शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

पनवेल ही माझी कर्मभूमी आहे

By admin | Updated: November 12, 2015 01:53 IST

मालवणी ही माझी मातृबोली असली तरी पनवेल ही माझी कर्मभूमी आहे. राजापूरमधील माडबन येथून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईकडे आलो,

पनवेल : मालवणी ही माझी मातृबोली असली तरी पनवेल ही माझी कर्मभूमी आहे. राजापूरमधील माडबन येथून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईकडे आलो, तेव्हा प्रथम मला उरणमधील चिरनेर आणि पनवेल परिसराने आसरा दिला, असे भावपूर्ण उद्गार ‘वस्त्रहरण’कार आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी काढले. नुकता पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात कांतीलाल प्रतिष्ठान रायगडच्यावतीने गवाणकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.पनवेल परिसरात मला नाटकांचं बाळकडू मिळालं. चिरनेर येथील जनार्दन चेऊलकर यांनी मला मुंबईत पदपथावर, स्मशानात झोपताना पाहिले. तेंव्हा त्यांनी मला तेथील सिमेंटच्या चाळीत राहणाऱ्या बहिणीच्या घरी नेले. तिथेही १० ते १५ माणसे रहात होती. तिथून अर्थातच मला बाहेर पडावं लागलं. कारण ती जागा त्यांनाच पुरत नव्हती. पण त्या माणसांचं मन मोठं होतं. त्यानंतर मी चिरनेर मुंब्रा परिसरात होतो. तेथील आगरी भाषेने या मालवणी पुत्राला लळा लावला. मला एक आगरी नाटक पाहिलेलं आठवतं. त्यात एक नारदाचं पात्र होतं. पण ऐनवेळी तंबोराच मिळेना. मग एका टोपलीला गोणीत गुंडाळून त्याला दांडा लावून, दोऱ्या बांधून तंबोरा तयार झाला. नारदापेक्षा तो तंबोरा मोठा होता. ते पाहून सगळे हासत होते.‘वस्त्रहरण’ या माझ्या मालवणी नाटकाचं बीज अशा प्रकारे नकळत माझ्या मनात रुजलं. मराठी माणूस एकवेळ पाण्याविना जगू शकेल पण नाटकाविना नाही, असे सांगून गवाणकर यांनी यावेळी ‘वस्त्रहरण’चे काही किस्से सांगितले. ते म्हणाले की हे नाटक सुरु वातीला चाललं नव्हते. या नाटकाने मला खूप भोगायला लावलं. त्यानंतर ६० वा. शेवटाचा प्रयोग पुण्यात करावयाचा असं आम्ही ठरवलं तो मराठीत होता. त्याला पु. ल. देशपांडे हजर होते. त्यांना खदाखदा हसताना पाहून मी धन्य झालो. त्यानंतर त्यांचं मला पत्र आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, नाटकात मला एक छोटीशी भूमिका मिळाली तरी मी स्वत:ला धन्य समजेन. आम्ही ते पत्रच नाटकाच्या जाहितीत प्रसिद्ध करू लागलो. तेव्हापासून आमच्या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला. पाच हजारा वा प्रयोग मोठ्या दणक्यात करून प्रसाद कांबळीने नाट्यसृष्टीत मोठा इतिहास घडविला. गवाणकरांनी यावेळी उपस्थित सर्व पक्षिय नेत्यांना मिश्किलपणे कोपरखळ्या लगावल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले की, जीवनात नाट्य, भांडणे, वाद हवेतच. ते जिवंतपणाचे लक्षण असते. हे राजकीय रंगभूमिवरील अभिनेत्यांनी लक्षात ठेवावे. मच्छिंद्रच्या मनात शिवाजी पार्कवरील राजकीय नेत्यांना अभिनय करायला लावून राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पाच हजारावा ‘वस्त्रहरण’ चा प्रयोग करण्याची इच्छा होती, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्र माला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खा. रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, शेकाप नेते व माजी आ. विवेक पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, उद्योजक जे. एम. म्हात्रे, शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील घरत आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)