शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पालघर जिल्ह्यात मुसळधार

By admin | Updated: June 19, 2015 21:52 IST

पालघर जिल्ह्णात सर्वात जास्त पाऊस वसई तालुक्यात ४४९ मि. मि. इतका तर सर्वात कमी पाऊस मोखाडा तालुक्यात ८०.२ मि. मि. पडल्याची नोंद झाली आहे.

हितेन नाईक, पालघरपालघर जिल्ह्णात सर्वात जास्त पाऊस वसई तालुक्यात ४४९ मि. मि. इतका तर सर्वात कमी पाऊस मोखाडा तालुक्यात ८०.२ मि. मि. पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्णातील वसई ते डहाणू दरम्यानच्या समुद्र किनाऱ्यावरील घरांचे लाटांच्या तडाख्याने नुकसान झाले आहे. कुठेही प्राणहानी वा वित्तहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण कक्षाकडून देण्यात आली असली तरी पालघर तालुक्यातील पारगाव येथील जिल्हापरिषद शाळेची भिंत कोसळून चार वर्गखोल्यांना तडे गेले आहेत. यात कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.वसई तालुक्यात आज १४८.७ मि. मि. पावसाची नोंद करण्यात येऊन एकुण ४४९ मि. मि. पाऊस पडण्याची नोंद करण्यात आली आहे. वाडा तालुक्यात आज २३.३ मि. मि. पाऊस तर एकुण १४४.३ मि. मि. पाऊस, डहाणू तालुकयात आज ६.१ मि. मि. पाऊस पडला असून एकूण २४८.१ मि. मि. , पालघर तालुक्यात आज ४९.६ मि. मि. पाऊस तर एकुण ३२४.६ मि. मि. पासुस, जव्हार तालुक्यात आज ५ मि. मि पाऊस तर एकूण १०९.३ मि. मि. पाऊस, मोखाडा आज २.९ मि. मि. पाऊस तर एकूण ८०.२ मि. मि. पाऊस, तलासरीमध्ये आज शुन्य पाऊस तर एकूण १६७.७ मि. मि. पाऊस विक्रमगड मध्ये आज ४.९ मि. मि. पाऊस तर एकूण १७३.६ मि. मि. पावसाची नोंद करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.पालघर जिल्ह्णात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी यंत्रणा तयारीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरी जिल्ह्णातील सुमारे चार हजार पाड्यापैकी काही पाड्यावर एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास त्यासाठी उपाययोजना आखण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे उभे राहीले आहे. जिल्ह्णातील तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा हे अतिदुर्गम डोंगराळ भाग असल्याने येथे मुसळधार पाऊस पडल्यास नदी, नाल्यांना पूर येऊन येथील पाड्यांचा शहरांशी संपर्क तुटतो. यावेळी नदी-नाले ओलांडणारे व्यक्ती, वाहने बुडून अनेकांचे बळी जात असतात. त्यामुळे जिल्ह्णात एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यास त्याचा सामना करण्याबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.मुंबईच्या तुलनेने पालघर जिल्ह्णात पावसाचे प्रमाण कमी असले तरी ६ जून रोजी पावसाने सुरूवात केल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र आठही तालुक्यात पावसामुळे कुठेही प्राणहानी वा वित्तहानीच्या घटना घडलेली नाही. पालघरसह काही तालुक्यात विकासकांनी नैसर्गिक नाल्यावर बेकायदेशीर बांधकामे केल्याने शहरी भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच विद्युत वितरण विभागाकडून जुनाट खांब आणि तारा बदलण्याचे काम पूर्ण करण्यात न आल्याने ग्रामीण भागातील खांब कोसळणे आणि तारा तुटून विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच डहाणू ते वसई तालुक्या दरम्यानच्या समुद्र किनाऱ्यावरील संरक्षक बंधाऱ्याची दुरावस्था झाल्याने किनाऱ्यावरील मच्छिमारांसह अनेकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे. त्यात लाईट गेल्याने त्यांची अवस्था दारुण झाली.