शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची आमची कमिटमेंट

By नामदेव मोरे | Updated: September 25, 2024 17:01 IST

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन :समाजात दुफळी निर्माण होणे राज्याला भुषणावह नसल्याचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मराठा समाजाने राज्यातील विविध समाजाचे नेतृत्व केले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगड जातीचे मावळे एकमेकांसमोर उभे राहणे महाराष्ट्राला भुषणावह नाही. दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होणार नाही यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देणे ही आमची कमिटमेंट असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत दिले.

 मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमीत्त आयोजीत मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. मराठा समाजाची चळवळ अण्णासाहेब पाटील यांच्यामुळे उभी राहिली. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची त्यांची मागणी तेव्हा दुर्दैवाने मंजूर होऊ शकली नाही. मराठा समाजाच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. आता वेगवेगळ्या आरक्षणाची मागणी होत आहे. कायद्याच्या चौकटीत बसेल अशी मागणी असली पाहिजे. अन्यथा एखादा निर्णय घ्यायचा व तो न्यायालयात टिकला नाही तर समाजाची फरफट होईल. मराठा समाजाने राज्यातील विविध समाजाचे नेतृत्व केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगड जातीचे मावळे एकमेकांविरोधात उभे राहणे राज्यासाठी भूषणावह नाही. दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देण्याची आमची कमिटमेंट आहे. सारथीच्या माध्यमातून युपीएससी व एमपीएससीमध्ये अनेक तरूण यशस्वी झाले आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख मराठा उद्योजक घडविले असल्याचेही स्पष्ट केले.

माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार. नाशिकमधील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी १५ दिवसामध्ये बैठक आयोजीत केली जाईल. नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या घरांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगारांना घरे देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. माथाडी कामगारांच्या नावाने चुकीचे काम करणारांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिली. माथाडी कामगारांवर अन्याय होईल असा कोणताही कायदा सरकार करणार नाही. कामगार नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांनी यावेळी कामगारांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. मेळाव्यास आमदार गणेश नाईक, प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, प्रसाद लाड, संदीप नाईक, संजीव नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे....

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे नाव मराठा क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असे नामकरण करणार.

माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न मार्गी लावणार.

नाशिक येथील माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी १५ दिवसात बैठक बोलावणार.

नवी मुंबईतील गृहप्रकल्पात कामगारांना प्राधान्य देण्याविषयी प्रयत्न करणार.

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजक घडविले, ८४०० कोटीचे कर्जवाटप.

सारथीच्या माध्यमातून १२ आयएएस, १८ आयपीएस व एमपीएसीमध्ये ४८० उमेदवार यशस्त्री झाले.

मराठा समाजासाठी होस्टेलची सुविधा, होस्टेल न मिळणारांना ७ हजार रुपये निर्वाह भत्ता.

माथाडी चळवळीचा दुरूपयोग करणारांचा बंदोबस्त करणार.

माथाडी कामगारांवर अन्याय होईल असा कायदा करणार नाही.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस