शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

पनवेलकरांची आरोग्यविषयक हेळसांड थांबणार; उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:06 IST

बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार

वैभव गायकर

पनवेल : पनवेलमधील बहु-प्रतिक्षित उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार उद्घाटनासाठी ११ सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

पनवेलमधील ग्रामीण रुग्णालय शहराच्या एका टोकाला आहे. या रुग्णालयात मनुष्यबळ व साधनसामग्रीची कमतरता असल्याने पनवेलकरांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. नव्याने तयार करण्यात आलेल्या रुग्णालयात खाटांची संख्या १२० इतकी आहे. तर २० खाटांचे ट्रॉमा सेंटर आहे. या व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदनगृह आदीची सुविधा आहे. सध्याच्या घडीला पनवेलमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे पनवेलमधील अनोळखी मृतदेह वाशी येथील एनएमएमसीच्या रुग्णालयात ठेवावे लागतात. त्यामुळे नवी मुंबईतील महापालिकेचे शवगृहसुद्धा अपुरे पडू लागले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयात या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शवविच्छेदनासाठी वेगळा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ कमी होणार आहे. पनवेल तालुक्याचा विस्तार मोठा आहे. शहरात एकही मोठे सरकारी रुग्णालय अस्तित्वात नसल्याने खासगी रु ग्णालयांकडे रुग्णांना धाव घ्यावी लागते. त्यामुळे सर्वसामान्यांची लुबाडणूक होत आहे; परंतु नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज रुग्णालयामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, फिजिओथेरिपिस्ट आदीची सेवा अल्पदरात नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

मागील महिन्यात रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांनी या रु ग्णालयाच्या कामाची पाहणी केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन रुग्णालयाच्या इमारतीची उर्वरित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता काम पूर्ण झाले असून ११ सप्टेंबर रोजी या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांनी दिली.

मोठी गैरसोय दूर होणारमुंबई-गोवा, मुंबई-पुणे द्रुतगती, जेएनपीटी-ठाणे, सायन-पनवेल आदी महामार्ग पनवेल शहरातून जातात. देशातील व्यस्त अशा महामार्गापैकी हे महामार्ग आहेत. या महामार्गावर सतत अपघात घडत असतात, अशा वेळी या परिसरात एकही ट्रॉमा सेंटर नसल्याने मोठी गैरसोय होत होती. या उपजिल्हा रुग्णालयामुळे मोठी गैरसोय दूर होणार आहे.