शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अमरधाम स्मशानभूमीवर बाहेरील मृतदेहांचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 02:03 IST

पनवेलमधील प्रकार : गावांमधील वादामुळे नातेवाइकांची गैरसोय

अरुणकुमार मेहत्रे 

कळंबोली : पनवेल शहराकरिता असलेल्या अमरधाम स्मशानभूमीत बाहेरचे मृतदेह मोठ्या प्रमाणात अंत्यविधीसाठी आणले जात आहेत. त्यामुळे येथील यंत्रणेवर अतिरिक्त भार पडत आहे. त्याचबरोबर एकाच वेळी जास्त मृतदेह आल्याने मृतांच्या नातेवाइकांना ताटकळत राहावे लागते. आजूबाजूच्या गावांमधील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करू दिले जात नसल्याने मृतांच्या नातेवाइकांची मोठी गैरसोय होत आहेत.

पनवेल शहरात अमरधाम ही एकमेव स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत संपूर्ण तालुक्यातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. सिडको वसाहतींमध्ये स्मशानभूमीकरिता भूखंड राखीव आहे, तसेच कळंबोली, कामोठे, खारघर येथे स्मशानभूमीसुद्धा आहेत. याशिवाय आजूबाजूच्या परिसरात म्हणजेच गावांमध्येही इमारती उभारल्या आहेत. या ठिकाणी विविध प्रांतातून आलेले लोक राहत आहेत. एकूणच दिवसेंदिवस येथील लोकसंख्या वाढत आहे. त्याचा ताण उपलब्ध पायाभूत सुविधांवर पडत आहे. सध्या स्मशानभूमीचा विषय वादाचा ठरला आहे. काही गावांमध्ये आजूबाजूच्या इमारतीमध्ये एखादी व्यक्ती मयत झाली तर त्याचा अंत्यविधी स्थानिक ग्रामस्थ गावातील स्मशानभूमीमध्ये करू देत नाहीत. त्यामुळे हे मृतदेह अंत्यविधीसाठी पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमी मध्ये आणले जातात. यावरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. सध्या येथील अमरधाम स्मशानभूमीत पनवेलसह सुकापूर, कामोठे, आदई, करंजाडे, नांदगाव, विहिघर, कोप्रोली, वलप कळंबोली, चिंचपाडा, पोयंजे, मोरबे, चिपळे, बारापाडा, माळेवाडी, धानसर, वाकडी, नेरे, उसर्ली, उलवे आदी ठिकाणाहून अंत्यविधीसाठी मृतदेह आणले जातात. ही संख्या मोठी असल्याने त्याचा अतिरिक्त ताण स्मशानभूमी आणि तेथील कर्मचाऱ्यांवर पडत आहे. अंत्यविधीसाठी बाहेरून आणल्या जाणाºया मृतदेहामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.खांदा कॉलनीतील स्मशानभूमी कागदावरचखांदा कॉलनीत बालभारती जवळ स्मशानभूमीसाठी भूखंड राखीव आहे; परंतु बाजूच्या रहिवाशांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे आजपर्यंत येथे स्मशानभूमी उभारू शकली नाही, त्यामुळे या कॉलनीतील अंत्यविधीचा भार अमरधाम स्मशानभूमीवर पडत आहे. गेल्या सहा महिन्यांत या परिसरातील ४० पेक्षा अधिक मृतदेहांवर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.सात महिन्यांत ३०० मृतदेहांवर अंत्यविधीमागील सात महिन्यांत अमरधाम स्मशानभूमीत एकूण ३०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. इतर शहरांच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. यापैकी १९३ मृतदेह पनवेल शहराबाहेरचे आहेत, तर शहरातील मृतदेहांचा आकडा १०७ असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.पनवेल परिसरातून महामार्ग जात आहेत. या ठिकाणी अपघाती मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे सहाजिकच अमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी जास्त मृतदेह येतात. त्याचबरोबर बाहेरील गावांमध्ये स्मशानभूमीवरून वाद आहेत. ही परिस्थितीही याला कारणीभूत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही मृतदेहावरील अंत्यविधीला नकार देता येत नाही, त्यामुळे अमरधाम स्मशानभूमीत परवानगी दिली जाते. त्यामुळे येथील उपलब्ध सुविधांवर व तेथील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडतोय, ही बाब खरी आहे.- शैलेश गायकवाड,आरोग्य निरीक्षक, पनवेल, महानगरपालिका 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई