शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बाहेरील रुग्णांचा नवी मुंबईवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 00:41 IST

स्थानिकांची होतेय परवड : राजकीय शिफारशीमुळे प्रशासन हतबल

कमलाकर कांबळेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईतील खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांत शहराबाहेरील रुग्णांचा अतिरिक्त भार वाढल्याने स्थानिक रुग्णांची परवड होताना दिसत आहे. मुंबई, ठाणे आणि पनवेल परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात नवी मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे करदात्या नवी मुंबईकरांनाच बेडसह इतर आरोग्य सुविधांसाठी वणवण करावी लागत आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्स बेड‌्सची संख्या अपुरी पडू लागली आहे, तर ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. बेड मिळविण्यासाठी नवी मुंबईकरांना कसरत करावी लागत आहे. विविध स्तरावर प्रयत्न करूनही वेळेत बेड उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने दर्जेदार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेकडे सध्या २३०० ऑक्सिजन बेड‌्स आहेत, तर ५०५ आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड आहेत. सुमारे चार हजार साध्या खाटा आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येत्या काळात आवश्यकतेनुसार खाटांची संख्या वाढविण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. तसेच खासगी रुग्णालयांतसुद्धा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड आहेत. असे असतानाही नवी मुंबईकरांना बेड मिळविण्यासाठी मोठे श्रम करावे लागत आहेत. शेजारच्या शहरातील रुग्णांचे अतिक्रमण हे यामागचे कारण असल्याचा आरोप नवी मुंबईकर करू लागले आहेत.निवडणुका रखडल्याने महापालिकेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजित बांगर हे महापालिकेचे आयुक्त व प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. कोरोनाच्या महामारीत त्यांचे काम उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनासुद्धा तितक्याच प्रभावी ठरताना दिसत आहेत. परंतु सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदारांच्या दबावाखाली महापालिका प्रशासन काम करीत असल्याचा आरोप केला जात आहे. कारण शहराबाहेरील रुग्णांना नवी मुंबईत सर्रास बेड उपलब्ध करून दिले जात आहेत. महापालिकेच्याच नव्हे, तर खासगी रुग्णालयांतसुद्धा शेजारच्या शहरातील रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे स्थानिक रुग्णांना बेड आणि इतर वैद्यकीय सुविधांसाठी भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनीसुद्धा यासंदर्भात प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. नवी मुंबईतील ऑक्सिजनचा साठा परस्पर शेजारच्या शहरात वळविला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सोशल मीडियावर चर्चानवी मुंबई महापालिकेत सध्या लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू आहे. महापालिका आयुक्त त्याला बळी पडत आहेत. परंतु हे अधिक काळ चालणार नाही. नवी मुंबईतील जनता हा अन्याय कदापी खपवून घेणार नाही, अशा आशयाचे संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवी मुंबईत साधारण १० ते १५ टक्के रुग्ण गोवंडी, मानखुर्द, चेंबूर तसेच ठाण्याच्या मुंब्रा परिसरातील आहेत. राजकीय दबावामुळे बाहेरील रुग्णांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना बेडसाठी वणवण करावी लागत आहे. या प्रकाराकडे माजी नगरसेवक आणि शहरातील आमदार हतबल होऊन पाहत आहेत, ही नवी मुंबईकरांची मोठी शोकांतिका आहे.- प्रदीप नामदेव म्हात्रे, अध्यक्ष, दिव्यादीप फाउण्डेशन, नवी मुंबई 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या