शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

महामार्गावरील खड्डे तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश, तुर्भे ते नेरूळ रोडचे सुशोभीकरणाच्याही सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:48 IST

सतरा वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे सामने डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाहणी केली.

नवी मुंबई : सतरा वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे सामने डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाहणी केली. तुर्भे पूल ते नेरूळ दरम्यान खड्डे दुरूस्त करावे व आवश्यक त्या ठिकाणी काँक्रीटीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.फिफा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये आवश्यक ती कामे करण्यास सुरवात झाली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापौर सुधाकर सोनावणे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी सायन - पनवेल महामार्गाची पाहणी केली. ठाणे-बेलापूर रोडचे शेवटचे टोक व महामार्गाची सुरवात यामध्ये असलेल्या एक किलोमीटर रोडची अत्यंत दुरवस्था झाली आहे.सानपाडा दत्तमंदिर पुलावर व पुलाखाली नियमित खड्डे असतात. यामुळे दोन महिन्यांपासून या परिसरामध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. अशीच स्थिती राहिली तर फिफा सामन्यांच्या वेळेला महामार्गावरील सर्व यंत्रणाच कोलमडण्याची शक्यता असल्याने पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना आवश्यक त्या सूचना दिल्या. एक किलोमीटर अंतरावरील पूर्ण रोडचे काँक्रीटीकरण करण्यात यावे. पुलाखाली व परिसरामधील बेवारस वाहने तत्काळ हटविण्यात यावी. पुलाखालील जागेचे सुशोभीकरण करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. अधिकाºयांकडून त्यांचे नियोजन ऐकून घेवून काय केले पाहिजे याविषयी आदेश यावेळी देण्यात आले.मुंबई व ठाणेकडून फुटबॉलप्रेमी महामार्गासह ठाणे बेलापूर रोडने येणार आहेत. यामुळे दिघा ते नेरूळ व वाशी पासून स्टेडियमपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी सुशोभीकरण केले जावे. जगाच्या नकाशावर नवी मुंबई झळकणार आहे. यामुळे आवश्यक ती सर्व कामे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी करणे आवश्यक असल्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. कोणत्याही स्थितीमध्ये पुढील एक महिन्यात सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत. नियोजनामध्ये त्रुटी राहू नयेत असेही त्यांनी सूचित केले.