शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

धाबेवाडीत पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: May 31, 2016 03:16 IST

तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायत हद्दीतील धाबेवाडीमधील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट वर्षानुवर्षे सुरूच आहे.

कर्जत : तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायत हद्दीतील धाबेवाडीमधील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट वर्षानुवर्षे सुरूच आहे. तेथे पाणी साठवण करण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने तेथील आदिवासी महिलांना दोन ते तीन मैल डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे.नांदगाव रस्त्यावर धाबेवाडी ही आदिवासी समाजाची ४० घरांची वस्ती असलेली वाडी आहे. खांडस ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या या वाडीमध्ये पिण्याचे पाणी साठवून ठेवणारी कोणतीही व्यवस्था नाही. शासनाच्या कोणत्याही व्यवस्थेने धाबेवाडीमध्ये विहीर खोदली नाही, अथवा पाणी योजना राबविली नाही. त्यामुळे या वाडीतील महिला डोक्यावर हांडे घेऊन रस्त्याच्या कडेने बांगारवाडीमध्ये असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी जात असतात. ते अंतर दीड किलोमीटरचे असून धाबेवाडीमधील महिलांची पायपीट वर्षानुवर्षे थांबण्याचे नाव घेत नाही.मागील तीन महिन्यांपासून बांगारवाडीची विहीर देखील कोरडी पडल्याने त्या विहिरीमध्ये पाण्याचे टँकर खासगी संस्था आणि शासनाच्या वतीने टाकले जातात. मात्र ते टँकर दररोज येत नसल्याने धाबेवाडीमधील महिलांना अन्य पर्याय म्हणून घुटेवाडी येथील विहिरीवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी जावे लागते. घुटेवाडीपासून धाबेवाडी हे अंतर तब्बल तीन किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे धाबेवाडीमधील महिलांची मागील काही महिन्यात पाण्यासाठी धावपळ वाढली आहे. धाबेवाडीमध्ये शासनाने एखादी विहिर असती तर पाणीटंचाईच्या काळात धाबेवाडीमधील विहिरीमध्ये टँकरचे पाणी टाकण्याची सोय झाली असती असे मत आदिवासी ग्रामस्थ गजानन पारधी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे. (वार्ताहर) महाड : वाढते तापमान तसेच गतवर्षी झालेला कमी पाऊस यामुळे नद्या, नाले, विंधन विहिरी हे पाण्याचे स्रोत आटल्यामुळे दरवर्षीप्रमाणे महाड तालुक्यातील १४ गावांसह ११७ वाड्यांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या १३१ ठिकाणी केवळ नऊ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत असून, हे टँकर्स अपुरे पडत आहेत. जून महिन्याच्या तोंडावर तर टंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे.कोथुर्डे धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्यामुळे या धरणाच्या पाण्यावर आधारित असलेल्या नाते, आचळोली, दासगांव, आचळोली, नांदगाव, मोहोप्रे, कोळोसे, नांदगाव खुर्द, गांधारपाले, वहूर, केंबुर्ली, काचले, चापगाव, लाडवली, करंजखोल, गोंडाळे, तळोशी, मांडले, पाखाडी, केंबुर्ली, आढी, डोंगरोली या गावांना तसेच तेथील वाड्यांतील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मात्र टँकरच्या अपुऱ्या पाण्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महाड तालुक्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या नळपाणीपुरवठा योजनांवर खर्च केले जातात. मात्र महाड तालुका टँकरमुक्त करण्याऐवजी टँकरमुक्त गावे आणि वाड्यांची संख्या दरवर्षी वाढतच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाड शहराला मात्र या टंचाईची झळ पोहोचलेली नाही. नगर परिषदेचे पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यामुळे शहरवासीयांना सध्या मुबलक पाणीपुरवठा करण्यात नगर परिषद प्रशासनाला यश आल्याचे दिसून येत आहे.