शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

अमरधाम स्मशानभूमीवर बाहेरील मृतदेहांचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 02:03 IST

पनवेलमधील प्रकार : गावांमधील वादामुळे नातेवाइकांची गैरसोय

अरुणकुमार मेहत्रे 

कळंबोली : पनवेल शहराकरिता असलेल्या अमरधाम स्मशानभूमीत बाहेरचे मृतदेह मोठ्या प्रमाणात अंत्यविधीसाठी आणले जात आहेत. त्यामुळे येथील यंत्रणेवर अतिरिक्त भार पडत आहे. त्याचबरोबर एकाच वेळी जास्त मृतदेह आल्याने मृतांच्या नातेवाइकांना ताटकळत राहावे लागते. आजूबाजूच्या गावांमधील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करू दिले जात नसल्याने मृतांच्या नातेवाइकांची मोठी गैरसोय होत आहेत.

पनवेल शहरात अमरधाम ही एकमेव स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत संपूर्ण तालुक्यातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. सिडको वसाहतींमध्ये स्मशानभूमीकरिता भूखंड राखीव आहे, तसेच कळंबोली, कामोठे, खारघर येथे स्मशानभूमीसुद्धा आहेत. याशिवाय आजूबाजूच्या परिसरात म्हणजेच गावांमध्येही इमारती उभारल्या आहेत. या ठिकाणी विविध प्रांतातून आलेले लोक राहत आहेत. एकूणच दिवसेंदिवस येथील लोकसंख्या वाढत आहे. त्याचा ताण उपलब्ध पायाभूत सुविधांवर पडत आहे. सध्या स्मशानभूमीचा विषय वादाचा ठरला आहे. काही गावांमध्ये आजूबाजूच्या इमारतीमध्ये एखादी व्यक्ती मयत झाली तर त्याचा अंत्यविधी स्थानिक ग्रामस्थ गावातील स्मशानभूमीमध्ये करू देत नाहीत. त्यामुळे हे मृतदेह अंत्यविधीसाठी पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमी मध्ये आणले जातात. यावरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. सध्या येथील अमरधाम स्मशानभूमीत पनवेलसह सुकापूर, कामोठे, आदई, करंजाडे, नांदगाव, विहिघर, कोप्रोली, वलप कळंबोली, चिंचपाडा, पोयंजे, मोरबे, चिपळे, बारापाडा, माळेवाडी, धानसर, वाकडी, नेरे, उसर्ली, उलवे आदी ठिकाणाहून अंत्यविधीसाठी मृतदेह आणले जातात. ही संख्या मोठी असल्याने त्याचा अतिरिक्त ताण स्मशानभूमी आणि तेथील कर्मचाऱ्यांवर पडत आहे. अंत्यविधीसाठी बाहेरून आणल्या जाणाºया मृतदेहामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.खांदा कॉलनीतील स्मशानभूमी कागदावरचखांदा कॉलनीत बालभारती जवळ स्मशानभूमीसाठी भूखंड राखीव आहे; परंतु बाजूच्या रहिवाशांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे आजपर्यंत येथे स्मशानभूमी उभारू शकली नाही, त्यामुळे या कॉलनीतील अंत्यविधीचा भार अमरधाम स्मशानभूमीवर पडत आहे. गेल्या सहा महिन्यांत या परिसरातील ४० पेक्षा अधिक मृतदेहांवर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.सात महिन्यांत ३०० मृतदेहांवर अंत्यविधीमागील सात महिन्यांत अमरधाम स्मशानभूमीत एकूण ३०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. इतर शहरांच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. यापैकी १९३ मृतदेह पनवेल शहराबाहेरचे आहेत, तर शहरातील मृतदेहांचा आकडा १०७ असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.पनवेल परिसरातून महामार्ग जात आहेत. या ठिकाणी अपघाती मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे सहाजिकच अमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी जास्त मृतदेह येतात. त्याचबरोबर बाहेरील गावांमध्ये स्मशानभूमीवरून वाद आहेत. ही परिस्थितीही याला कारणीभूत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही मृतदेहावरील अंत्यविधीला नकार देता येत नाही, त्यामुळे अमरधाम स्मशानभूमीत परवानगी दिली जाते. त्यामुळे येथील उपलब्ध सुविधांवर व तेथील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडतोय, ही बाब खरी आहे.- शैलेश गायकवाड,आरोग्य निरीक्षक, पनवेल, महानगरपालिका 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई