शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

रिक्षाच्या अतिवेगाने घेतला चिमुकल्याचा बळी; खारघरमधील घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 26, 2024 19:18 IST

यामध्ये ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. खारघरमध्ये रविवारी झालेल्या अश्वमेघ यज्ञाला उपस्थित राहून सर्वजण घरी जाण्यासाठी खारघर स्थानकाकडे येताना हा अपघात घडला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : खारघर येथे भरधाव रिक्षाचा अपघात होऊन चौघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. खारघरमध्ये रविवारी झालेल्या अश्वमेघ यज्ञाला उपस्थित राहून सर्वजण घरी जाण्यासाठी खारघर स्थानकाकडे येताना हा अपघात घडला. 

रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे सतत अपघाताच्या घटना घडत असतात. अशाच प्रकारातून खारघरमध्ये अपघात घडवून ९ वर्षीय मुलाचे प्राण गमावले आहेत. भिवंडी येथे राहणारे घनश्याम नायक व ऋषिकेश दुबे सहकुटुंब खारघरमधील अश्वमेघ यज्ञासाठी आले होते. दुपारच्या सुमारास सर्व विधी उरकून दोन्ही कुटुंबे घराकडे चालले होते. यासाठी ते एकाच रिक्षाने खारघर स्थानकाकडे येत होते. यावेळी रिक्षात दुबे पती पत्नी व नायक यांची पत्नी व ९ वर्षाचा मुलगा दिव्याप्रसाद असे बसलेले होते. रिक्षा चालक सतीश उत्तेकर (२८) याच्याकडून अति वेगात रिक्षा पळवली जात असताना त्याचे नियंत्रण सुटून रिक्षा दुभाजकाला धडकून अपघात झाला.

यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले असता त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी दिव्याप्रसाद (९) याला मृत घोषित केले. तर इतर तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी रिक्षा चालक सतीश उत्तेकर याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मार्गावर रिक्षा चालकांच्या वेगावर नियंत्रण नसल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील येत होत्या. अखेर अति वेगामुळे अपघात घडून चिमुकल्याला प्राण गमवावे लागले आहेत.