शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

पनवेलमध्ये पक्षांतराला वेग

By admin | Updated: April 29, 2017 01:52 IST

पनवेल महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने प्रचारला वेग आला आहे. २४ मे रोजी पालिकेची निवडणूक होत आहे.

मयूर तांबडे / पनवेलपनवेल महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने प्रचारला वेग आला आहे. २४ मे रोजी पालिकेची निवडणूक होत आहे. निवडणुका जाहीर झाल्याने पक्ष प्रवेशालादेखील वेग येणार आहे. भाजपा, शेकाप व शिवसेनेत इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने उमेदवार नाराज होऊन अन्य पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पक्षात होणारी बंडाळी पदाधिकाऱ्यांना थांबवावी लागणार आहे.गेले चार ते पाच महिने आस लागून राहिलेली पनवेल महापालिकेची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मे महिन्यात निवडणूक होणार असल्याचे बोलले जात होते. अखेर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. २४ मे रोजी महापलिकेसाठी मतदान होणार आहे, तर २६ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाला वेग येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे साऱ्याच पक्षांना बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. बंड होऊ नये म्हणून सारेच पक्ष काळजी घेत आहेत. गेल्या महिन्यात रिपब्लिकन पार्टीचे नवीन पनवेल शहराध्यक्ष प्रभाकर कांबळे, तालुकाध्यक्ष मोहन गायकवाड, भाजपाचे मयुरेश खिस्मतराव, प्रकाश खानावकर, भारिपचे कल्पेश तोडेकर यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीचे रामदास शेवाळे, कामोठे शेकापचे शहराध्यक्ष संतोष म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय चिपळेकर यांनी भाजपामध्ये तर शिवसेनेचे संतोष उरणकर यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.निवडणूक जाहीर झाल्याने पनवेलमधील सर्व राजकीय पक्षांच्या तथा नेत्यांच्या हालचालीना वेग आला आहे. त्यामुळे अनेक चर्चा-परिसंवादांना ऊत आला आहे. राजकीय आखाड्यात टिकून राहण्यासाठी ज्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना संधी मिळालेली नाही. ते इतर पक्षांत पक्ष प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इतरत्र जे खुले गट आहेत त्यात सध्या उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. मात्र, तेथील इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने, त्यांचा अडसर दूर करण्यासाठी प्रलोभने दाखवून, तेथे स्थानिक इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांची निवडणूक लढवण्याची प्रबळ इच्छा उचबंळून आलेली आहे. त्यामुळे आधीच इच्छुकांची भाऊगर्दी असलेल्या त्या गटात नव्याने येणाऱ्यांची स्पर्धा निर्माण होणार आहे.