शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आपत्कालीन आराखड्याचा विषय सर्वसाधारण सभेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:52 IST

पनवेल महापालिकेची स्थापना झाली. पालिकेत खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, नवीन पनवेल आदिंसह २९ गावांचा समावेश आहे.

पनवेल: पनवेल महापालिकेची स्थापना झाली. पालिकेत खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, नवीन पनवेल आदिंसह २९ गावांचा समावेश आहे. पालिकेची व्याप्ती मोठी असल्याने आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पालिकेचा सक्षम असा आपत्कालीन आराखडा तयार करणे गरजेचे असताना पालिकेने पनवेल नगरपरिषदेचा आराखडा कॉपी करुन त्या आराखड्याला पनवेल महानगरपालिकेचा आपत्कालीन आराखडा नाव दिल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात लोकमतने दि. २६ रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर पालिका क्षेत्रातील रहिवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्याच्या दृष्टीने संपूर्ण पालिका क्षेत्राचा सर्वसमावेश आराखडा पालिकेने तयार करणे गरजेचे असताना पालिकेचा आराखडा केवळ पनवेल शहरापुरताच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात येथील रहिवासी, लोकप्रतिनिधींना याबाबत नाराजी व्यक्त करीत आपल्या प्रतिक्रिया मांडल्या.आपत्कालीन आराखड्यासंदर्भात सर्वप्रथम माहिती घेतली जाईल, त्यानंतरच यासंदर्भात प्रतिक्रिया देणे उचित ठरेल.- डॉ. कविता चौतमोल,महापौर, पनवेल महानगरपालिकापनवेल महानगर पालिकेचे मनुष्यबळ देखील अपुरे आहे. अद्याप महापौर, उपमहापौर, विरोधकांना बसायला जागा नाही. पालिकेने आपत्कालीन आराखडा तयार करणे गरजेचे आहे. याकरिता पालिकेने पावले उचलली नसतील. सर्वसाधारण सभेत हा विषय आम्ही नक्कीच मांडू.- प्रीतम म्हात्रे,गटनेते शेकापआपत्कालीन आराखड्यात पनवेल शहर वगळता पालिकेत समाविष्ट असलेला ग्रामीण भाग, खारघर तसेच तळोजा औद्योगिक सारख्या महत्त्वाच्या परिसराचा काहीच विचार केला गेला नसल्याने हा आराखडाच हास्यास्पद आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणून पनवेलची निर्मिती करीत असताना अशाप्रकारच्या चुका पालिका प्रशासनाला शोभणाºया नाहीत.- गुरुनाथ गायकर,नगरसेवक, शेकापपनवेल पालिका क्षेत्रात कधीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. मात्र पालिका याकरिता सक्षम नसल्याचे या आराखड्यावरुन सिध्द झाले आहे. त्यामुळे अशाप्रकारचे उदासीन धोरण पालिका राबवत असेल तर पालिका क्षेत्रातील रहिवाशांच्या जीवाला आपत्कालीन परिस्थितीला धोका निर्माण होवू शकतो.- संतोष तांबोळी,रहिवासी खारघर