शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

धाबेवाडीत पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: May 31, 2016 03:16 IST

तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायत हद्दीतील धाबेवाडीमधील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट वर्षानुवर्षे सुरूच आहे.

कर्जत : तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायत हद्दीतील धाबेवाडीमधील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट वर्षानुवर्षे सुरूच आहे. तेथे पाणी साठवण करण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने तेथील आदिवासी महिलांना दोन ते तीन मैल डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे.नांदगाव रस्त्यावर धाबेवाडी ही आदिवासी समाजाची ४० घरांची वस्ती असलेली वाडी आहे. खांडस ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या या वाडीमध्ये पिण्याचे पाणी साठवून ठेवणारी कोणतीही व्यवस्था नाही. शासनाच्या कोणत्याही व्यवस्थेने धाबेवाडीमध्ये विहीर खोदली नाही, अथवा पाणी योजना राबविली नाही. त्यामुळे या वाडीतील महिला डोक्यावर हांडे घेऊन रस्त्याच्या कडेने बांगारवाडीमध्ये असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी जात असतात. ते अंतर दीड किलोमीटरचे असून धाबेवाडीमधील महिलांची पायपीट वर्षानुवर्षे थांबण्याचे नाव घेत नाही.मागील तीन महिन्यांपासून बांगारवाडीची विहीर देखील कोरडी पडल्याने त्या विहिरीमध्ये पाण्याचे टँकर खासगी संस्था आणि शासनाच्या वतीने टाकले जातात. मात्र ते टँकर दररोज येत नसल्याने धाबेवाडीमधील महिलांना अन्य पर्याय म्हणून घुटेवाडी येथील विहिरीवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी जावे लागते. घुटेवाडीपासून धाबेवाडी हे अंतर तब्बल तीन किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे धाबेवाडीमधील महिलांची मागील काही महिन्यात पाण्यासाठी धावपळ वाढली आहे. धाबेवाडीमध्ये शासनाने एखादी विहिर असती तर पाणीटंचाईच्या काळात धाबेवाडीमधील विहिरीमध्ये टँकरचे पाणी टाकण्याची सोय झाली असती असे मत आदिवासी ग्रामस्थ गजानन पारधी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे. (वार्ताहर) महाड : वाढते तापमान तसेच गतवर्षी झालेला कमी पाऊस यामुळे नद्या, नाले, विंधन विहिरी हे पाण्याचे स्रोत आटल्यामुळे दरवर्षीप्रमाणे महाड तालुक्यातील १४ गावांसह ११७ वाड्यांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या १३१ ठिकाणी केवळ नऊ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत असून, हे टँकर्स अपुरे पडत आहेत. जून महिन्याच्या तोंडावर तर टंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे.कोथुर्डे धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्यामुळे या धरणाच्या पाण्यावर आधारित असलेल्या नाते, आचळोली, दासगांव, आचळोली, नांदगाव, मोहोप्रे, कोळोसे, नांदगाव खुर्द, गांधारपाले, वहूर, केंबुर्ली, काचले, चापगाव, लाडवली, करंजखोल, गोंडाळे, तळोशी, मांडले, पाखाडी, केंबुर्ली, आढी, डोंगरोली या गावांना तसेच तेथील वाड्यांतील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मात्र टँकरच्या अपुऱ्या पाण्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महाड तालुक्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या नळपाणीपुरवठा योजनांवर खर्च केले जातात. मात्र महाड तालुका टँकरमुक्त करण्याऐवजी टँकरमुक्त गावे आणि वाड्यांची संख्या दरवर्षी वाढतच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाड शहराला मात्र या टंचाईची झळ पोहोचलेली नाही. नगर परिषदेचे पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यामुळे शहरवासीयांना सध्या मुबलक पाणीपुरवठा करण्यात नगर परिषद प्रशासनाला यश आल्याचे दिसून येत आहे.