शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

पनवेल ही माझी कर्मभूमी आहे

By admin | Updated: November 12, 2015 01:53 IST

मालवणी ही माझी मातृबोली असली तरी पनवेल ही माझी कर्मभूमी आहे. राजापूरमधील माडबन येथून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईकडे आलो,

पनवेल : मालवणी ही माझी मातृबोली असली तरी पनवेल ही माझी कर्मभूमी आहे. राजापूरमधील माडबन येथून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईकडे आलो, तेव्हा प्रथम मला उरणमधील चिरनेर आणि पनवेल परिसराने आसरा दिला, असे भावपूर्ण उद्गार ‘वस्त्रहरण’कार आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी काढले. नुकता पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात कांतीलाल प्रतिष्ठान रायगडच्यावतीने गवाणकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.पनवेल परिसरात मला नाटकांचं बाळकडू मिळालं. चिरनेर येथील जनार्दन चेऊलकर यांनी मला मुंबईत पदपथावर, स्मशानात झोपताना पाहिले. तेंव्हा त्यांनी मला तेथील सिमेंटच्या चाळीत राहणाऱ्या बहिणीच्या घरी नेले. तिथेही १० ते १५ माणसे रहात होती. तिथून अर्थातच मला बाहेर पडावं लागलं. कारण ती जागा त्यांनाच पुरत नव्हती. पण त्या माणसांचं मन मोठं होतं. त्यानंतर मी चिरनेर मुंब्रा परिसरात होतो. तेथील आगरी भाषेने या मालवणी पुत्राला लळा लावला. मला एक आगरी नाटक पाहिलेलं आठवतं. त्यात एक नारदाचं पात्र होतं. पण ऐनवेळी तंबोराच मिळेना. मग एका टोपलीला गोणीत गुंडाळून त्याला दांडा लावून, दोऱ्या बांधून तंबोरा तयार झाला. नारदापेक्षा तो तंबोरा मोठा होता. ते पाहून सगळे हासत होते.‘वस्त्रहरण’ या माझ्या मालवणी नाटकाचं बीज अशा प्रकारे नकळत माझ्या मनात रुजलं. मराठी माणूस एकवेळ पाण्याविना जगू शकेल पण नाटकाविना नाही, असे सांगून गवाणकर यांनी यावेळी ‘वस्त्रहरण’चे काही किस्से सांगितले. ते म्हणाले की हे नाटक सुरु वातीला चाललं नव्हते. या नाटकाने मला खूप भोगायला लावलं. त्यानंतर ६० वा. शेवटाचा प्रयोग पुण्यात करावयाचा असं आम्ही ठरवलं तो मराठीत होता. त्याला पु. ल. देशपांडे हजर होते. त्यांना खदाखदा हसताना पाहून मी धन्य झालो. त्यानंतर त्यांचं मला पत्र आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, नाटकात मला एक छोटीशी भूमिका मिळाली तरी मी स्वत:ला धन्य समजेन. आम्ही ते पत्रच नाटकाच्या जाहितीत प्रसिद्ध करू लागलो. तेव्हापासून आमच्या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला. पाच हजारा वा प्रयोग मोठ्या दणक्यात करून प्रसाद कांबळीने नाट्यसृष्टीत मोठा इतिहास घडविला. गवाणकरांनी यावेळी उपस्थित सर्व पक्षिय नेत्यांना मिश्किलपणे कोपरखळ्या लगावल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले की, जीवनात नाट्य, भांडणे, वाद हवेतच. ते जिवंतपणाचे लक्षण असते. हे राजकीय रंगभूमिवरील अभिनेत्यांनी लक्षात ठेवावे. मच्छिंद्रच्या मनात शिवाजी पार्कवरील राजकीय नेत्यांना अभिनय करायला लावून राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पाच हजारावा ‘वस्त्रहरण’ चा प्रयोग करण्याची इच्छा होती, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्र माला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खा. रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, शेकाप नेते व माजी आ. विवेक पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, उद्योजक जे. एम. म्हात्रे, शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील घरत आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)