शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

पनवेल ही माझी कर्मभूमी आहे

By admin | Updated: November 12, 2015 01:53 IST

मालवणी ही माझी मातृबोली असली तरी पनवेल ही माझी कर्मभूमी आहे. राजापूरमधील माडबन येथून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईकडे आलो,

पनवेल : मालवणी ही माझी मातृबोली असली तरी पनवेल ही माझी कर्मभूमी आहे. राजापूरमधील माडबन येथून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईकडे आलो, तेव्हा प्रथम मला उरणमधील चिरनेर आणि पनवेल परिसराने आसरा दिला, असे भावपूर्ण उद्गार ‘वस्त्रहरण’कार आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी काढले. नुकता पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात कांतीलाल प्रतिष्ठान रायगडच्यावतीने गवाणकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.पनवेल परिसरात मला नाटकांचं बाळकडू मिळालं. चिरनेर येथील जनार्दन चेऊलकर यांनी मला मुंबईत पदपथावर, स्मशानात झोपताना पाहिले. तेंव्हा त्यांनी मला तेथील सिमेंटच्या चाळीत राहणाऱ्या बहिणीच्या घरी नेले. तिथेही १० ते १५ माणसे रहात होती. तिथून अर्थातच मला बाहेर पडावं लागलं. कारण ती जागा त्यांनाच पुरत नव्हती. पण त्या माणसांचं मन मोठं होतं. त्यानंतर मी चिरनेर मुंब्रा परिसरात होतो. तेथील आगरी भाषेने या मालवणी पुत्राला लळा लावला. मला एक आगरी नाटक पाहिलेलं आठवतं. त्यात एक नारदाचं पात्र होतं. पण ऐनवेळी तंबोराच मिळेना. मग एका टोपलीला गोणीत गुंडाळून त्याला दांडा लावून, दोऱ्या बांधून तंबोरा तयार झाला. नारदापेक्षा तो तंबोरा मोठा होता. ते पाहून सगळे हासत होते.‘वस्त्रहरण’ या माझ्या मालवणी नाटकाचं बीज अशा प्रकारे नकळत माझ्या मनात रुजलं. मराठी माणूस एकवेळ पाण्याविना जगू शकेल पण नाटकाविना नाही, असे सांगून गवाणकर यांनी यावेळी ‘वस्त्रहरण’चे काही किस्से सांगितले. ते म्हणाले की हे नाटक सुरु वातीला चाललं नव्हते. या नाटकाने मला खूप भोगायला लावलं. त्यानंतर ६० वा. शेवटाचा प्रयोग पुण्यात करावयाचा असं आम्ही ठरवलं तो मराठीत होता. त्याला पु. ल. देशपांडे हजर होते. त्यांना खदाखदा हसताना पाहून मी धन्य झालो. त्यानंतर त्यांचं मला पत्र आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, नाटकात मला एक छोटीशी भूमिका मिळाली तरी मी स्वत:ला धन्य समजेन. आम्ही ते पत्रच नाटकाच्या जाहितीत प्रसिद्ध करू लागलो. तेव्हापासून आमच्या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला. पाच हजारा वा प्रयोग मोठ्या दणक्यात करून प्रसाद कांबळीने नाट्यसृष्टीत मोठा इतिहास घडविला. गवाणकरांनी यावेळी उपस्थित सर्व पक्षिय नेत्यांना मिश्किलपणे कोपरखळ्या लगावल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले की, जीवनात नाट्य, भांडणे, वाद हवेतच. ते जिवंतपणाचे लक्षण असते. हे राजकीय रंगभूमिवरील अभिनेत्यांनी लक्षात ठेवावे. मच्छिंद्रच्या मनात शिवाजी पार्कवरील राजकीय नेत्यांना अभिनय करायला लावून राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पाच हजारावा ‘वस्त्रहरण’ चा प्रयोग करण्याची इच्छा होती, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्र माला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खा. रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, शेकाप नेते व माजी आ. विवेक पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, उद्योजक जे. एम. म्हात्रे, शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील घरत आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)