शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

रिक्षाच्या अतिवेगाने घेतला चिमुकल्याचा बळी; खारघरमधील घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 26, 2024 19:18 IST

यामध्ये ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. खारघरमध्ये रविवारी झालेल्या अश्वमेघ यज्ञाला उपस्थित राहून सर्वजण घरी जाण्यासाठी खारघर स्थानकाकडे येताना हा अपघात घडला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : खारघर येथे भरधाव रिक्षाचा अपघात होऊन चौघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. खारघरमध्ये रविवारी झालेल्या अश्वमेघ यज्ञाला उपस्थित राहून सर्वजण घरी जाण्यासाठी खारघर स्थानकाकडे येताना हा अपघात घडला. 

रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे सतत अपघाताच्या घटना घडत असतात. अशाच प्रकारातून खारघरमध्ये अपघात घडवून ९ वर्षीय मुलाचे प्राण गमावले आहेत. भिवंडी येथे राहणारे घनश्याम नायक व ऋषिकेश दुबे सहकुटुंब खारघरमधील अश्वमेघ यज्ञासाठी आले होते. दुपारच्या सुमारास सर्व विधी उरकून दोन्ही कुटुंबे घराकडे चालले होते. यासाठी ते एकाच रिक्षाने खारघर स्थानकाकडे येत होते. यावेळी रिक्षात दुबे पती पत्नी व नायक यांची पत्नी व ९ वर्षाचा मुलगा दिव्याप्रसाद असे बसलेले होते. रिक्षा चालक सतीश उत्तेकर (२८) याच्याकडून अति वेगात रिक्षा पळवली जात असताना त्याचे नियंत्रण सुटून रिक्षा दुभाजकाला धडकून अपघात झाला.

यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले असता त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी दिव्याप्रसाद (९) याला मृत घोषित केले. तर इतर तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी रिक्षा चालक सतीश उत्तेकर याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मार्गावर रिक्षा चालकांच्या वेगावर नियंत्रण नसल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील येत होत्या. अखेर अति वेगामुळे अपघात घडून चिमुकल्याला प्राण गमवावे लागले आहेत.