शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

पनवेल महापालिकेला हिरवा कंदील

By admin | Updated: December 18, 2015 00:39 IST

गेली अनेक वर्षे रखडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रस्तावाला आता गती मिळाली आहे. पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी महानगरपालिका होण्याचा ठराव एकमताने

पनवेल : गेली अनेक वर्षे रखडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रस्तावाला आता गती मिळाली आहे. पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी महानगरपालिका होण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. याकरिता विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी सूचना सुचवल्या असून यांचा प्रस्तावात समावेश करण्यात करण्यात आला आहे. सिडकोने पनवेल परिसरात नवीन पनवेल, खारघर, कामोठा, कळंबोली, उलवे, तळोजा हे नोड विकसित केले. आजूबाजूच्या परिसराचाही नैना प्राधिकरणांतर्गत विकास करण्यात येणार आहे. पनवेल परिसराची लोकसंख्या आठ ते नऊ लाखांच्या आसपास पोहचल्यामुळे याठिकाणी स्वतंत्र पनवेल महापालिका स्थापन करण्यात यावी असा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी धूळखात आहे. मध्यंतरी सिडकोचे पनवेल तालुक्यातील नोड नवी मुंबई महानगरपालिकेकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. सिडकोकडून पायाभूत सुविधांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. कामोठेतील परिस्थिती अतिशय बिकट असून कळंबोली, खारघरची स्थिती फारशी वेगळी नाही. म्हणूनच पनवेल स्वतंत्र महानगरपालिका व्हावी, याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी लावून धरली. या संदर्भात विधानसभेत सुध्दा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या व्यतिरिक्त स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली होती. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. ही समिती एक महिन्यात भौगोलिक, नगरपालिका, महसूल, अतिरिक्त मनुष्यबळ आदी गोष्टींचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. यावर निर्णय घेण्याकरिता अनिल भगत यांनी सभागृहासमोर ठराव मांडला. त्याला सर्वपक्षीय संमती मिळाल्याने पनवेल महानगरपालिकेचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या मोकळा झाला असल्याची प्रतिक्रि या नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनी दिली.प्रस्तावाला शेकापचा पाठिंबाशेतकरी कामगार पक्षाने पनवेल महापालिकेच्या प्रस्तावाला आधी विरोध केला होता. मात्र वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधांवर येणारा ताण, सिडकोकडून घेतले जाणारे बेजबाबदारीचे धोरण या सर्व गोष्टींचा विचार करून पक्षाने या प्रस्तावाला पाठिंबा दिला. विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी स्मार्ट सिटीकरिता खर्च करण्यात येणारे ३७ हजार कोटींपैकी काही निधी प्रस्तावित पनवेल नगरपालिकेला देण्यात यावा, नैनाची नगररचना स्वीकारायची की महानगरपालिकेची स्वतंत्र योजना असेल, याबाबत स्पष्टीकरण असावे, ग्रामीण भागात लावणाऱ्या कराबाबत स्पष्टता असावी, महानगरपालिका क्षेत्राकरिता पाणी आणणार कुठून, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.