शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

पहाटेपर्यंत बारमध्ये रंगताहेत पार्ट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:53 IST

पहाटेपर्यंत चालणाऱ्या बारमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यपींच्या सोयीसाठी काही बार, हॉटेल पहाटेपर्यंत सुरू ठेवले जात असल्याचे उघडपणे दिसत आहे.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : पहाटेपर्यंत चालणाऱ्या बारमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यपींच्या सोयीसाठी काही बार, हॉटेल पहाटेपर्यंत सुरू ठेवले जात असल्याचे उघडपणे दिसत आहे. अशा व्यावसायिकांवर ठोस कारवाईऐवजी महिन्याला पाच हजारांचा दंड आकारून पोलिसांकडून कारवाईचा दिखावा होत असल्याचे दिसून येत आहे.शहराच्या संस्कृतीला गालबोट लागेल असे प्रकार काही व्यावसायिकांकडून होत आहेत. त्यामध्ये बहुतांश मद्यविक्रेत्यांसह काही बार व हॉटेल व्यावसायिकांचा समावेश आहे. व्यावसायिक उद्देश साध्य करण्यासाठी त्यांच्याकडून सर्व कायद्यांची पायमल्ली होताना दिसत आहे. यामुळे शहरातल्या अनेक विभागांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. काही हॉटेल व्यावसायिकांकडून उघड्यावरच टेबल मांडून बार चालवले जात आहेत. त्यामुळे त्याठिकाणच्या रस्त्याने ये-जा करणाºया महिला, मुलींना लाजेखातर आपला मार्ग बदलावा लागत आहे. कोपरखैरणेतील क्लासिक व समुद्र हे दोन्ही बार पहाटे सहा वाजेपर्यंत चालवले जात असल्याचे दिसून येत आहे.दोन्ही बार रहदारीच्या मुख्य रस्त्यावर असल्याने अनेकांनी त्याची पोलिसांकडे तक्रार देखील केलेली आहे. त्यापैकी समुद्र बार ज्ञानविकास शाळेपासून काही अंतरावरच असल्याने शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना सकाळी सकाळी तळीरामांचे दर्शन घडत आहे. या प्रकाराबाबत पालकांनीही संताप व्यक्त केला आहे.प्रवेशद्वाराचे अर्धवट शटर बंद ठेवून हे बार पहाटेपर्यंत चालवले जात आहेत. अशावेळी एखाद्याची तक्रार आल्यास सदर हॉटेल अथवा बारवर पोलिसांकडून दंड स्वरूपात पाच हजार रुपयांची पावती फाडली जाते. त्यानंतर मात्र पुन्हा पुढची तक्रार येईपर्यंत त्याठिकाणी कायद्याची पायमल्ली सुरूच असते. यामुळे प्रत्येक महिन्याला अशा बारवर एकतरी दंडाची कारवाई करून बाजू सावरण्याचा प्रकारच पोलिसांकडून सुरू असल्याचाही नागरिकांचा आरोप आहे.पहाटेपर्यंत चालणाºया बार व्यावसायिकांकडून पोलिसांना प्रतिमहिना लाखमोलाचे सहकार्य होत असल्याची देखील चर्चा आहे. यामुळे देखील त्यांना कायद्याची पायमल्ली करण्यात पोलिसांकडून सूट मिळत असल्याची शक्यता सर्वसामान्यांकडून वर्तवली जात आहे. तर मद्यविक्री केंद्राबाहेर अथवा पाडलेल्या अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी उघड्यावर मद्यपानाला थेट उत्पादन शुल्क विभागाकडूनच छुपे पाठबळ मिळत असल्याने त्याठिकाणीही पोलिसांकडून डोळेझाक होताना दिसत आहे.या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी मद्यपान करून परिसरात भटकणाºयांकडून गंभीर गुन्हेगारी कृत्य घडल्यानंतर झोपेचे सोंग घेणारे प्रशासन जागे होणार का? असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवाय, पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत आहे.>उशिरापर्यंत बार चालवला जात असतानाही पकडले जाऊ नये याकरिता बिलाच्या मशिनमध्ये फेरफार केला जात आहे. काही बारमध्ये मध्यरात्री दीडनंतर बिलाची प्रिंट दिली जात नाही, तर काहींनी प्रिंट मशिनमधून वेळ हटवली आहे. काहींनी रात्री दीडनंतर प्रिंट होणाºया बिलावर वेळ छापली जाणार नाही असे फेरफार करून घेतल्याचेही समोर आले आहे.>पहाटेपर्यंत सुरू राहणाºया बारमुळे त्याच मार्गाने सकाळच्या वेळी शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार घडण्याची शक्यता आहे. तिथले गर्दुल्ले रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर भटकत असल्याने गुन्हेगारी घटना घडण्याचीही शक्यता असते. अशा बार व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याची गरज आहे.- मनोज म्हात्रे, कोपरखैरणे रहिवासी