगृह आदीची सुविधा आहे. सध्याच्या घडीला पनवेलमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे पनवेलमधील अनोळखी मृतदेह वाशी येथील एनएमएमसीच्या रुग्णालयात ठेवावे लागतात. त्यामुळे नवी मुंबईतील महापालिकेचे शवगृहसुद्धा अपुरे पडू लागले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयात या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शवविच्छेदनासाठी वेगळा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ कमी होणार आहे. पनवेल तालुक्याचा विस्तार मोठा आहे. शहरात एकही मोठे सरकारी रुग्णालय अस्तित्वात नसल्याने खासगी रु ग्णालयांकडे रुग्णांना धाव घ्यावी लागते. त्यामुळे सर्वसामान्यांची लुबाडणूक होत आहे; परंतु नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज रुग्णालयामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, फिजिओथेरिपिस्ट आदीची सेवा अल्पदरात नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

मागील महिन्यात रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांनी या रु ग्णालयाच्या कामाची पाहणी केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन रुग्णालयाच्या इमारतीची उर्वरित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता काम पूर्ण झाले असून ११ सप्टेंबर रोजी या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांनी दिली.

मोठी गैरसोय दूर होणारमुंबई-गोवा, मुंबई-पुणे द्रुतगती, जेएनपीटी-ठाणे, सायन-पनवेल आदी महामार्ग पनवेल शहरातून जातात. देशातील व्यस्त अशा महामार्गापैकी हे महामार्ग आहेत. या महामार्गावर सतत अपघात घडत असतात, अशा वेळी या परिसरात एकही ट्रॉमा सेंटर नसल्याने मोठी गैरसोय होत होती. या उपजिल्हा रुग्णालयामुळे मोठी गैरसोय दूर होणार आहे.