शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

योजनांपासून सर्वसामान्य नवी मुंबईकर वंचित; समाज विकास विभागाची दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 23:55 IST

आर्थिक वर्ष संपल्यानंतरही योजनांचा लाभ नाही

नामदेव मोरे

नवी मुंबई : समाज विकास विभागातील दप्तर दिरंगाईचा फटका नवी मुंबईमधील सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. कॅन्सर व क्षयरोग झालेल्या महिलांना उपचारासाठीचे अनुदान वेळेत देण्यात आलेले नाही. विधवा महिलांच्या मुलींच्या लग्नासाठी व इतर योजनांचे अनुदानही संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आलेले नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने गरिबांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. कॅन्सर, एचआयव्ही व क्षयरोग झालेल्या महिलांना उपचारासाठी २५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. विधवा महिलांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ६५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. सुतारकाम व प्लबिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० हजार रुपये दिले जातात. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते, परंतु सहा महिन्यांपासून या योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यात आलेले नाहीत.

या विभागामध्ये उपायुक्त म्हणून काम करणाऱ्या अमोलकुमार यादव यांची आठ महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर क्रांती पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून या विभागाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. ३१ मार्चपूर्वी सर्व योजनांची रक्कम संबंधित लाभार्थ्यांना वाटप होणे आवश्यक होते, परंतु विविध कारणांनी फाइलवर संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सह्या केल्या नाहीत. वेळेत निर्णय घेतले असते, कोरोनाचे संकट सुरू होण्यापूर्वी सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळाली असती.

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर प्रत्येक विभागामधील कर्मचाºयांना आरोग्य विभागातील कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.समाज विकास विभागातील समूह संघटकांनाही आरोग्य केंद्रातील जबाबदारी देण्यात आली आहे. अनेक लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी व इतर कामे अपूर्ण आहेत. कर्मचारी कोरोनाविषयी कामामध्ये व्यस्त असल्याचे भासविले जात आहे, परंतु प्रत्यक्षात समूह संघटकांनी काही महिन्यांपूर्वीच सर्व अर्ज जमा केले आहेत.

कार्यालयातील लेखनिक, समाजसेवक, समाज विकास अधिकारी व उपायुक्त स्तरावर काम रखडले आहे. कोरोनाच्या संकटात कॅन्सर, एचआयव्हीसारख्या आजाराशी लढणाºया महिलांकडे उपचार व घरखर्चासाठी पैसे नाहीत. मनपाकडे वारंवार मागणी करूनही अनुदान वेळेवर दिले जात नाही. यामुळे आम्ही उपचाराशिवाय व उपाशीच जीवन जगायचे का, असा प्रश्न वंचित लाभार्थी विचारू लागले आहेत. याविषयी माहिती घेण्यासाठी उपायुक्त क्रांती रेडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. काहींचे चेक तयार केले आहेत. लवकरच सर्वांना लाभ देण्याचे प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे.दोषींवर कारवाई करण्याची मागणीमार्च महिन्यापूर्वी समाज विकास विभागाच्या योजनांचा लाभ संबंधितांना मिळणे आवश्यक होते. अनेक महिन्यांपासून अर्ज प्रलंबित असून, दप्तर दिरंगाईमुळे विधवा महिला, कॅ न्सर व इतर आजार झालेल्या महिला, गरिबांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे. ज्यांच्यामुळे सामान्यांना योजनांपासून वंचित राहावे लागले, त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.निधीवर कात्री नको : कोरोनामुळे अनेक विभागांतील खर्चावर मर्यादा घातली आहे. महानगरपालिकेने समाज विकास विभागाच्या खर्चावर कात्री लावू नये. गरिबांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यात यावेत. गतवर्षीच्या योजनांचा आठ दिवसांत निपटारा करण्यात यावा व पुढील वर्षासाठीच्या योजनांसाठीही कार्यवाही लवकर सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.समाज विकास विभागाच्या माध्यमातून विधवा महिला इतरांसाठीच्या योजनांचा लाभ संबंधितांना देण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. काहींचे धनादेश देण्यात आले असून, उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच वाटप केले जाणार आहे. - क्रांती रेडकर, उपआयुक्त, समाज विकास विभाग

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका