शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

अमरधाम स्मशानभूमीवर बाहेरील मृतदेहांचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 02:03 IST

पनवेलमधील प्रकार : गावांमधील वादामुळे नातेवाइकांची गैरसोय

अरुणकुमार मेहत्रे 

कळंबोली : पनवेल शहराकरिता असलेल्या अमरधाम स्मशानभूमीत बाहेरचे मृतदेह मोठ्या प्रमाणात अंत्यविधीसाठी आणले जात आहेत. त्यामुळे येथील यंत्रणेवर अतिरिक्त भार पडत आहे. त्याचबरोबर एकाच वेळी जास्त मृतदेह आल्याने मृतांच्या नातेवाइकांना ताटकळत राहावे लागते. आजूबाजूच्या गावांमधील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करू दिले जात नसल्याने मृतांच्या नातेवाइकांची मोठी गैरसोय होत आहेत.

पनवेल शहरात अमरधाम ही एकमेव स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत संपूर्ण तालुक्यातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. सिडको वसाहतींमध्ये स्मशानभूमीकरिता भूखंड राखीव आहे, तसेच कळंबोली, कामोठे, खारघर येथे स्मशानभूमीसुद्धा आहेत. याशिवाय आजूबाजूच्या परिसरात म्हणजेच गावांमध्येही इमारती उभारल्या आहेत. या ठिकाणी विविध प्रांतातून आलेले लोक राहत आहेत. एकूणच दिवसेंदिवस येथील लोकसंख्या वाढत आहे. त्याचा ताण उपलब्ध पायाभूत सुविधांवर पडत आहे. सध्या स्मशानभूमीचा विषय वादाचा ठरला आहे. काही गावांमध्ये आजूबाजूच्या इमारतीमध्ये एखादी व्यक्ती मयत झाली तर त्याचा अंत्यविधी स्थानिक ग्रामस्थ गावातील स्मशानभूमीमध्ये करू देत नाहीत. त्यामुळे हे मृतदेह अंत्यविधीसाठी पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमी मध्ये आणले जातात. यावरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. सध्या येथील अमरधाम स्मशानभूमीत पनवेलसह सुकापूर, कामोठे, आदई, करंजाडे, नांदगाव, विहिघर, कोप्रोली, वलप कळंबोली, चिंचपाडा, पोयंजे, मोरबे, चिपळे, बारापाडा, माळेवाडी, धानसर, वाकडी, नेरे, उसर्ली, उलवे आदी ठिकाणाहून अंत्यविधीसाठी मृतदेह आणले जातात. ही संख्या मोठी असल्याने त्याचा अतिरिक्त ताण स्मशानभूमी आणि तेथील कर्मचाऱ्यांवर पडत आहे. अंत्यविधीसाठी बाहेरून आणल्या जाणाºया मृतदेहामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.खांदा कॉलनीतील स्मशानभूमी कागदावरचखांदा कॉलनीत बालभारती जवळ स्मशानभूमीसाठी भूखंड राखीव आहे; परंतु बाजूच्या रहिवाशांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे आजपर्यंत येथे स्मशानभूमी उभारू शकली नाही, त्यामुळे या कॉलनीतील अंत्यविधीचा भार अमरधाम स्मशानभूमीवर पडत आहे. गेल्या सहा महिन्यांत या परिसरातील ४० पेक्षा अधिक मृतदेहांवर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.सात महिन्यांत ३०० मृतदेहांवर अंत्यविधीमागील सात महिन्यांत अमरधाम स्मशानभूमीत एकूण ३०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. इतर शहरांच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. यापैकी १९३ मृतदेह पनवेल शहराबाहेरचे आहेत, तर शहरातील मृतदेहांचा आकडा १०७ असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.पनवेल परिसरातून महामार्ग जात आहेत. या ठिकाणी अपघाती मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे सहाजिकच अमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी जास्त मृतदेह येतात. त्याचबरोबर बाहेरील गावांमध्ये स्मशानभूमीवरून वाद आहेत. ही परिस्थितीही याला कारणीभूत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही मृतदेहावरील अंत्यविधीला नकार देता येत नाही, त्यामुळे अमरधाम स्मशानभूमीत परवानगी दिली जाते. त्यामुळे येथील उपलब्ध सुविधांवर व तेथील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडतोय, ही बाब खरी आहे.- शैलेश गायकवाड,आरोग्य निरीक्षक, पनवेल, महानगरपालिका 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई