शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

पनवेलमध्ये पक्षांतराला वेग

By admin | Updated: April 29, 2017 01:52 IST

पनवेल महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने प्रचारला वेग आला आहे. २४ मे रोजी पालिकेची निवडणूक होत आहे.

मयूर तांबडे / पनवेलपनवेल महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने प्रचारला वेग आला आहे. २४ मे रोजी पालिकेची निवडणूक होत आहे. निवडणुका जाहीर झाल्याने पक्ष प्रवेशालादेखील वेग येणार आहे. भाजपा, शेकाप व शिवसेनेत इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने उमेदवार नाराज होऊन अन्य पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पक्षात होणारी बंडाळी पदाधिकाऱ्यांना थांबवावी लागणार आहे.गेले चार ते पाच महिने आस लागून राहिलेली पनवेल महापालिकेची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मे महिन्यात निवडणूक होणार असल्याचे बोलले जात होते. अखेर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. २४ मे रोजी महापलिकेसाठी मतदान होणार आहे, तर २६ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाला वेग येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे साऱ्याच पक्षांना बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. बंड होऊ नये म्हणून सारेच पक्ष काळजी घेत आहेत. गेल्या महिन्यात रिपब्लिकन पार्टीचे नवीन पनवेल शहराध्यक्ष प्रभाकर कांबळे, तालुकाध्यक्ष मोहन गायकवाड, भाजपाचे मयुरेश खिस्मतराव, प्रकाश खानावकर, भारिपचे कल्पेश तोडेकर यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीचे रामदास शेवाळे, कामोठे शेकापचे शहराध्यक्ष संतोष म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय चिपळेकर यांनी भाजपामध्ये तर शिवसेनेचे संतोष उरणकर यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.निवडणूक जाहीर झाल्याने पनवेलमधील सर्व राजकीय पक्षांच्या तथा नेत्यांच्या हालचालीना वेग आला आहे. त्यामुळे अनेक चर्चा-परिसंवादांना ऊत आला आहे. राजकीय आखाड्यात टिकून राहण्यासाठी ज्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना संधी मिळालेली नाही. ते इतर पक्षांत पक्ष प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इतरत्र जे खुले गट आहेत त्यात सध्या उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. मात्र, तेथील इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने, त्यांचा अडसर दूर करण्यासाठी प्रलोभने दाखवून, तेथे स्थानिक इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांची निवडणूक लढवण्याची प्रबळ इच्छा उचबंळून आलेली आहे. त्यामुळे आधीच इच्छुकांची भाऊगर्दी असलेल्या त्या गटात नव्याने येणाऱ्यांची स्पर्धा निर्माण होणार आहे.