शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

योग्य नियोजनातून पाणीटंचाईवर मात

By admin | Updated: April 25, 2017 01:24 IST

एमजेपीकडून करण्यात आलेली पाणीकपात त्याचबरोबर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू नये याकरिता पनवेल महापालिकेने शहरात

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीएमजेपीकडून करण्यात आलेली पाणीकपात त्याचबरोबर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू नये याकरिता पनवेल महापालिकेने शहरात दोन झोन पाडून या ठिकाणी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु नागरिकांची ओरड पाहून प्रशासनाने तीन दिवस दररोज पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर इतर चार दिवसांत दोन दिवस जास्त दाबाने पाणी दिले जाणार आहे. पनवेलकरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.पनवेल पालिकेने शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता १०० वर्षांपूर्वी धरण विकसित केले आहे. एकूण १५ किमी अंतरावर असलेल्या या धरणातून जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या जलाशयात एकूण ३.५७ दशलक्ष घनमीटर क्षमता पाणी साठवून ठेवण्याची क्षमता होती. मात्र पावसाळ्यात माथेरानच्या डोंगराहून पाण्याबरोबर वाहत येणारा गाळ धरणात बसल्यामुळे खोली कमी होत आहे. त्यामुळे पाणी साठवून ठेवण्याची क्षमताही कमी झालेली आहे. जुलै ते मार्च देहरंग धरणातून एकूण १२ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर उर्वरित पाणी एमजेपी आणि एमआयडीसीकडून घेण्यात येते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा महापालिकेला पाण्याचा मुख्य स्रोत आहे. त्याशिवाय पनवेलकरांची तहान पालिका प्रशासन भागवू शकत नाही. परंतु एमजेपीची वाहिनी जीर्ण झालेली असल्याने तिला फुटीचे ग्रहण लागले आहे. तसेच टाटा पॉवर कंपनीकडून सुटीच्या दिवशी पाताळगंगा नदीत पाणी सोडले जात नसल्याने पात्रात पाण्याची कमतरता भासू लागलेली आहे. यामुळे एमजेपीला मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करता येत नाही. त्यामुळे शहरवाशीयांना सुध्दा पूर्वीप्रमाणे मुबलक पाणी देता येता नाही. पनवेल शहराला सुमारे २७ एमएलडी पाण्याची गरज आहे. आजघडीला एमजेपी आणि एमआयडीसीकडून प्रत्येकी ८ आणि ७ एमएलडी पाणी प्राप्त होत आहे. म्हणजे एकूण १५ एमएलडी पाणी बाहेरून प्राप्त होत आहे. त्याच पाण्यावर पनवेलकरांची तहान भागविण्यात येत होती. झोन करून दिवसाआड पाणी देण्यात येत होते. परंतु आता तीन दिवस नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.