शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची आमची कमिटमेंट

By नामदेव मोरे | Updated: September 25, 2024 17:01 IST

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन :समाजात दुफळी निर्माण होणे राज्याला भुषणावह नसल्याचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मराठा समाजाने राज्यातील विविध समाजाचे नेतृत्व केले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगड जातीचे मावळे एकमेकांसमोर उभे राहणे महाराष्ट्राला भुषणावह नाही. दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होणार नाही यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देणे ही आमची कमिटमेंट असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत दिले.

 मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमीत्त आयोजीत मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. मराठा समाजाची चळवळ अण्णासाहेब पाटील यांच्यामुळे उभी राहिली. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची त्यांची मागणी तेव्हा दुर्दैवाने मंजूर होऊ शकली नाही. मराठा समाजाच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. आता वेगवेगळ्या आरक्षणाची मागणी होत आहे. कायद्याच्या चौकटीत बसेल अशी मागणी असली पाहिजे. अन्यथा एखादा निर्णय घ्यायचा व तो न्यायालयात टिकला नाही तर समाजाची फरफट होईल. मराठा समाजाने राज्यातील विविध समाजाचे नेतृत्व केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगड जातीचे मावळे एकमेकांविरोधात उभे राहणे राज्यासाठी भूषणावह नाही. दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देण्याची आमची कमिटमेंट आहे. सारथीच्या माध्यमातून युपीएससी व एमपीएससीमध्ये अनेक तरूण यशस्वी झाले आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख मराठा उद्योजक घडविले असल्याचेही स्पष्ट केले.

माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार. नाशिकमधील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी १५ दिवसामध्ये बैठक आयोजीत केली जाईल. नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या घरांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगारांना घरे देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. माथाडी कामगारांच्या नावाने चुकीचे काम करणारांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिली. माथाडी कामगारांवर अन्याय होईल असा कोणताही कायदा सरकार करणार नाही. कामगार नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांनी यावेळी कामगारांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. मेळाव्यास आमदार गणेश नाईक, प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, प्रसाद लाड, संदीप नाईक, संजीव नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे....

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे नाव मराठा क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असे नामकरण करणार.

माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न मार्गी लावणार.

नाशिक येथील माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी १५ दिवसात बैठक बोलावणार.

नवी मुंबईतील गृहप्रकल्पात कामगारांना प्राधान्य देण्याविषयी प्रयत्न करणार.

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजक घडविले, ८४०० कोटीचे कर्जवाटप.

सारथीच्या माध्यमातून १२ आयएएस, १८ आयपीएस व एमपीएसीमध्ये ४८० उमेदवार यशस्त्री झाले.

मराठा समाजासाठी होस्टेलची सुविधा, होस्टेल न मिळणारांना ७ हजार रुपये निर्वाह भत्ता.

माथाडी चळवळीचा दुरूपयोग करणारांचा बंदोबस्त करणार.

माथाडी कामगारांवर अन्याय होईल असा कायदा करणार नाही.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस