शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

योजनांपासून सर्वसामान्य नवी मुंबईकर वंचित; समाज विकास विभागाची दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 23:55 IST

आर्थिक वर्ष संपल्यानंतरही योजनांचा लाभ नाही

नामदेव मोरे

नवी मुंबई : समाज विकास विभागातील दप्तर दिरंगाईचा फटका नवी मुंबईमधील सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. कॅन्सर व क्षयरोग झालेल्या महिलांना उपचारासाठीचे अनुदान वेळेत देण्यात आलेले नाही. विधवा महिलांच्या मुलींच्या लग्नासाठी व इतर योजनांचे अनुदानही संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आलेले नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने गरिबांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. कॅन्सर, एचआयव्ही व क्षयरोग झालेल्या महिलांना उपचारासाठी २५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. विधवा महिलांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ६५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. सुतारकाम व प्लबिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० हजार रुपये दिले जातात. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते, परंतु सहा महिन्यांपासून या योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यात आलेले नाहीत.

या विभागामध्ये उपायुक्त म्हणून काम करणाऱ्या अमोलकुमार यादव यांची आठ महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर क्रांती पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून या विभागाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. ३१ मार्चपूर्वी सर्व योजनांची रक्कम संबंधित लाभार्थ्यांना वाटप होणे आवश्यक होते, परंतु विविध कारणांनी फाइलवर संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सह्या केल्या नाहीत. वेळेत निर्णय घेतले असते, कोरोनाचे संकट सुरू होण्यापूर्वी सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळाली असती.

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर प्रत्येक विभागामधील कर्मचाºयांना आरोग्य विभागातील कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.समाज विकास विभागातील समूह संघटकांनाही आरोग्य केंद्रातील जबाबदारी देण्यात आली आहे. अनेक लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी व इतर कामे अपूर्ण आहेत. कर्मचारी कोरोनाविषयी कामामध्ये व्यस्त असल्याचे भासविले जात आहे, परंतु प्रत्यक्षात समूह संघटकांनी काही महिन्यांपूर्वीच सर्व अर्ज जमा केले आहेत.

कार्यालयातील लेखनिक, समाजसेवक, समाज विकास अधिकारी व उपायुक्त स्तरावर काम रखडले आहे. कोरोनाच्या संकटात कॅन्सर, एचआयव्हीसारख्या आजाराशी लढणाºया महिलांकडे उपचार व घरखर्चासाठी पैसे नाहीत. मनपाकडे वारंवार मागणी करूनही अनुदान वेळेवर दिले जात नाही. यामुळे आम्ही उपचाराशिवाय व उपाशीच जीवन जगायचे का, असा प्रश्न वंचित लाभार्थी विचारू लागले आहेत. याविषयी माहिती घेण्यासाठी उपायुक्त क्रांती रेडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. काहींचे चेक तयार केले आहेत. लवकरच सर्वांना लाभ देण्याचे प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे.दोषींवर कारवाई करण्याची मागणीमार्च महिन्यापूर्वी समाज विकास विभागाच्या योजनांचा लाभ संबंधितांना मिळणे आवश्यक होते. अनेक महिन्यांपासून अर्ज प्रलंबित असून, दप्तर दिरंगाईमुळे विधवा महिला, कॅ न्सर व इतर आजार झालेल्या महिला, गरिबांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे. ज्यांच्यामुळे सामान्यांना योजनांपासून वंचित राहावे लागले, त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.निधीवर कात्री नको : कोरोनामुळे अनेक विभागांतील खर्चावर मर्यादा घातली आहे. महानगरपालिकेने समाज विकास विभागाच्या खर्चावर कात्री लावू नये. गरिबांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यात यावेत. गतवर्षीच्या योजनांचा आठ दिवसांत निपटारा करण्यात यावा व पुढील वर्षासाठीच्या योजनांसाठीही कार्यवाही लवकर सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.समाज विकास विभागाच्या माध्यमातून विधवा महिला इतरांसाठीच्या योजनांचा लाभ संबंधितांना देण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. काहींचे धनादेश देण्यात आले असून, उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच वाटप केले जाणार आहे. - क्रांती रेडकर, उपआयुक्त, समाज विकास विभाग

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका