शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

पनवेलकरांची आरोग्यविषयक हेळसांड थांबणार; उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:06 IST

बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार

वैभव गायकर

पनवेल : पनवेलमधील बहु-प्रतिक्षित उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार उद्घाटनासाठी ११ सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

पनवेलमधील ग्रामीण रुग्णालय शहराच्या एका टोकाला आहे. या रुग्णालयात मनुष्यबळ व साधनसामग्रीची कमतरता असल्याने पनवेलकरांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. नव्याने तयार करण्यात आलेल्या रुग्णालयात खाटांची संख्या १२० इतकी आहे. तर २० खाटांचे ट्रॉमा सेंटर आहे. या व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदनगृह आदीची सुविधा आहे. सध्याच्या घडीला पनवेलमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे पनवेलमधील अनोळखी मृतदेह वाशी येथील एनएमएमसीच्या रुग्णालयात ठेवावे लागतात. त्यामुळे नवी मुंबईतील महापालिकेचे शवगृहसुद्धा अपुरे पडू लागले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयात या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शवविच्छेदनासाठी वेगळा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ कमी होणार आहे. पनवेल तालुक्याचा विस्तार मोठा आहे. शहरात एकही मोठे सरकारी रुग्णालय अस्तित्वात नसल्याने खासगी रु ग्णालयांकडे रुग्णांना धाव घ्यावी लागते. त्यामुळे सर्वसामान्यांची लुबाडणूक होत आहे; परंतु नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज रुग्णालयामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, फिजिओथेरिपिस्ट आदीची सेवा अल्पदरात नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

मागील महिन्यात रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांनी या रु ग्णालयाच्या कामाची पाहणी केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन रुग्णालयाच्या इमारतीची उर्वरित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता काम पूर्ण झाले असून ११ सप्टेंबर रोजी या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांनी दिली.

मोठी गैरसोय दूर होणारमुंबई-गोवा, मुंबई-पुणे द्रुतगती, जेएनपीटी-ठाणे, सायन-पनवेल आदी महामार्ग पनवेल शहरातून जातात. देशातील व्यस्त अशा महामार्गापैकी हे महामार्ग आहेत. या महामार्गावर सतत अपघात घडत असतात, अशा वेळी या परिसरात एकही ट्रॉमा सेंटर नसल्याने मोठी गैरसोय होत होती. या उपजिल्हा रुग्णालयामुळे मोठी गैरसोय दूर होणार आहे.